शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

अन् नागपूरशी अटलजींचे जुळले कौटुंबिक नाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 22:17 IST

साधारणत: एखादी व्यक्ती राजकारणात उच्च पदावर पोहोचली की कुटुंबीयांपासून काही प्रमाणात दुरावत जाते. मात्र सर्वच बाबतीत वेगळेपण जपलेले माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी कुटुंबीयांना कधीच अंतर दिले नाही. ते स्वत: जरी अविवाहित असले तरी भावाबहिणींच्या कुटुंबाला त्यांनी नेहमी आपले मानून जिव्हाळा दिला. संघाच्या माध्यमातून नागपूरशी जुळणाऱ्या अटलजींचा शहराशी कौटुंबिक संबंधदेखील आला. सख्खी भाची अनिता पांडे यांना भेटण्यासाठी कुठलाही बडेजाव न करता अटलजी नागपुरात आले होते.

ठळक मुद्देसख्ख्या भाचीला भेटण्यासाठी अनेकदा आले उपराजधानीत : कुटुंबीयांना कधीच दिले नाही अंतर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : साधारणत: एखादी व्यक्ती राजकारणात उच्च पदावर पोहोचली की कुटुंबीयांपासून काही प्रमाणात दुरावत जाते. मात्र सर्वच बाबतीत वेगळेपण जपलेले माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी कुटुंबीयांना कधीच अंतर दिले नाही. ते स्वत: जरी अविवाहित असले तरी भावाबहिणींच्या कुटुंबाला त्यांनी नेहमी आपले मानून जिव्हाळा दिला. संघाच्या माध्यमातून नागपूरशी जुळणाऱ्या अटलजींचा शहराशी कौटुंबिक संबंधदेखील आला. सख्खी भाची अनिता पांडे यांना भेटण्यासाठी कुठलाही बडेजाव न करता अटलजी नागपुरात आले होते.अटलबिहारी वाजपेयी यांना तीन बहिणी होत्या. त्यांची सर्वात लहान बहीण उर्मिलावर अटलजींचा विशेष जीव होता. उर्मिला यांची मुलगी अनिता यांचा नागपुरातील ओमप्रकाश पांडे यांच्याशी १९८५ साली विवाह झाला आणि एका नव्या नात्याने नागपूर अटलजींशी जोडल्या गेले. ‘लोकमत’ने देवनगर येथे राहणाऱ्या अनिता पांडे यांच्याकडून अटलबिहारी वाजपेयी यांच्यातील कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्व जाणून घेतले.बच्चे कंपनीचे होते ते ‘मामू’आमच्या लहानपणी अटलजी आमचे आवडते ‘मामू’ होते. कामातून वेळ मिळाला की ते हमखास ग्वाल्हेरला यायचे व आमच्यासमवेत वेळ घालवायचे. मुलांना तर ते फारच आवडायचे. ‘चलो कही घूम आते है..’ असे ते म्हणायचे आणि सर्व मुलांना घेऊन कधी जत्रा, कधी चित्रपट पाहण्यासाठी घेऊन जायचे. त्यांना चांगल्या चित्रपटांची आवड होती, असे अनिता पांडे यांनी सांगितले.नागपूरची कचोरी व कढीचे होते चाहतेमाझे मामा अटलबिहारी वाजपेयी हे खवय्ये होते. त्यांना महाराष्ट्रीयन पदार्थदेखील आवडत असत. नागपूरला आले की कचोरी, मुगाचे वडे, बुंदीचे लाडू यांची फर्माईश तर असायचीच शिवाय कढीचे ते चाहते होते. नागपुरात ते आमच्याच घरी जेवत असत. एकदा घरी यायला वेळ नसल्यामुळे त्यांनी नाश्ताच विमानतळावर मागवून घेतला होता. प्रकृती ठीक नसताना त्यांच्यासाठी साधे जेवण बनायचे. त्यावेळी ते हट्टाने सर्वांसाठी बनलेले जेवण मागायचे, अशी आठवण सांगताना अनिता पांडे यांचे डोळे भरून आले होते.लग्नानंतर दिले ‘सरप्राईज’माझे लग्न १९८५ साली झाले व त्यात अटलबिहारी वाजपेयी आवर्जून उपस्थित होते. लग्न झाल्यानंतर आठवडाभरातच ते नागपूरला माझ्या सासरी आले. कुठलीही पूर्वकल्पना न देता ते आले होते व लाडक्या भाचीला माहेरी मांडवपरतणीसाठी नेण्यासाठी हे ‘सरप्राईज’ दिले असल्याचे त्यांनी सांगितले होते.नातवांत व्हायचे रममाणअटलबिहारी वाजपेयी यांनी नातवांसमवेतदेखील जिव्हाळा कायम ठेवला होता. आपला भाचा-भाची यांच्या मुलांची प्रकृती, शिक्षण इत्यादींची ते निमयित विचारपूस करत. माझी मुलगी प्रियंका हिला ते नेहमी ‘चिकू’ अशी हाक मारायचे. घरी आले की ‘हम तो चिकू खाने है... कहा है हमारी चिकू’ असे म्हणत प्रियंकाला बोलवायचे. घरी आल्यावर बच्चेकंपनीसमवेत ते वय विसरून रममाण व्हायचे, अशी आठवण अनिता पांडे यांनी सांगितली. 

 

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीnagpurनागपूर