शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

‘अवनी’च्या कुटुंबाचा अखेर झाला अंत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:08 IST

नागपूर : दोन वर्षापूर्वी यवतमाळ जिल्ह्यात पाच व्यक्तींचा बळी घेणाऱ्या टी-१ म्हणजेच ‘अवनी’ या वाघिणीच्या हत्येनंतर तिची दोन पिले ...

नागपूर : दोन वर्षापूर्वी यवतमाळ जिल्ह्यात पाच व्यक्तींचा बळी घेणाऱ्या टी-१ म्हणजेच ‘अवनी’ या वाघिणीच्या हत्येनंतर तिची दोन पिले अनाथ झाली होती. त्यातील एकाचा पुढे पत्ता लागला नाही, तर दुसरी मादी बछडी दोन वर्षापासून पेंचमध्ये वन विभागाच्या देखरेखीखाली वाढत होती. मात्र आठवडाभरापूर्वी जंगलात सोडल्यावर तिच्यावर दुसऱ्या वाघाकडून हल्ला झाला. त्यात ती जखमी झाली. मात्र उपचारादरम्यान १२ मार्चला रात्री ती दगावली. देशभरात चर्चेत आलेल्या अवनीच्या कुटुंबातील एकमेव ज्ञात वारसदारही आता दगावल्याने तिच्या कुटुंबाचाच शेवट झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

अवनीच्या हत्येनंतर तिची दोन पिले अनाथ झाली होती. जंगलात ती उपासाने दगावतील, अशी भीती वन विभागाला होती. या बछड्यांचा शोध सुरू असताना दोन पिले दिसलीही. मात्र त्यातील एकाचा पुढे पत्ताच लागला नाही. या घटनेनंतर सुमारे वर्षभराने दुसरी मादी बछडी वन विभागाने रेस्क्यू करून पेंचमध्ये आणली. पीटीआरएफ-८४ असे नाव देण्यात आले. २२ डिसेंबर २०१८ पासून तिला तेथील चार हेक्टर क्षेत्रफळाच्या ओपन एन्क्लोजरमध्ये ठेवून शिकार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. शिकारीसाठी ती सक्षम झाल्याचे लक्षात आल्याने जुलै २०१९ मध्ये तिला मूळ अधिवासात सोडण्यावर चर्चा झाली. मात्र एनटीएसीएच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार काही त्रुटी दाखविल्याने हे लांबले. पुढे वर्षभराने या प्रस्तावाला मंजुरी मिळून ७ जुलै २०२० च्या बैठकीत तिला सोडण्यावर एकमत झाले. नंतरच्या घडामोडीत एनटीसीएकडून परवानगी आली. त्यामुळे गेल्या आठवड्यात ५ मार्चला तिला निसर्गात सोडण्यात आले होते. मात्र ८ मार्चला जंगलातील अन्य वाघिणीशी तिची झुंज झाली होती. त्यात गंभीर जखमी झाल्याने तिच्यावर उपचार सुरू होते. ठणठणीत झाल्यावर तिला पुन्हा निसर्गात सोडले जाणार होते. मात्र नियतीने ही संधीच दिली नाही. शनिवारी १३ मार्चला रात्री ११ वाजता ती दगावली. यासोबतच तिच्या कुटुंबाचाही अंत झाला.

...

‘अवनी’ गाजली देशभरात !

२०१६ पासून अवनीची यवतमाळच्या जंगलात दहशत होती. २०१८ च्या काळात ७ जणांचा या वाघिणीच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यामुळे या वाघिणीला नरभक्ष्यी ठरविण्यात आले होते. तिला ठार करण्याच्या मागणीसाठी वन विभागावर आणि प्रशासनावर प्रचंड दबाव वाढत होता. अखेर शुक्रवारी ३ नोव्हेंबर २०१८ रोजी रात्री उशिरा राळेगाव तालुक्यातील बोराटी गावाजवळच्या जंगलात तिला शार्प शूटरकडून ठार करण्यात आले.

या वाघिणीला ठार केल्यानंतर एकीकडे स्थानिकांमध्ये आनंद, तर दुसरीकडे वन्यजीवप्रेमींमध्ये संताप, असे चित्र निर्माण झाले होते. प्रशासनाने तिला पकडण्याचा प्रयत्नच केला नाही, थेट ठारच करण्यात आल्याचा आरोप आजही होत आहे. तर, ‘अवनी’ला गोळी मारण्यापूर्वी बेशुद्ध करण्याचा प्रयत्न झाला, असा वन विभागाचा दावा आहे. टीममधील सदस्य शेख यांनी वाघिणीला बेशुद्ध करण्यासाठी डार्ट मारला. तो डार्ट वाघिणीला लागला, पण मागे जात तिने पुन्हा हल्ला केला. हे कर्मचारी जिप्सीमध्ये होते. शेवटी स्वरक्षणासाठी शार्प शूटरने आठ ते दहा मीटर अंतरावरून गोळी झाडली. त्यात ही वाघीण जागेवरच मेली, असे वन विभागाचे म्हणणे आहे. मृत्यूनंतरही तिची कहाणी संपलेली नाही. हे प्रकरण न्यायालयात गेले आहे.

...