शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

नागपूरकरांमध्ये वाढला १० टक्क्याने अस्थमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 11:49 IST

धुळीमुळे व वाहनांतून निघणाऱ्या विषारी धुरांमुळेही अस्थमा म्हणजे दम्याचे रुग्ण वाढत आहे. नागपुरात हा आजार १० टक्क्याने वाढल्याची माहिती पल्मनोलॉजिस्ट डॉ. विक्रांत देशमुख यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देयोग्य उपचाराच्या अभावामुळे १५ ते ३९ वयोगटात मृत्यूचे दुसरे कारण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धुळीमुळे दमा होण्याची शक्यता ५० ते ६० टक्के असते. सध्या नागपुरात मेट्रो, सिमेंट रस्ते व इमारतीचे बांधकाम प्रचंड प्रमाणात सुरू आहे. यातून उडणाऱ्या धुळीमुळे व वाहनांतून निघणाऱ्या विषारी धुरांमुळेही अस्थमा म्हणजे दम्याचे रुग्ण वाढत आहे. नागपुरात हा आजार १० टक्क्याने वाढल्याची माहिती पल्मनोलॉजिस्ट डॉ. विक्रांत देशमुख यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली. यावेळी त्यांच्यासोबत डॉ. विनित निरंजने उपस्थित होते.डॉ. देशमुख म्हणाले, दम्यावर श्वसनमार्गे घेण्यात येणारी प्रभावी औषधे (इन्हेलर) आहेत. परंतु या औषधांना घेऊन अनेक गैरसमज आहे. हे गैरसमजच हा आजार गंभीर होण्यास कारणीभूत ठरत आहे. जर या उपकरणांचा योग्य पद्धतीने वापर केला गेला नाही तर परिस्थती बिघडू शकते. राज्यात ४० ते ६९ वयोगटातील व्यक्तींच्या मृत्यूच्या कारणांमध्ये जुनाट श्वसनाच्या आजाराचे कारण पहिल्या क्रमांकावर आहे. १५ ते ३९ या वयोगटातील व्यक्तींच्या मृत्यूच्या कारणामध्ये ते दुसऱ्या क्रमांकावर आहे. १९९० मध्ये व्यक्तींच्या मृत्यूचे व अपंगत्वाचे नवव्या क्रमांकाचे कारण असलेली ‘सीओपीडी’ हे २०१६ मध्ये दुसऱ्या क्रमांकाचे कारण म्हणून समोर आले आहे. यातून श्वसनाच्या आजाराचे ओझे आणि त्यांच्या नियमनाची गरज रेखांकित होते.डॉ. विनित निरंजने म्हणाले, भारतातील फिजिशियनचे ज्ञान आणि ‘इन्हलेशन थेरपी’ याचा आढावा घेणाऱ्या एका अभ्यासातून असे लक्षात आले की, इन्हेलरचा चुकीचा वापर केला जात असल्याने श्वसनाच्या आजारावरील उपचारांचे सकारात्मक परिणाम कमी झाल्याचे दिसून आले आहे. दम्याच्या नियमनाचे शिक्षण व त्याबद्दल जागृती निर्माण करणे ही काळाची गरज आहे. साधारण ८० टक्के रुग्ण इन्हेलरचा योग्य वापर करत नसल्याचेही आढळून आले आहे. रुग्णांना इन्हेलर वापरण्याचा प्रशिक्षणावर जोर देण्याची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :Healthआरोग्य