शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

आयुष्यमान भारत योजना ठरतेय फसवी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 11:03 IST

नागपूर जिल्ह्याची लोकसंख्या ४७ लाखांवर गेली असताना केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आयुष्यमान भारत या योजनेंतर्गत पंतप्रधान राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा अभियानामध्ये केवळ ३ लाख ७७ हजार ३०१ लाभार्थी कुटुंबीयांची निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे२०६ गावांमध्ये शून्य लाभार्थी४७ लाख लोकसंख्येत केवळ ४ लाख पात्र कुटुंब

सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागूपर : नागपूर जिल्ह्याची लोकसंख्या ४७ लाखांवर गेली असताना केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आयुष्यमान भारत या योजनेंतर्गत पंतप्रधान राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा अभियानामध्ये केवळ ३ लाख ७७ हजार ३०१ लाभार्थी कुटुंबीयांची निवड करण्यात आली आहे. यातही २०६ गावांमध्ये शून्य लाभार्थी अशी नोंद आहे. यामुळे पात्र कुटुंबीयांमध्ये रोष व्याप्त असून ही योजना फसवी असल्याचा आरोप केला जात आहे.केंद्र सरकारच्या या योजनेंतर्गत एका कुटुंबाला पाच लाख रुपये विमा संरक्षण मिळणार आहे. यात कोणत्याही आजारावर देशभरातील नामांकित रुग्णालयात लाभार्थी कुटुंबातील व्यक्तींना उपचार घेता येणार आहे. २०११ मध्ये झालेले सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षणानुसार लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली. यात ज्या कुटुंबाचे एक लाखाच्या आत उत्पन्न आहे अशाच कुटुंबांचा समावेश करण्यात आला आहे. या यादीनुसार आरोग्य विभागाने जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील पात्र कुटुंबातील व्यक्तींचे आधार कार्ड, मोबाईल क्रमांक, कुटुंबाची माहिती संकलित करण्याचे कार्य मे २०१८ पासून सुरू केले आहे. परंतु अनेक पात्र कुटुंबीयांची नावे यादीत नसल्याने गोंधळ उडाला आहे. यादीत शहरी भागातील महानगरपालिका, नगर पंचायत, नगर परिषद मिळून ३२८ वॉर्डांचा समावेश केला असून, पात्र कुटुंबीयांची संख्या २ लाख ३९८ दर्शविण्यात आली आहे, तर ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या १८९१ गावेच यादीत समाविष्ट आहेत. यातील फक्त १ लाख ७६ हजार ९०३ कुटुंबीय पात्र ठरविण्यात आली आहेत. याच कुटुंबातील पाच व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. यामुळे उर्वरित नागपूर जिल्ह्यातील ४३ लाख लोकसंख्येमध्ये कुणी गरीब नाही का, प्रत्येक कुटुंबाचे उत्पन्न एक लाखावर आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

शहरात लाभार्थी कुटुंब ७ टक्केच२०११ च्या सर्वेक्षणानुसार तयार करण्यात आलेल्या लाभार्थ्यांच्या यादीत नागपूर शहरातील १३५ वॉर्डातून केवळ १ लाख ७६ हजार १०३ कुटुंबीयांची निवड करण्यात आली आहे. २५ लाख लोकसंख्येत केवळ या ७ टक्केच पात्र कुटुंबीयांना देशातील दीड लाख सर्व सुविधा असलेल्या रुग्णालयांचा लाभ मिळणार आहे.

खेड्यात फक्त १ लाख ७६ हजार गरीब कुटुंबआयुष्यमान योजनेच्या यादीत नागपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतअंतर्गत १८९१ गावांचा समावेश करण्यात आला आहे. यात १ लाख ७६ हजार ९०३ पात्र कुटुंब आहेत. उर्वरित २०६ गावांमध्ये गरीब कुटुंबच नसल्याने त्या गावाचे नाव यादीत समाविष्ट करण्यात आलेले नाही. ही गावे जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याचा आरोपही होत आहे.

टॅग्स :Healthआरोग्य