शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

नागपूरकरांमध्ये वाढला १० टक्क्याने अस्थमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 11:49 IST

धुळीमुळे व वाहनांतून निघणाऱ्या विषारी धुरांमुळेही अस्थमा म्हणजे दम्याचे रुग्ण वाढत आहे. नागपुरात हा आजार १० टक्क्याने वाढल्याची माहिती पल्मनोलॉजिस्ट डॉ. विक्रांत देशमुख यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देयोग्य उपचाराच्या अभावामुळे १५ ते ३९ वयोगटात मृत्यूचे दुसरे कारण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धुळीमुळे दमा होण्याची शक्यता ५० ते ६० टक्के असते. सध्या नागपुरात मेट्रो, सिमेंट रस्ते व इमारतीचे बांधकाम प्रचंड प्रमाणात सुरू आहे. यातून उडणाऱ्या धुळीमुळे व वाहनांतून निघणाऱ्या विषारी धुरांमुळेही अस्थमा म्हणजे दम्याचे रुग्ण वाढत आहे. नागपुरात हा आजार १० टक्क्याने वाढल्याची माहिती पल्मनोलॉजिस्ट डॉ. विक्रांत देशमुख यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली. यावेळी त्यांच्यासोबत डॉ. विनित निरंजने उपस्थित होते.डॉ. देशमुख म्हणाले, दम्यावर श्वसनमार्गे घेण्यात येणारी प्रभावी औषधे (इन्हेलर) आहेत. परंतु या औषधांना घेऊन अनेक गैरसमज आहे. हे गैरसमजच हा आजार गंभीर होण्यास कारणीभूत ठरत आहे. जर या उपकरणांचा योग्य पद्धतीने वापर केला गेला नाही तर परिस्थती बिघडू शकते. राज्यात ४० ते ६९ वयोगटातील व्यक्तींच्या मृत्यूच्या कारणांमध्ये जुनाट श्वसनाच्या आजाराचे कारण पहिल्या क्रमांकावर आहे. १५ ते ३९ या वयोगटातील व्यक्तींच्या मृत्यूच्या कारणामध्ये ते दुसऱ्या क्रमांकावर आहे. १९९० मध्ये व्यक्तींच्या मृत्यूचे व अपंगत्वाचे नवव्या क्रमांकाचे कारण असलेली ‘सीओपीडी’ हे २०१६ मध्ये दुसऱ्या क्रमांकाचे कारण म्हणून समोर आले आहे. यातून श्वसनाच्या आजाराचे ओझे आणि त्यांच्या नियमनाची गरज रेखांकित होते.डॉ. विनित निरंजने म्हणाले, भारतातील फिजिशियनचे ज्ञान आणि ‘इन्हलेशन थेरपी’ याचा आढावा घेणाऱ्या एका अभ्यासातून असे लक्षात आले की, इन्हेलरचा चुकीचा वापर केला जात असल्याने श्वसनाच्या आजारावरील उपचारांचे सकारात्मक परिणाम कमी झाल्याचे दिसून आले आहे. दम्याच्या नियमनाचे शिक्षण व त्याबद्दल जागृती निर्माण करणे ही काळाची गरज आहे. साधारण ८० टक्के रुग्ण इन्हेलरचा योग्य वापर करत नसल्याचेही आढळून आले आहे. रुग्णांना इन्हेलर वापरण्याचा प्रशिक्षणावर जोर देण्याची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :Healthआरोग्य