शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

जातीच्या आधारावर संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न; विजयादशमी उत्सवात डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2024 03:28 IST

रेशीमबाग येथे शनिवारी विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सव उत्साहात साजरा झाला. यावेळी ते बोलत होते. 

नागपूर : आज भारतात जात, भाषा, प्रदेश इत्यादींच्या आधारे समाजाला वेगळे करून संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे पंजाब, जम्मू-काश्मीर, लद्दाख, केरळ, तामिळनाडू आणि बिहारपासून मणिपूरपर्यंत संपूर्ण पूर्वांचल अस्वस्थ आहे, असे सांगत देशात जातीपातीच्या आधारावर निर्माण होत असलेले भेद व त्या माध्यमातून अराजकता पसरविण्याच्या प्रयत्नांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी चिंता व्यक्त केली. रेशीमबाग येथे शनिवारी विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सव उत्साहात साजरा झाला. यावेळी ते बोलत होते. 

संघाच्या स्थापनेला शनिवारी ९९ वर्षे पूर्ण झाले असून, संघाने शताब्दी वर्षात पदार्पण केले आहे. यावेळी डॉ. भागवत म्हणाले, देशात विनाकारण कट्टरतावादाला चिथावणी देणाऱ्या घटनांमध्ये अचानक वाढ होत आहे. परिस्थिती किंवा धोरणांबद्दल असंतोष असू शकतो, परंतु ते व्यक्त करण्याचे  लोकशाही मार्ग आहेत. 

भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करणे, ही गुंडगिरी हिंसाचार करणे, समाजातील एखाद्या विशिष्ट वर्गावर हल्ला करणे, भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करणे, ही गुंडगिरी आहे, असेही डॉ. भागवत यावेळी म्हणाले. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अशा वागण्याला ‘अराजकते’चे असे म्हटले आहे, याकडे सरसंघचालकांनी लक्ष वेधले. पावसामुळे मैदानात चिखल झाला होता. त्यामध्येही स्वयंसेवकांनी प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले.  कार्यक्रमाला इस्त्रोचे माजी अध्यक्ष के. राधाकृष्णन हे प्रमुख अतिथी होते. 

गडकरी, फडणवीस संघाच्या गणवेशातकार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संघाच्या गणवेशात उपस्थित होते. राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हेदेखील उपस्थित होते.

सरसंघचालक म्हणाले...-जगात भारताचा दबदबा वाढला. मात्र, काही तत्त्व अडथळे आणण्याचा प्रयत्न करतात. देशाची प्रतिमा मलिन करण्यासाठी षडयंत्र रचण्यात येत आहेत.-बांगलादेशमधील हिंदूंवर झालेले हल्ले हा गंभीर प्रकार होता. तेथील अत्याचारी कट्टरपंथीय लोक सक्रिय आहेत. तोपर्यंत हिंदूंसोबत अल्पसंख्यांक समाजावर सातत्याने धोक्याची तलवार लटकत राहणार आहे.  -विशिष्ट घटकांच्या असंतोषाला हवा देऊन तो घटक समाजापासून वेगळा आणि व्यवस्थेविरुद्ध आक्रमक बनवला जात आहे. देशहितापेक्षा स्वार्थाच्या राजकारणाला जास्त प्राधान्य देण्यात येत आहे.-कोलकाता अत्याचारानंतर गुन्हेगारांच्या संरक्षणासाठी काही लोकांकडून जे घृणास्पद प्रयत्न केले गेले त्यातून गुन्हेगारी, राजकारण आणि दुष्कृती यांची सांगड आपल्याला कशी बिघडवत आहे, हेच दिसून येते. 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतnagpurनागपूरRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ