शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस भरतीत बनवाबनवी करणाऱ्या औरंगाबादच्या टोळीचा छडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2022 21:46 IST

Nagpur News पोलिसांची नोकरी मिळवण्यासाठी ईच्छूक असलेल्या तरुणांना हेरून त्यांच्या नावावर लेखी परिक्षेचा पेपर सोडविणाऱ्या टोळीचा नागपूर पोलिसांनी छडा लावला आहे.

ठळक मुद्देअर्ज दुसऱ्यांनी केला अन् भरतीसाठी उभे दुसरेच राहिलेभरतीच्या चाचणी, लेखी परिक्षेसाठी १३ लाख मोजले

नागपूर - पोलिसांची नोकरी मिळवण्यासाठी ईच्छूक असलेल्या तरुणांना हेरून त्यांच्या नावावर लेखी परिक्षेचा पेपर सोडविणाऱ्या टोळीचा नागपूर पोलिसांनी छडा लावला आहे. या टोळीतील आरोपींनी उमेदवाराकडून लाखो रुपये घेतल्याचे उघडकीस आले असून या प्रकरणी गिट्टीखदान ठाण्यात औरंगाबादच्या चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहर पोलीस दलात पोलीस भरतीची पात्रता परिक्षा नुकतीच पार पडली. मैदानी चाचण्या तसेच पात्र उमेदवारांची लेखी परिक्षा घेण्यात आली. या भरती प्रक्रियेत औरंगाबाद जिल्ह्यातील सजरपूर वाडी, परसोंडा (ता. वैजापूर) येथील जयपाल कारभारी कंकरवाल आणि त्याच्या मित्राने शक्कल शोधली.

आरोपी विशाल लखवाल (रा. रघुनाथपूर, हजारवाडी) आणि त्याचे औरंगाबाद जिल्ह्यातील साथीदार पोलीस भरतीच्या परिक्षेचे रॅकेट चालवितात. कंकरवाल आणि त्याच्या मित्राने आरोपी विशाल लखवाल आणि साथीदारांना १३ लाख रुपये देऊन त्यांच्याकडून २८ ऑक्टोबर २०२१ ते ९ डिसेंबर २०२१ दरम्यान झालेल्या पोलीस भरतीच्या शारिरिक चाचण्या आणि लेखी परिक्षेचा पेपर सोडवून घेतला. विशेष म्हणजे, ऑनलाईन लेखी परिक्षेत तो उत्तीर्णही झाला. शारिरिक तपासणीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांवर विशाल लखवाल ऐवजी जयपालचा फोटो दिसल्याने पोलिसांच्या लक्षात बनवाबनवी आली. त्यानंतर शहर पोलिसांनी गोपनिय चाैकशी सुरू करून बुधवारी या प्रकरणात आरोपी कंकरवाल, लखवाल, मिथून गबरूसिंग बमनावत (रा. सजरपूर) आणि तेजस जाधव (रा. शिवुरता, वैजापूर) या चाैघांविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला. यातील कंकरवालसह दोघांना अटक करून त्यांचा १५ जानेवारीपर्यंत पीसीआर मिळवला.

ए टू झेड पॅकेज

या टोळीत आणखी किती जणांचा समावेश आहे, ते स्पष्ट झाले नाही. मात्र, आरोपी पोलीस भरतीत हमखास पास करून देण्याची हमी देत होते आणि ए टू झेड पॅकेज घेत होते, असे प्राथमिक तपासात पुढे आल्याचे सामजते. दरम्यान, या टोळीत आणखी काही जण सहभागी असावे आणि त्यांनी अशा प्रकारे आणखी अनेकांना गंडा घातला असावा, असा संशय आहे.

पोलीस बनण्यासाठी केला गंभीर गुन्हा, तपास गुन्हे शाखेकडे

वेगवेगळे गुन्हे शोधून काढण्याची आणि गुन्हेगारी नियंत्रीत करण्याची जबाबदारी पोलीस सांभाळतात. अनेक जणांना ते गुन्हे करण्यापासूनही परावृत्त करतात. जयपालला पोलीस बनायचे होते. मात्र, त्यासाठी त्याने भलताच मार्ग निवडला अन् आरोपींच्या मदतीने हा गंभीर गुन्हा केला. दरम्यान, पोलीस आयुक्तांनी हा तपास गुन्हे शाखेकडे सोपविला आहे.

----

टॅग्स :Policeपोलिसfraudधोकेबाजी