शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
4
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
5
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
6
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
7
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
8
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
9
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
10
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
11
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
12
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
13
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
14
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
15
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
16
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
17
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
18
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
19
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
20
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न

संतसाहित्याला माहिती तंत्रज्ञानाची जोड द्यावी; नितीन गडकरी यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 16:55 IST

संत साहित्यांच्या अभ्यासकांनी आपल्या संशोधनांना आणि संत साहित्यांना माहिती तंत्रज्ञानाची जोड द्यावी. सरकार सहकार्य करेल असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले.

ठळक मुद्देयाच महिन्यात होणार वारकरी पालखी मार्गाचे भूमीपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इतिहास, संस्कृती आणि वारसा ही आपली ताकद आहे. यात महाराष्ट्रातल्या संतांचे मोठ्ठे योगदान असून, ही ताकद पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावी आणि भविष्य संस्कारित व्हावी असे वाटत असेल तर, संत साहित्याचे डिजिटलाईजेशन होणे ही काळाची गरज आहे. संत साहित्यांच्या अभ्यासकांनी आपल्या संशोधनांना आणि संत साहित्यांना माहिती तंत्रज्ञानाची जोड द्यावी आणि त्यासाठी आचार्य म. रा. जोशी यांनी पुढाकार घ्यावा.. सरकार त्यांना सहकार्य करेल असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले.महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दिला जाणारा ‘ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार’ संत साहित्याचे गाढे अभ्यासक आचार्य डॉ. म. रा. जोशी यांना गडकरींच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी, ते बोलत होते. रविवारी सिव्हिल लाईन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित या पुरस्कार प्रदान सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर महापौर नंदा जिचकार, खा. डॉ. विकास महात्मे, सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर सचिव शैलेश जाधव, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे प्रभारी संचालक मीनल जोगळेकर, डॉ. गुरूप्रसाद पाखमोडे उपस्थित होते.संत साहित्य समाजाला दिशा देणारे आणि मनावर संस्कार करणारे आहे. या साहित्यांतून महाराष्ट्राची सुसंस्कृत पिढी निर्माण झाली आहे. अशा साहित्याचे संशोधन करणाऱ्या डॉ. म.रा. जोशी यांची महाराष्ट्र शासनाने दखल घेतली, हे कौतुकास्पद आहे. जोशी यांचा हा सन्मान म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचा गौरव ठरला आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम आणि अन्य संतांच्या साहित्यातील चिंतन हे जगतानाला मार्गदर्शक ठरणारे असून, त्यांचे विचार जगाच्या कानाकोपºयात पोहोचवायचे असतील तर त्याला माहिती तंत्रज्ञानाची जोड देणे महत्त्वाचे ठरणार असल्याचे गडकरी यावेळी म्हणाले. दरवर्षी पंढरपूरला निघणाºया वारीतून अध्यात्मीत वातावरणाचे उत्सर्जन होत असते. या वारीसाठी आठ हजार कोटी रुपये खर्चुन देहू ते पंढरपूर आणि आळंदी ते पंढरपूर वारकरी पालखी मार्ग बांधण्यात येत आहे. त्याचे भूमीपुजन याच महिन्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते माझ्या उपस्थिती पार पडणार असल्याचे नितीन गडकरी यावेळी म्हणाले. संचालन रेणूका देशकर यांनी केले. तर आभार श्रीराम पांडे यांनी मानले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी