शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

शिक्षणाचा स्तुत्य उपक्रम : १० हजार मुलांना फूटपाथवर अ, आ, ई चे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 12:33 IST

नागपुरात महाराजबाग राेडवर खेळणी विकणाऱ्यांच्या मुलांसाठी पहिली फूटपाथ शाळा सुरू झाली. व त्यानंतर हळू-हळू ११ फूटपाथ स्कूल शहरात सुरू झाले. या शाळांमधून १२ वर्षांत ११ हजार मुले शिकून निघून गेली. काही इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहेत, काही उच्च शिक्षणापर्यंत पाेहोचली व काही नाेकरीवरही लागली. तर, काही खेळांमध्ये उल्लेखनीय ठरली आहेत.

ठळक मुद्दे‘उपाय’चा १२ वर्षांचा प्रवास; देशभरात रुजविली ‘फूटपाथ स्कूल’ची संकल्पना

निशांत वानखेडे

नागपूर : ‘आपण किती जगलाे यापेक्षा कसे जगलाे आणि जाताना जगाला काय देऊन गेलाे’, हे जास्त महत्त्वाचे आहे. ‘उपाय’ संस्थेने नुकताच १२ वा स्थापना दिवस साजरा केला. फूटपाथवर वाढलेल्या, जगलेल्या, शाळेची इमारतही न पाहिलेल्या निरागस मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी धडपडण्याचा ताे वर्धापन दिन हाेय. नागपूर जिल्ह्यातील माैद्यात सुरू झालेल्या फूटपाथ स्कूलचे राेपटे देशभरात रुजविण्याचा आणि ११००० मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात नेण्याचा हा प्रवास आहे. ताे जेवढा अतुलनीय तेवढाच मानवीयही आहे.

एनटीपीसी माैदा येथे सेवारत अभियंता वरुण श्रीवास्तव यांना शाळेत न जाता भटकणाऱ्या मुलांना पाहून काहीतरी करण्याची इच्छा झाली. काेण काय म्हणेल, असा मागचा-पुढचा विचार न करता त्यांनी त्यांच्या घरापर्यंत जाऊन शिकविणे सुरू केले. त्यांचे अनुकरण करून काही संवेदनशील तरुण त्यांच्याशी जुळले आणि नागपुरात महाराजबाग राेडवर खेळणी विकणाऱ्यांच्या मुलांसाठी पहिली फूटपाथ शाळा सुरू झाली. महाविद्यालयीन, नाेकरीपेशा तरुण येथे सायंकाळी येऊ लागले आणि या मुलांसाेबत वेळ घालवून त्यांना अ, आ, ई चे धडे देऊ लागले. पाहता-पाहता तरुण जुळत गेले. मग माऊंट राेड, पागलखाना चाैक, सक्करदरा, वर्धमाननगर, लक्ष्मीनगर असे एक-एक करीत ११ फूटपाथ स्कूल शहरात सुरू झाले. शिक्षण फूटपाथपर्यंत या मुलांना शाळांपर्यंत पाेहोचविण्याचे कामही या तरुणांनी केले. या काळात वरुण यांच्या शिकविण्याने १० वीपर्यंत गेलेल्या मुलांनी त्यांच्या गावी शाळा सुरू केल्या. असे ११ सेंटर माैद्याच्या आसपासच्या गावात आज सुरू आहेत.

ही शाळा नागपूरपुरती मर्यादित राहिली नाही. पुण्यातील तरुणांनी ‘उपाय’शी जुळून तेथे केंद्र सुरू केले. पुढे गुडगाव, बंगलोर, दिल्ली व आता मध्यप्रदेशच्या गादरबारा येथे फूटपाथ शाळा सुरू झाली. असे ४० केंद्र आज देशात कार्यरत असून २५० च्यावर स्वयंसेवक मुलांना शिकविण्याचे काम करतात. या फूटपाथ शाळांमधून १२ वर्षांत ११ हजार मुले शिकून निघून गेली. काही इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहेत, काही उच्च शिक्षणापर्यंत पाेहोचली व काही नाेकरीवरही लागली. काही खेळांमध्ये उल्लेखनीय ठरली आहेत.

काेराेना काळातही सेवा

काेराेनाकाळात ‘उपाय’च्या कार्यकर्त्यांनी ३५ हजार लाेकांना अन्नधान्य पुरवठा केला. ६०० लाेकांचे लसीकरण केले. ७३० लाेकांना वैद्यकीय सुविधा पुरविली. १० ऑक्सिजन सहायता केंद्र चालविले

देशात आठ दशलक्ष मुले शाळेच्या बाहेर समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर आहेत. कुणीतरी जबाबदारी घेतली तर एक-एक मुलगा शिक्षणाच्या प्रवाहात येऊ शकताे. ही मुले शाळेत जाऊ शकत नाही तर शाळा त्यांच्यापर्यंत पाेहोचविता येते. थाेडा विचार करून या निरागस मुलांसाठीही वेळ काढायला हवा.

- वरुण श्रीवास्तव, संस्थापक, ‘उपाय’

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थी