शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

पोलीस भरतीत बनवाबनवी करणाऱ्या औरंगाबादच्या टोळीचा छडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2022 21:46 IST

Nagpur News पोलिसांची नोकरी मिळवण्यासाठी ईच्छूक असलेल्या तरुणांना हेरून त्यांच्या नावावर लेखी परिक्षेचा पेपर सोडविणाऱ्या टोळीचा नागपूर पोलिसांनी छडा लावला आहे.

ठळक मुद्देअर्ज दुसऱ्यांनी केला अन् भरतीसाठी उभे दुसरेच राहिलेभरतीच्या चाचणी, लेखी परिक्षेसाठी १३ लाख मोजले

नागपूर - पोलिसांची नोकरी मिळवण्यासाठी ईच्छूक असलेल्या तरुणांना हेरून त्यांच्या नावावर लेखी परिक्षेचा पेपर सोडविणाऱ्या टोळीचा नागपूर पोलिसांनी छडा लावला आहे. या टोळीतील आरोपींनी उमेदवाराकडून लाखो रुपये घेतल्याचे उघडकीस आले असून या प्रकरणी गिट्टीखदान ठाण्यात औरंगाबादच्या चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहर पोलीस दलात पोलीस भरतीची पात्रता परिक्षा नुकतीच पार पडली. मैदानी चाचण्या तसेच पात्र उमेदवारांची लेखी परिक्षा घेण्यात आली. या भरती प्रक्रियेत औरंगाबाद जिल्ह्यातील सजरपूर वाडी, परसोंडा (ता. वैजापूर) येथील जयपाल कारभारी कंकरवाल आणि त्याच्या मित्राने शक्कल शोधली.

आरोपी विशाल लखवाल (रा. रघुनाथपूर, हजारवाडी) आणि त्याचे औरंगाबाद जिल्ह्यातील साथीदार पोलीस भरतीच्या परिक्षेचे रॅकेट चालवितात. कंकरवाल आणि त्याच्या मित्राने आरोपी विशाल लखवाल आणि साथीदारांना १३ लाख रुपये देऊन त्यांच्याकडून २८ ऑक्टोबर २०२१ ते ९ डिसेंबर २०२१ दरम्यान झालेल्या पोलीस भरतीच्या शारिरिक चाचण्या आणि लेखी परिक्षेचा पेपर सोडवून घेतला. विशेष म्हणजे, ऑनलाईन लेखी परिक्षेत तो उत्तीर्णही झाला. शारिरिक तपासणीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांवर विशाल लखवाल ऐवजी जयपालचा फोटो दिसल्याने पोलिसांच्या लक्षात बनवाबनवी आली. त्यानंतर शहर पोलिसांनी गोपनिय चाैकशी सुरू करून बुधवारी या प्रकरणात आरोपी कंकरवाल, लखवाल, मिथून गबरूसिंग बमनावत (रा. सजरपूर) आणि तेजस जाधव (रा. शिवुरता, वैजापूर) या चाैघांविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला. यातील कंकरवालसह दोघांना अटक करून त्यांचा १५ जानेवारीपर्यंत पीसीआर मिळवला.

ए टू झेड पॅकेज

या टोळीत आणखी किती जणांचा समावेश आहे, ते स्पष्ट झाले नाही. मात्र, आरोपी पोलीस भरतीत हमखास पास करून देण्याची हमी देत होते आणि ए टू झेड पॅकेज घेत होते, असे प्राथमिक तपासात पुढे आल्याचे सामजते. दरम्यान, या टोळीत आणखी काही जण सहभागी असावे आणि त्यांनी अशा प्रकारे आणखी अनेकांना गंडा घातला असावा, असा संशय आहे.

पोलीस बनण्यासाठी केला गंभीर गुन्हा, तपास गुन्हे शाखेकडे

वेगवेगळे गुन्हे शोधून काढण्याची आणि गुन्हेगारी नियंत्रीत करण्याची जबाबदारी पोलीस सांभाळतात. अनेक जणांना ते गुन्हे करण्यापासूनही परावृत्त करतात. जयपालला पोलीस बनायचे होते. मात्र, त्यासाठी त्याने भलताच मार्ग निवडला अन् आरोपींच्या मदतीने हा गंभीर गुन्हा केला. दरम्यान, पोलीस आयुक्तांनी हा तपास गुन्हे शाखेकडे सोपविला आहे.

----

टॅग्स :Policeपोलिसfraudधोकेबाजी