शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

१५ वर्षांत ‘ॲट्रॉसिटी’च्या गुन्ह्यात १४४ टक्क्यांनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2021 07:10 IST

Nagpur News १५ वर्षांच्या कालावधीत अनुसूचित जाती व जमातींविरोधातील गुन्ह्यात वाढच झाली आहे. २००६ च्या तुलनेत २०२० मध्ये ‘ॲट्रॉसिटी’चे गुन्हे थोडेथोडके नव्हे तर तब्बल १४४ टक्क्यांनी वाढले.

ठळक मुद्देपुरोगामी महाराष्ट्रातील दाहक वास्तवखैरलांजीच्या चटक्यापासून धडा नाही, प्रशासनाचे नियंत्रण नाहीच

योगेश पांडे

नागपूर : पुरोगामी महाराष्ट्राची मान शरमेनी खाली घालायला लावणाऱ्या खैरलांजी हत्याकांडाला १५ वर्षे झाली आहेत. मात्र या घटनेपासून समाजाने, प्रशासनाने व कुठल्याही सरकारने धडा घेतलेला नाही. १५ वर्षांच्या कालावधीत अनुसूचित जाती व जमातींविरोधातील गुन्ह्यात वाढच झाली आहे. २००६ च्या तुलनेत २०२० मध्ये ‘ॲट्रॉसिटी’चे गुन्हे थोडेथोडके नव्हे तर तब्बल १४४ टक्क्यांनी वाढले. ही आकडेवारी राज्याच्या डोळ्यात अंजन टाकणारी आहे. (Atrocities increase by 144% in 15 years)

 

२९ सप्टेंबर २००६ रोजी खैरलांजी येथील भोतमांगे कुटुंबातील चौघा जणांची निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली होती. यानंतर समाजमन पेटून उठले होते. परंतु प्रत्यक्षात अनुसूचित जाती व जमातींवरील अन्याय मात्र कमी झाले नाहीत. २००६ साली राज्यात ‘ॲट्रॉसिटी’अंतर्गत १ हजार ३२० गुन्हे दाखल झाले होते. यात अनुसूचित जातींवरील अन्यायाची १ हजार ५३ तर अनुसूचित जमातींवरील अन्यायाची २६७ प्रकरणे होती. २०२० साली हाच आकडा अनुक्रमे २ हजार ५६९ व ६६३ इतका होता. वर्षभरात ३ हजार २३२ गुन्हे दाखल झाले. २००६ च्या तुलनेत ही संख्या १४४ टक्क्यांनी अधिक होती.

गुन्ह्यांचा दरदेखील वाढीस

लोकसंख्येच्या अनुषंगाने ‘ॲट्रॉसिटी’च्या गुन्ह्यांची संख्या तर वाढलीच, परंतु दुसरीकडे गुन्ह्यांचा दरदेखील वाढल्याचे दिसून आले. २००६ साली अनुसूचित जातीवरील अन्यायाच्या गुन्ह्यांचा दर १.० इतका होता. २०२० मध्ये हाच दर १९.४ इतका नोंदविल्या गेला.

राज्यात क्रमांकदेखील वाढला

२००६ साली गुन्हेदराच्या हिशेबाने महाराष्ट्राचा राज्यात सोळावा व आकड्यांच्या दृष्टीने आठवा क्रमांक होता. २०२० साली गुन्हेदराच्या बाबतीत राज्य दहाव्या तर एकूण गुन्ह्यांच्या संख्येच्या हिशेबाने पाचव्या स्थानावर होते.

 

टॅग्स :Courtन्यायालय