शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
3
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
4
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
5
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
6
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
7
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
8
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
9
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
10
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
11
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
12
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
13
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
14
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
15
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
16
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
17
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
18
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
19
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
20
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर

अन् नागपूरशी अटलजींचे जुळले कौटुंबिक नाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 22:17 IST

साधारणत: एखादी व्यक्ती राजकारणात उच्च पदावर पोहोचली की कुटुंबीयांपासून काही प्रमाणात दुरावत जाते. मात्र सर्वच बाबतीत वेगळेपण जपलेले माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी कुटुंबीयांना कधीच अंतर दिले नाही. ते स्वत: जरी अविवाहित असले तरी भावाबहिणींच्या कुटुंबाला त्यांनी नेहमी आपले मानून जिव्हाळा दिला. संघाच्या माध्यमातून नागपूरशी जुळणाऱ्या अटलजींचा शहराशी कौटुंबिक संबंधदेखील आला. सख्खी भाची अनिता पांडे यांना भेटण्यासाठी कुठलाही बडेजाव न करता अटलजी नागपुरात आले होते.

ठळक मुद्देसख्ख्या भाचीला भेटण्यासाठी अनेकदा आले उपराजधानीत : कुटुंबीयांना कधीच दिले नाही अंतर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : साधारणत: एखादी व्यक्ती राजकारणात उच्च पदावर पोहोचली की कुटुंबीयांपासून काही प्रमाणात दुरावत जाते. मात्र सर्वच बाबतीत वेगळेपण जपलेले माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी कुटुंबीयांना कधीच अंतर दिले नाही. ते स्वत: जरी अविवाहित असले तरी भावाबहिणींच्या कुटुंबाला त्यांनी नेहमी आपले मानून जिव्हाळा दिला. संघाच्या माध्यमातून नागपूरशी जुळणाऱ्या अटलजींचा शहराशी कौटुंबिक संबंधदेखील आला. सख्खी भाची अनिता पांडे यांना भेटण्यासाठी कुठलाही बडेजाव न करता अटलजी नागपुरात आले होते.अटलबिहारी वाजपेयी यांना तीन बहिणी होत्या. त्यांची सर्वात लहान बहीण उर्मिलावर अटलजींचा विशेष जीव होता. उर्मिला यांची मुलगी अनिता यांचा नागपुरातील ओमप्रकाश पांडे यांच्याशी १९८५ साली विवाह झाला आणि एका नव्या नात्याने नागपूर अटलजींशी जोडल्या गेले. ‘लोकमत’ने देवनगर येथे राहणाऱ्या अनिता पांडे यांच्याकडून अटलबिहारी वाजपेयी यांच्यातील कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्व जाणून घेतले.बच्चे कंपनीचे होते ते ‘मामू’आमच्या लहानपणी अटलजी आमचे आवडते ‘मामू’ होते. कामातून वेळ मिळाला की ते हमखास ग्वाल्हेरला यायचे व आमच्यासमवेत वेळ घालवायचे. मुलांना तर ते फारच आवडायचे. ‘चलो कही घूम आते है..’ असे ते म्हणायचे आणि सर्व मुलांना घेऊन कधी जत्रा, कधी चित्रपट पाहण्यासाठी घेऊन जायचे. त्यांना चांगल्या चित्रपटांची आवड होती, असे अनिता पांडे यांनी सांगितले.नागपूरची कचोरी व कढीचे होते चाहतेमाझे मामा अटलबिहारी वाजपेयी हे खवय्ये होते. त्यांना महाराष्ट्रीयन पदार्थदेखील आवडत असत. नागपूरला आले की कचोरी, मुगाचे वडे, बुंदीचे लाडू यांची फर्माईश तर असायचीच शिवाय कढीचे ते चाहते होते. नागपुरात ते आमच्याच घरी जेवत असत. एकदा घरी यायला वेळ नसल्यामुळे त्यांनी नाश्ताच विमानतळावर मागवून घेतला होता. प्रकृती ठीक नसताना त्यांच्यासाठी साधे जेवण बनायचे. त्यावेळी ते हट्टाने सर्वांसाठी बनलेले जेवण मागायचे, अशी आठवण सांगताना अनिता पांडे यांचे डोळे भरून आले होते.लग्नानंतर दिले ‘सरप्राईज’माझे लग्न १९८५ साली झाले व त्यात अटलबिहारी वाजपेयी आवर्जून उपस्थित होते. लग्न झाल्यानंतर आठवडाभरातच ते नागपूरला माझ्या सासरी आले. कुठलीही पूर्वकल्पना न देता ते आले होते व लाडक्या भाचीला माहेरी मांडवपरतणीसाठी नेण्यासाठी हे ‘सरप्राईज’ दिले असल्याचे त्यांनी सांगितले होते.नातवांत व्हायचे रममाणअटलबिहारी वाजपेयी यांनी नातवांसमवेतदेखील जिव्हाळा कायम ठेवला होता. आपला भाचा-भाची यांच्या मुलांची प्रकृती, शिक्षण इत्यादींची ते निमयित विचारपूस करत. माझी मुलगी प्रियंका हिला ते नेहमी ‘चिकू’ अशी हाक मारायचे. घरी आले की ‘हम तो चिकू खाने है... कहा है हमारी चिकू’ असे म्हणत प्रियंकाला बोलवायचे. घरी आल्यावर बच्चेकंपनीसमवेत ते वय विसरून रममाण व्हायचे, अशी आठवण अनिता पांडे यांनी सांगितली. 

 

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीnagpurनागपूर