शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
2
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
3
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
4
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
5
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
6
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
7
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
8
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
9
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
10
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
11
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...
12
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
13
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
14
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
15
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
16
ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर
17
Mumbai Pune Mumbai 4: स्वप्नील-मुक्ताची जोडी पुन्हा एकत्र, 'मुंबई पुणे मुंबई ४'ची घोषणा, बघा व्हिडीओ
18
श्रेयस अय्यरला झालेली दुखापत किती गंभीर, आता कशी आहे प्रकृती? बीसीसीआयने दिली महत्त्वाची माहिती
19
युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! १९३ ड्रोनमधून गोळीबार, मॉस्कोतील दोन विमानतळ बंद
20
Mid-Size SUV: २० लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये घरी आणा 'या' ५ जबरदस्त मिड- साइज एसयूव्ही कार!

आयुष्यमान भारत योजना ठरतेय फसवी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 11:03 IST

नागपूर जिल्ह्याची लोकसंख्या ४७ लाखांवर गेली असताना केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आयुष्यमान भारत या योजनेंतर्गत पंतप्रधान राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा अभियानामध्ये केवळ ३ लाख ७७ हजार ३०१ लाभार्थी कुटुंबीयांची निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे२०६ गावांमध्ये शून्य लाभार्थी४७ लाख लोकसंख्येत केवळ ४ लाख पात्र कुटुंब

सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागूपर : नागपूर जिल्ह्याची लोकसंख्या ४७ लाखांवर गेली असताना केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आयुष्यमान भारत या योजनेंतर्गत पंतप्रधान राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा अभियानामध्ये केवळ ३ लाख ७७ हजार ३०१ लाभार्थी कुटुंबीयांची निवड करण्यात आली आहे. यातही २०६ गावांमध्ये शून्य लाभार्थी अशी नोंद आहे. यामुळे पात्र कुटुंबीयांमध्ये रोष व्याप्त असून ही योजना फसवी असल्याचा आरोप केला जात आहे.केंद्र सरकारच्या या योजनेंतर्गत एका कुटुंबाला पाच लाख रुपये विमा संरक्षण मिळणार आहे. यात कोणत्याही आजारावर देशभरातील नामांकित रुग्णालयात लाभार्थी कुटुंबातील व्यक्तींना उपचार घेता येणार आहे. २०११ मध्ये झालेले सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षणानुसार लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली. यात ज्या कुटुंबाचे एक लाखाच्या आत उत्पन्न आहे अशाच कुटुंबांचा समावेश करण्यात आला आहे. या यादीनुसार आरोग्य विभागाने जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील पात्र कुटुंबातील व्यक्तींचे आधार कार्ड, मोबाईल क्रमांक, कुटुंबाची माहिती संकलित करण्याचे कार्य मे २०१८ पासून सुरू केले आहे. परंतु अनेक पात्र कुटुंबीयांची नावे यादीत नसल्याने गोंधळ उडाला आहे. यादीत शहरी भागातील महानगरपालिका, नगर पंचायत, नगर परिषद मिळून ३२८ वॉर्डांचा समावेश केला असून, पात्र कुटुंबीयांची संख्या २ लाख ३९८ दर्शविण्यात आली आहे, तर ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या १८९१ गावेच यादीत समाविष्ट आहेत. यातील फक्त १ लाख ७६ हजार ९०३ कुटुंबीय पात्र ठरविण्यात आली आहेत. याच कुटुंबातील पाच व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. यामुळे उर्वरित नागपूर जिल्ह्यातील ४३ लाख लोकसंख्येमध्ये कुणी गरीब नाही का, प्रत्येक कुटुंबाचे उत्पन्न एक लाखावर आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

शहरात लाभार्थी कुटुंब ७ टक्केच२०११ च्या सर्वेक्षणानुसार तयार करण्यात आलेल्या लाभार्थ्यांच्या यादीत नागपूर शहरातील १३५ वॉर्डातून केवळ १ लाख ७६ हजार १०३ कुटुंबीयांची निवड करण्यात आली आहे. २५ लाख लोकसंख्येत केवळ या ७ टक्केच पात्र कुटुंबीयांना देशातील दीड लाख सर्व सुविधा असलेल्या रुग्णालयांचा लाभ मिळणार आहे.

खेड्यात फक्त १ लाख ७६ हजार गरीब कुटुंबआयुष्यमान योजनेच्या यादीत नागपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतअंतर्गत १८९१ गावांचा समावेश करण्यात आला आहे. यात १ लाख ७६ हजार ९०३ पात्र कुटुंब आहेत. उर्वरित २०६ गावांमध्ये गरीब कुटुंबच नसल्याने त्या गावाचे नाव यादीत समाविष्ट करण्यात आलेले नाही. ही गावे जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याचा आरोपही होत आहे.

टॅग्स :Healthआरोग्य