शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
3
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
4
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
5
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
6
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
7
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
9
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
10
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
11
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
12
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
13
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
14
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
15
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
16
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
17
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
18
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
19
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

आईस्प्रोड विकणाऱ्या मुलाने जागविली समाजाची ‘अस्मिता’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 00:23 IST

‘तो’ही हंसापुरीच्या कारखान्यातून आईस्प्रोड आणून विकायचा. पण, पैसे पुरायचे नाहीत म्हणून माचिस कंपनीत काम धरले. येथील मालकाने ‘त्याला’ खालच्या जातीचा आहे, म्हणून थेट कामावरूनच काढले. हा ‘त्याच्या’ अस्मिेतवरचा पहिला आघात. त्यानेच विद्रोहाची ठिणगी मनात पेरली अन् आईस्प्रोड विकणाऱ्या याच मुलाने आपल्या लेखनीला शस्त्र बनवून अवघ्या समाजाची अस्मिता जागवली.

ठळक मुद्देकुटुंबीयांनी सांगितली संघर्षगाथा : गंगाधर पानतावणेंचे आयुष्य ठरले पथदर्शक

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सात भावंडामधून ‘ते’ सहाव्या क्रमांकाचे. वडील विठोबा मिल कामगार होते. अठराविश्व दारिद्रयाचे ग्रहण घराला कायम लागलेले. पोटाची खळगी भरण्यासाठी सारेच भाऊ कायम श्रमाला जुंपलेले. याच क्रमात ‘तो’ही हंसापुरीच्या कारखान्यातून आईस्प्रोड आणून विकायचा. पण, पैसे पुरायचे नाहीत म्हणून माचिस कंपनीत काम धरले. येथील मालकाने ‘त्याला’ खालच्या जातीचा आहे, म्हणून थेट कामावरूनच काढले. हा ‘त्याच्या’ अस्मिेतवरचा पहिला आघात. त्यानेच विद्रोहाची ठिणगी मनात पेरली अन् आईस्प्रोड विकणाऱ्या याच मुलाने आपल्या लेखनीला शस्त्र बनवून अवघ्या समाजाची अस्मिता जागवली. या मुलाचे नाव होते गंगाधर पानतावणे. मंगळवारी त्यांचे निर्वान झालेअन् त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलेल्या संघर्षगाथेतून त्यांच्या नागपुरातील वास्तव्याचा खडतर प्रवास नव्याने अधोरेखित झाला. नागपूरच्या पाचपावली वस्तीत १९३७ साली त्यांचा जन्म झाला. त्यांचे कुटुंब आजही त्या घरी राहते. त्यांचे पुतणे सुरेश पानतावणे यांनी लोकमतशी बोलताना गंगाधर पानतावणे यांच्या आठवणी सांगितल्या. वडील विठोबा मिल कामगार होते. मात्र शिक्षणाचे महत्त्व त्यांनी ओळखले होते. पाचपावलीत आजही उभी असलेली एससीएस मुलींची शाळा सुरू करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. पानतावणेंनी अपार कष्ट करतानाही वाचनाची आवड जपली. डॉ. बाबासाहेबांचे मुकनायक मधील लेख ते आवर्जुन वाचायचे. संत तुकाराम, संत चोखामेळा यांचे अभंग त्यांना मुखोद््गत होते. नागपूरला शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनच्या नेत्यांचे व्याख्यान असले की सर्व काम सोडून ते हजेरी लावायचे. बाबासाहेबांनी दीक्षाभूमीवर धम्मदीक्षा घेतली तेव्हा लाखो अनुयांयामध्ये त्यांचाही सहभाग होता. त्यांचे मोठे बंधू सदाभाऊ हिंदू महासभेच्या कार्यात सहभागी झाल्याने सर्व कुटुंबीयांनी त्यांच्याशी नाते तोडल्याची आठवण सुरेश यांनी सांगितली. डॉ. पानतावणे यांना पाचपावली वस्तीविषयी विशेष आपुलकी होती. बाबासाहेबांच्या निधनानंतर त्यांनी ‘माणुसकीचे बंड’ या नाटकाचे लेखन करून मित्रांसोबत वस्तीमध्ये सादर केल्याचेही त्यांनी सांगितले. डॉ. भाऊ लोखंडे व प्रा. रणजित मेश्राम यांनीही त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. भाऊ व त्यांचे सहकारी त्यांना गुरू म्हणायचे. त्यांच्या खोलीमध्ये राहून शिक्षण घेतल्याची आठवण त्यांनी जागवली. असे हे माणूस घडविणारे विद्यापीठ आज काळाच्या पडद्याआड गेल्याने जगभरातील त्यांच्या चाहत्यांसह नागपूरही हळहळले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने पाचपावली तर सुन्न झाली होती.

टॅग्स :nagpurनागपूरDeathमृत्यू