शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

‘सीएससी’मध्येही आयुष्यमान भारतचे ई-कार्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 11:43 IST

केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना ‘आयुष्यमान भारत’ची सुरुवात झाली असली तरी योजनेला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे वास्तव आहे. यामुळे याची व्याप्ती वाढविण्यासाठी शासनाने आता ‘कॉमन सर्व्हिस सेंटर’ला (सीएससी) हाताशी घेतले आहे.

ठळक मुद्देव्याप्ती वाढविणारमेयो, मेडिकल, सुपर व डागात मिळत होते ‘ई-कार्ड’

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना ‘आयुष्यमान भारत’ची सुरुवात झाली असली तरी योजनेला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे वास्तव आहे. यामुळे याची व्याप्ती वाढविण्यासाठी शासनाने आता ‘कॉमन सर्व्हिस सेंटर’ला (सीएससी) हाताशी घेतले आहे. चंद्रपूर व नाशिकनंतर नागपूर जिल्ह्यातील या केंद्रांना ‘आयुष्यमान भारत’ योजनेचे ‘ई-कार्ड’ देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे लोकार्पण झाल्यापासून नागपूर जिल्ह्यात योजनेचे ‘ई-कार्ड’ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) , सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयातून उपलब्ध करून दिले जात होते. परंतु आता या योजनेच्या ‘ई-कार्ड’साठी ‘आपले सरकार सेवा केंद्र’, म्हणजेच ‘सीएससी’लाही मंजुरी देण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्यात असे ८५० केंदे्र आहेत तर, शहरात ३०० केंदे्र आहेत. केवळ ३० रुपयांमध्ये या योजनेचे ‘ई-कार्ड’ उपलब्ध करून दिले जाणार आहे.यादीत नाव असणाऱ्यांनाच मिळणार ई-कार्ड‘आयुष्यमान भारत’ योजनेच्या यादीत नाव असणाºयांनाच ‘ई-कार्ड’ मिळणार आहे. यासाठी अधिकृत ‘सीएससी’ सेंटरमध्ये नागरिक गेल्यावर त्याच्या नावाची तपासणी केली जाईल. यादीत नाव असल्यास ‘ई-कार्ड’च्या मंजुरीसाठी पाठविले जाईल. २४ तासांत मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित नागरिकाला हे ओळखपत्र मिळेल. नागपुरात गेल्या चार दिवसांपासून याला सुरुवात झाली असून लोकांचा प्रतिसाद मिळत आहे.कुणाला मिळणार लाभया योजनेंतर्गत लाभार्थी कुटुंबाला वर्षातून एकदा पाच लाख रुपये विमा संरक्षण मिळणार आहे. कोणत्याही आजारांवर देशभरातील नामांकित रुग्णालयात लाभार्थी कुटुंबातील व्यक्तींना उपचार घेता येणार आहे. २०११ मध्ये झालेल्या सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षणानुसार (एसईसीसी) लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली. यात ज्या कुटुंबाचे एक लाखाच्या आत उत्पन्न आहे अशाच कुटुंबाचा समावेश करण्यात आला आहे. यात नागपूर जिल्ह्यातील ३ लाख ७७ हजार ३०१ लाभार्थी कुटुंबांचा समावेश आहे. याच कुटुंबातील पाच व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

टॅग्स :Healthआरोग्यGovernmentसरकार