शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

प्रवाशांनो लक्ष द्या... आता नागपूरहून थेट गोरखपूरसाठी रेल्वेगाडी; खास उन्हाळ्यात स्पेशल ट्रेन : आजपासून सुरुवात

By नरेश डोंगरे | Updated: April 20, 2024 20:48 IST

नागपूरहून यूपी, बिहारसाठी स्पेशल ट्रेन सुरू करण्यात येणार असल्याचे वृत्त लोकमतने १५ एप्रिलच्या अंकात प्रकाशित केले होते, हे येथे उल्लेखनीय!

नागपूर : प्रचंड गर्दीमुळे प्रवाशांची कुचंबना होत असल्याचे लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने नागपूरहून थेट उत्तर प्रदेशमध्ये जाणाऱ्या स्पेशल ट्रेनची व्यवस्था केली आहे. त्यानुसार, आज रविवार, २१ एप्रिलपासून नागपूर-गोरखपूर ही स्पेशल ट्रेन प्रवाशांना सेवा देणार आहे. नागपूरहून यूपी, बिहारसाठी स्पेशल ट्रेन सुरू करण्यात येणार असल्याचे वृत्त लोकमतने १५ एप्रिलच्या अंकात प्रकाशित केले होते, हे येथे उल्लेखनीय!

दोन महिन्यांपासून दक्षिणेकडून येणाऱ्या सर्वच गाड्या फुल्ल भरून येत आहेत. नागपूर स्थानकावरून मोठ्या संख्येत चढणाऱ्या प्रवाशांची त्यात भर पडत आहे. त्यामुळे आधीच पाय ठेवायला जागा नसल्याने प्रवासी मिळेल त्या डब्यात प्रवास करीत आहेत. त्यामुळे जनरलच नव्हे तर, स्लिपर आणि एसी कोचमधील प्रवाशांनाही त्रास होऊ लागला आहे. स्लिपर, एसी कोचमधील स्वच्छतागृहाजवळ प्रवासी दाटीवाटीने उभे असल्याने, कन्फर्म तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, महिला आणि मुलांची तीव्र कुचंबणा होत आहे. लोकमतने या संबंधाने सचित्र वृत्त प्रकाशित केल्यामुळे शीर्षस्थ अधिकाऱ्यांनी त्याची गंभीर दखल घेतली होती. या पार्श्वभूमीवर नागपूरहूनच थेट यूपी, बिहारकडे जाण्यासाठी नवीन रेल्वेगाड्या सुरू करण्याचा प्रस्ताव गेल्या आठवड्यात दिल्ली बोर्डाकडे पाठविला होता. त्याचेही वृत्त ‘लोकमत’ने १५ एप्रिलला प्रकाशित केले होते. एका आठवड्यात ही गाडी सुरू होणार असल्याचेही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हवाल्याने या वृत्तात नमूद केेले होते. या पार्श्वभूमीवर, आज रेल्वे प्रशासनाने ०१२०७ नागपूर-गोरखपूर ही नवीन विशेष रेल्वेगाडी २१ एप्रिलपासून सुरू करण्याची घोषणा केली आहे.

रोज सकाळी सुटणार, दुसऱ्या दिवशी पोहचणारही गाडी रविवारपासून दररोज सकाळी ७.३० वाजता नागपूर स्थानकावरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६.१५ वाजता गोरखपूरला पोहचेल. त्याच प्रमाणे ०१२०८ गोरखपूर-नागपूर ही २२ एप्रिलपासून दररोज सकाळी ९.१५ वाजता गोरखपूर स्थानकावरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ९.३० वाजता नागपूर स्थानकावर दाखल होईल. भर उन्हाळ्यात सुरू करण्यात आलेल्या या स्पेशल ट्रेनमुळे यूपी बिहारकडे जाणाऱ्या प्रवाशांना चांगला दिलासा मिळणार, असा विश्वास वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांनी व्यक्त केला आहे.

या ठिकाणच्या प्रवाशांनाही लाभया गाडीला १९ कोच राहणार आहेत. त्यात १२ एसी थ्री टियर ईकॉनाॅमी, ५ सामान्य द्वितीय श्रेणी, १ लगेच कम गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कारचा त्यात समावेश आहे. नागपूर-गोरखपूर मार्गावरील आमला, बैतूल, घोडाडोंगरी, इटारसी, भोपाळ, ललितपूर, लक्ष्मीबाई झांसी, उरई, पोखरायन, कानपूर सेंट्रल, उन्नाव, ऐशबाग, बादशाहनगर, बाराबंकी, गोंडा, मानकापूर, बस्ती आणि खलीलाबाद आदी स्थानकांवर ही गाडी थांबणार आहे. 

टॅग्स :railwayरेल्वेUttar Pradeshउत्तर प्रदेशIndian Railwayभारतीय रेल्वे