शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सिद्धारामय्यांना हटवणार? कर्नाटकात CM पदावरून पुन्हा वाद पेटला, डीके गटातील आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला
2
चीन-जपान तणावात भारताची 'बल्ले-बल्ले'! झाला बंपर फायदा, बाजार 11% नं वधारला; आता ट्रम्प टॅरिफचं 'नो-टेंशन'!
3
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
4
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
5
जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले..., पाटणा विमानतळावरील 'आदराचं' अद्भुत दृश्य - Video
6
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
7
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
8
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
9
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
10
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
11
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
12
Viral : जगातला सगळ्यात आळशी व्यक्ती! स्पर्धा जिंकण्यासाठी तब्बल 'इतके' तास गादीवर झोपून राहिला
13
'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
14
बंगालमध्ये 'घमासान'! "परिस्थिती अत्यंत बिघडलीये, SIR त्वरित थांबवा..."; ममता बॅनर्जींच CECना पत्र, आणखी काय म्हणाल्या?
15
IND vs SA: हार्दिक पांड्या आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही? वाचा ताजी अपडेट
16
लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
17
भारतात विकली जाणारी टेस्ला मॉडेल Y किती सुरक्षित; युरो एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये मिळवले 'एवढे' स्टार रेटिंग!
18
पश्चिम बंगालमध्ये ९०० मतदारांची नावे यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा संताप, बीएलओंवर कारवाईचे आदेश
19
लोकांचे पैसे गुंतविता गुंतविता Groww ने १९,००० कोटींचे नुकसान केले; गुंतवणूकदार डोके धरून बसले...
20
पती नव्हे राक्षस! पत्नीने मित्रांना विरोध केला म्हणून मारहाण, गर्भपात आणि नंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

संतसाहित्याला माहिती तंत्रज्ञानाची जोड द्यावी; नितीन गडकरी यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 16:55 IST

संत साहित्यांच्या अभ्यासकांनी आपल्या संशोधनांना आणि संत साहित्यांना माहिती तंत्रज्ञानाची जोड द्यावी. सरकार सहकार्य करेल असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले.

ठळक मुद्देयाच महिन्यात होणार वारकरी पालखी मार्गाचे भूमीपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इतिहास, संस्कृती आणि वारसा ही आपली ताकद आहे. यात महाराष्ट्रातल्या संतांचे मोठ्ठे योगदान असून, ही ताकद पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावी आणि भविष्य संस्कारित व्हावी असे वाटत असेल तर, संत साहित्याचे डिजिटलाईजेशन होणे ही काळाची गरज आहे. संत साहित्यांच्या अभ्यासकांनी आपल्या संशोधनांना आणि संत साहित्यांना माहिती तंत्रज्ञानाची जोड द्यावी आणि त्यासाठी आचार्य म. रा. जोशी यांनी पुढाकार घ्यावा.. सरकार त्यांना सहकार्य करेल असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले.महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दिला जाणारा ‘ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार’ संत साहित्याचे गाढे अभ्यासक आचार्य डॉ. म. रा. जोशी यांना गडकरींच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी, ते बोलत होते. रविवारी सिव्हिल लाईन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित या पुरस्कार प्रदान सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर महापौर नंदा जिचकार, खा. डॉ. विकास महात्मे, सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर सचिव शैलेश जाधव, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे प्रभारी संचालक मीनल जोगळेकर, डॉ. गुरूप्रसाद पाखमोडे उपस्थित होते.संत साहित्य समाजाला दिशा देणारे आणि मनावर संस्कार करणारे आहे. या साहित्यांतून महाराष्ट्राची सुसंस्कृत पिढी निर्माण झाली आहे. अशा साहित्याचे संशोधन करणाऱ्या डॉ. म.रा. जोशी यांची महाराष्ट्र शासनाने दखल घेतली, हे कौतुकास्पद आहे. जोशी यांचा हा सन्मान म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचा गौरव ठरला आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम आणि अन्य संतांच्या साहित्यातील चिंतन हे जगतानाला मार्गदर्शक ठरणारे असून, त्यांचे विचार जगाच्या कानाकोपºयात पोहोचवायचे असतील तर त्याला माहिती तंत्रज्ञानाची जोड देणे महत्त्वाचे ठरणार असल्याचे गडकरी यावेळी म्हणाले. दरवर्षी पंढरपूरला निघणाºया वारीतून अध्यात्मीत वातावरणाचे उत्सर्जन होत असते. या वारीसाठी आठ हजार कोटी रुपये खर्चुन देहू ते पंढरपूर आणि आळंदी ते पंढरपूर वारकरी पालखी मार्ग बांधण्यात येत आहे. त्याचे भूमीपुजन याच महिन्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते माझ्या उपस्थिती पार पडणार असल्याचे नितीन गडकरी यावेळी म्हणाले. संचालन रेणूका देशकर यांनी केले. तर आभार श्रीराम पांडे यांनी मानले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी