शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

पोलीस भरतीत बनवाबनवी करणाऱ्या औरंगाबादच्या टोळीचा छडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2022 21:46 IST

Nagpur News पोलिसांची नोकरी मिळवण्यासाठी ईच्छूक असलेल्या तरुणांना हेरून त्यांच्या नावावर लेखी परिक्षेचा पेपर सोडविणाऱ्या टोळीचा नागपूर पोलिसांनी छडा लावला आहे.

ठळक मुद्देअर्ज दुसऱ्यांनी केला अन् भरतीसाठी उभे दुसरेच राहिलेभरतीच्या चाचणी, लेखी परिक्षेसाठी १३ लाख मोजले

नागपूर - पोलिसांची नोकरी मिळवण्यासाठी ईच्छूक असलेल्या तरुणांना हेरून त्यांच्या नावावर लेखी परिक्षेचा पेपर सोडविणाऱ्या टोळीचा नागपूर पोलिसांनी छडा लावला आहे. या टोळीतील आरोपींनी उमेदवाराकडून लाखो रुपये घेतल्याचे उघडकीस आले असून या प्रकरणी गिट्टीखदान ठाण्यात औरंगाबादच्या चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहर पोलीस दलात पोलीस भरतीची पात्रता परिक्षा नुकतीच पार पडली. मैदानी चाचण्या तसेच पात्र उमेदवारांची लेखी परिक्षा घेण्यात आली. या भरती प्रक्रियेत औरंगाबाद जिल्ह्यातील सजरपूर वाडी, परसोंडा (ता. वैजापूर) येथील जयपाल कारभारी कंकरवाल आणि त्याच्या मित्राने शक्कल शोधली.

आरोपी विशाल लखवाल (रा. रघुनाथपूर, हजारवाडी) आणि त्याचे औरंगाबाद जिल्ह्यातील साथीदार पोलीस भरतीच्या परिक्षेचे रॅकेट चालवितात. कंकरवाल आणि त्याच्या मित्राने आरोपी विशाल लखवाल आणि साथीदारांना १३ लाख रुपये देऊन त्यांच्याकडून २८ ऑक्टोबर २०२१ ते ९ डिसेंबर २०२१ दरम्यान झालेल्या पोलीस भरतीच्या शारिरिक चाचण्या आणि लेखी परिक्षेचा पेपर सोडवून घेतला. विशेष म्हणजे, ऑनलाईन लेखी परिक्षेत तो उत्तीर्णही झाला. शारिरिक तपासणीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांवर विशाल लखवाल ऐवजी जयपालचा फोटो दिसल्याने पोलिसांच्या लक्षात बनवाबनवी आली. त्यानंतर शहर पोलिसांनी गोपनिय चाैकशी सुरू करून बुधवारी या प्रकरणात आरोपी कंकरवाल, लखवाल, मिथून गबरूसिंग बमनावत (रा. सजरपूर) आणि तेजस जाधव (रा. शिवुरता, वैजापूर) या चाैघांविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला. यातील कंकरवालसह दोघांना अटक करून त्यांचा १५ जानेवारीपर्यंत पीसीआर मिळवला.

ए टू झेड पॅकेज

या टोळीत आणखी किती जणांचा समावेश आहे, ते स्पष्ट झाले नाही. मात्र, आरोपी पोलीस भरतीत हमखास पास करून देण्याची हमी देत होते आणि ए टू झेड पॅकेज घेत होते, असे प्राथमिक तपासात पुढे आल्याचे सामजते. दरम्यान, या टोळीत आणखी काही जण सहभागी असावे आणि त्यांनी अशा प्रकारे आणखी अनेकांना गंडा घातला असावा, असा संशय आहे.

पोलीस बनण्यासाठी केला गंभीर गुन्हा, तपास गुन्हे शाखेकडे

वेगवेगळे गुन्हे शोधून काढण्याची आणि गुन्हेगारी नियंत्रीत करण्याची जबाबदारी पोलीस सांभाळतात. अनेक जणांना ते गुन्हे करण्यापासूनही परावृत्त करतात. जयपालला पोलीस बनायचे होते. मात्र, त्यासाठी त्याने भलताच मार्ग निवडला अन् आरोपींच्या मदतीने हा गंभीर गुन्हा केला. दरम्यान, पोलीस आयुक्तांनी हा तपास गुन्हे शाखेकडे सोपविला आहे.

----

टॅग्स :Policeपोलिसfraudधोकेबाजी