शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

‘सीएससी’मध्येही आयुष्यमान भारतचे ई-कार्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 11:43 IST

केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना ‘आयुष्यमान भारत’ची सुरुवात झाली असली तरी योजनेला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे वास्तव आहे. यामुळे याची व्याप्ती वाढविण्यासाठी शासनाने आता ‘कॉमन सर्व्हिस सेंटर’ला (सीएससी) हाताशी घेतले आहे.

ठळक मुद्देव्याप्ती वाढविणारमेयो, मेडिकल, सुपर व डागात मिळत होते ‘ई-कार्ड’

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना ‘आयुष्यमान भारत’ची सुरुवात झाली असली तरी योजनेला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे वास्तव आहे. यामुळे याची व्याप्ती वाढविण्यासाठी शासनाने आता ‘कॉमन सर्व्हिस सेंटर’ला (सीएससी) हाताशी घेतले आहे. चंद्रपूर व नाशिकनंतर नागपूर जिल्ह्यातील या केंद्रांना ‘आयुष्यमान भारत’ योजनेचे ‘ई-कार्ड’ देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे लोकार्पण झाल्यापासून नागपूर जिल्ह्यात योजनेचे ‘ई-कार्ड’ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) , सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयातून उपलब्ध करून दिले जात होते. परंतु आता या योजनेच्या ‘ई-कार्ड’साठी ‘आपले सरकार सेवा केंद्र’, म्हणजेच ‘सीएससी’लाही मंजुरी देण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्यात असे ८५० केंदे्र आहेत तर, शहरात ३०० केंदे्र आहेत. केवळ ३० रुपयांमध्ये या योजनेचे ‘ई-कार्ड’ उपलब्ध करून दिले जाणार आहे.यादीत नाव असणाऱ्यांनाच मिळणार ई-कार्ड‘आयुष्यमान भारत’ योजनेच्या यादीत नाव असणाºयांनाच ‘ई-कार्ड’ मिळणार आहे. यासाठी अधिकृत ‘सीएससी’ सेंटरमध्ये नागरिक गेल्यावर त्याच्या नावाची तपासणी केली जाईल. यादीत नाव असल्यास ‘ई-कार्ड’च्या मंजुरीसाठी पाठविले जाईल. २४ तासांत मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित नागरिकाला हे ओळखपत्र मिळेल. नागपुरात गेल्या चार दिवसांपासून याला सुरुवात झाली असून लोकांचा प्रतिसाद मिळत आहे.कुणाला मिळणार लाभया योजनेंतर्गत लाभार्थी कुटुंबाला वर्षातून एकदा पाच लाख रुपये विमा संरक्षण मिळणार आहे. कोणत्याही आजारांवर देशभरातील नामांकित रुग्णालयात लाभार्थी कुटुंबातील व्यक्तींना उपचार घेता येणार आहे. २०११ मध्ये झालेल्या सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षणानुसार (एसईसीसी) लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली. यात ज्या कुटुंबाचे एक लाखाच्या आत उत्पन्न आहे अशाच कुटुंबाचा समावेश करण्यात आला आहे. यात नागपूर जिल्ह्यातील ३ लाख ७७ हजार ३०१ लाभार्थी कुटुंबांचा समावेश आहे. याच कुटुंबातील पाच व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

टॅग्स :Healthआरोग्यGovernmentसरकार