शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

१५ वर्षांत ‘ॲट्रॉसिटी’च्या गुन्ह्यात १४४ टक्क्यांनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2021 07:10 IST

Nagpur News १५ वर्षांच्या कालावधीत अनुसूचित जाती व जमातींविरोधातील गुन्ह्यात वाढच झाली आहे. २००६ च्या तुलनेत २०२० मध्ये ‘ॲट्रॉसिटी’चे गुन्हे थोडेथोडके नव्हे तर तब्बल १४४ टक्क्यांनी वाढले.

ठळक मुद्देपुरोगामी महाराष्ट्रातील दाहक वास्तवखैरलांजीच्या चटक्यापासून धडा नाही, प्रशासनाचे नियंत्रण नाहीच

योगेश पांडे

नागपूर : पुरोगामी महाराष्ट्राची मान शरमेनी खाली घालायला लावणाऱ्या खैरलांजी हत्याकांडाला १५ वर्षे झाली आहेत. मात्र या घटनेपासून समाजाने, प्रशासनाने व कुठल्याही सरकारने धडा घेतलेला नाही. १५ वर्षांच्या कालावधीत अनुसूचित जाती व जमातींविरोधातील गुन्ह्यात वाढच झाली आहे. २००६ च्या तुलनेत २०२० मध्ये ‘ॲट्रॉसिटी’चे गुन्हे थोडेथोडके नव्हे तर तब्बल १४४ टक्क्यांनी वाढले. ही आकडेवारी राज्याच्या डोळ्यात अंजन टाकणारी आहे. (Atrocities increase by 144% in 15 years)

 

२९ सप्टेंबर २००६ रोजी खैरलांजी येथील भोतमांगे कुटुंबातील चौघा जणांची निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली होती. यानंतर समाजमन पेटून उठले होते. परंतु प्रत्यक्षात अनुसूचित जाती व जमातींवरील अन्याय मात्र कमी झाले नाहीत. २००६ साली राज्यात ‘ॲट्रॉसिटी’अंतर्गत १ हजार ३२० गुन्हे दाखल झाले होते. यात अनुसूचित जातींवरील अन्यायाची १ हजार ५३ तर अनुसूचित जमातींवरील अन्यायाची २६७ प्रकरणे होती. २०२० साली हाच आकडा अनुक्रमे २ हजार ५६९ व ६६३ इतका होता. वर्षभरात ३ हजार २३२ गुन्हे दाखल झाले. २००६ च्या तुलनेत ही संख्या १४४ टक्क्यांनी अधिक होती.

गुन्ह्यांचा दरदेखील वाढीस

लोकसंख्येच्या अनुषंगाने ‘ॲट्रॉसिटी’च्या गुन्ह्यांची संख्या तर वाढलीच, परंतु दुसरीकडे गुन्ह्यांचा दरदेखील वाढल्याचे दिसून आले. २००६ साली अनुसूचित जातीवरील अन्यायाच्या गुन्ह्यांचा दर १.० इतका होता. २०२० मध्ये हाच दर १९.४ इतका नोंदविल्या गेला.

राज्यात क्रमांकदेखील वाढला

२००६ साली गुन्हेदराच्या हिशेबाने महाराष्ट्राचा राज्यात सोळावा व आकड्यांच्या दृष्टीने आठवा क्रमांक होता. २०२० साली गुन्हेदराच्या बाबतीत राज्य दहाव्या तर एकूण गुन्ह्यांच्या संख्येच्या हिशेबाने पाचव्या स्थानावर होते.

 

टॅग्स :Courtन्यायालय