शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

‘एस्मा’नतंरही नागपुरातील मनपाची शहर बस वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 01:15 IST

राज्य शासनाने महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण अधिनियम २०११ (एस्मा) च्या तरतुदीनुसार मंगळवारी आपली बस कर्मचाऱ्यांच्या संपावर बंदी घातली. त्यानतंर शिवसेनाप्रणीत भारतीय कामगार सेनेने संप अखेर मागे घेण्यात आल्याची घोषणा के ली होती. सकाळी १० पर्यंत बस वाहतूक बंदच होती. त्यानंतर काही बसेस सुरू झाल्या. दुपारी ३ वाजेपर्यंत शहरातील रस्त्यांवर जेमतेम ५० बसेस सुरू होत्या. ३२५ बसेस डेपोतच उभ्या असल्याने शहर बससेवा ठप्पच होती. यामुळे विद्यार्थी व प्रवाशांना कमालीचा मनस्ताप सहन करावा लागला. एस्मानंतरही कामावर रुजू न झाल्याने महापालिकेच्या परिवहन विभागाने १८ चालक व वाहकांना सेवेतून बडतर्फ केले आहे.

ठळक मुद्देविद्यार्थी व प्रवाशांचे हाल : १८ आंदोलक कर्मचारी बडतर्फ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर - राज्य शासनाने महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण अधिनियम २०११ (एस्मा) च्या तरतुदीनुसार मंगळवारी आपली बस कर्मचाऱ्यांच्या संपावर बंदी घातली. त्यानतंर शिवसेनाप्रणीत भारतीय कामगार सेनेने संप अखेर मागे घेण्यात आल्याची घोषणा के ली होती. सकाळी १० पर्यंत बस वाहतूक बंदच होती. त्यानंतर काही बसेस सुरू झाल्या. दुपारी ३ वाजेपर्यंत शहरातील रस्त्यांवर जेमतेम ५० बसेस सुरू होत्या. ३२५ बसेस डेपोतच उभ्या असल्याने शहर बससेवा ठप्पच होती. यामुळे विद्यार्थी व प्रवाशांना कमालीचा मनस्ताप सहन करावा लागला. एस्मानंतरही कामावर रुजू न झाल्याने महापालिकेच्या परिवहन विभागाने १८ चालक व वाहकांना सेवेतून बडतर्फ केले आहे.बुधवारी १२ वीच्या परीक्षा सुरू झाल्या. परंतु शहर बसेस बंद असल्याने परीक्षा केंद्रावर पोहचण्यासाठी विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागला. वास्तविक शासनाने एस्मा लागू केल्यानंतर बुधवारी शहर बससेवा सुरळीत सुरू होईल, अशी अपेक्षा होती. परंतु सकाळी १० पर्यंत बस वाहतूक ठप्पच होती. विद्यार्थ्यांना सुविधा व्हावी यासाठी १० च्या सुमारास काही बसेस विनाकंडक्टर सोडण्यात आल्या. यात प्रामुख्याने मोरभवन, हिंगणा, बुटीबोरी, कळमेश्वर आदी भागातील फेºयांचा समावेश होता. यासाठी खासगी बस चालकांची मदत घेण्यात आली. दुपारी ३ नंतर शहरातील रस्त्यांवर १०० बसेस सुरू झाल्याचा दावा परिवहन विभागाने केला आहे. म्हणजे सायंकाळीसुद्धा ३७५ पैकी जेमतेम १०० बसेस रस्त्यांवर उतरल्या होत्या. यामुळे प्रवाशांना आॅटो वा टॅक्सीने प्रवास करावा लागला. शहर बस संपामुळे आॅटोचालकांची चांगली क माई झाली.किमान वेतनाच्या मागणीसाठी मंगळवारी शहर बस कर्मचाºयांनी संप पुकारल्याने शहरातील रस्त्यावर एकही बस धावली नव्हती. एस्मामुळे कामगार संघटनेने संप मागे घेण्याची घोषणा केली. परंतु याचा परिणाम दिसला नाही. परिवहन व्यवस्थान व कामगार संघटनांचे पदाधिकारी यांच्यात समन्वय नसल्याने सायंकाळपर्यंत संपाचा घोळ सुरू होता. याचा नागरिकांना हकनाक फटका बसला.कर्मचाऱ्यांचा नव्हे शिवसेनेचा बंदराज्य शासनाने एस्मा लागू केल्यानंतर शहर बस कर्मचारी कामावर परततील, अशी अपेक्षा होती. संप मागे घ्यावा, यासाठी आयुक्तांनी तीनवेळा कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनीही फोनवरून चर्चा केली. शिवसेनेच्या तथाकथित नेत्यांनी चिथावणी दिल्याने कर्मचारी कामावर परतले नाही. हा बंद कर्मचाऱ्यांचा नव्हे तर शिवसेनेच्या तथाकथित नेत्यांचा असल्याचा आरोप परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे यांनी केला आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा विचारात घेता, सकाळी बसेस सुरळीत सुरू व्हाव्यात यासाठी पोलीस आयुक्तांसह विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. परंतु पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली.                       संपकर्त्यांवर णतीही कारवाई केली नाही. सकाळी काही बसेस सोडण्यात आल्या. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर मोफत सोडण्यात आले. परंतु हिंगणा मार्गावर संपक र्त्यांनी बस अडवून दगडफेक केली. चालकाला धमकी दिली. यामुळे काही बसेस परत आल्या. यासंदर्भात एमआयडीसी पोलिसात तक्रार नोंदविण्यात आल्याची माहिती बंटी कुकडे यांनी दिली. सकाळी ९.३० पासून विविध मार्गावर ५० बसेस सोडण्यात आल्या. सायंकाळी १०० बसेस सुरू करण्यात यश आल्याचे त्यांनी सांगितले.न्यायालयीन लढाई लढणारमंगळवारी महापालिकेची सभा संपल्यानंतर पदाधिकारी व अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत चर्चेसाठी येतील, अशी अपेक्षा होती. परंतु तोडगा न काढता एस्मा लावण्यात आला. ही लोकशाहीची हत्या आहे. बारावीची परीक्षा सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून हा संप मागे घेण्यात येत आहे. असे असले तरी कर्मचाऱ्यांवर जो महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण अधिनियम (एस्मा) लावण्यात आला त्या विरोधात न्यायालयात लढाई लढणार असल्याचे या संघटनेचे नेते व माजी नगरसेवक बंडू तळवेकर व संघटनेचे सचिव अंबादास शेंडे यांनी सांगितले.असे आहेत बडतर्फ कर्मचारीसंपात सहभागी झाल्यामुळे अंबादास शेंडे, भाऊराव रेवतकर, राज सरोदे, विशाल राऊत, यशवंत शिंदे, पंडित राठोड, नरेंद्र कुईरे, अश्विन वाघमारे, प्रदीप चकोले, वसंत खडसे, राजेश गुप्ता, विशाल राऊत, शरद कलेश्वर, प्रशांत कडबे, रितेश चावरे, पवन क्षत्रे, भूमेश वाघमारे, क्रांती काळे, चेकर मनोज करोकर आदींना नोकरीतून बडतर्फ करण्यात आले आहे.प्रशासनाला अपयशआजवर चारवेळा बस कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. संपामुळे वेळोवेळी प्रवाशांची गैरसोय होते. याचा विचार करता पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याचे परिवहन विभागाला निर्देश दिले होते. परंतु कोणतीही पर्यायी व्यवस्था निर्माण केलेली नाही. हे विभागाचे अपयश आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री, महापौर, सत्तापक्षनेते व आयुक्त यांच्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती बंटी कुकडे यांनी पत्रकारांना दिली.मनपाला ३५ लाखांचा फटकागेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या शहर बस कर्मचाऱ्यांच्या संपामुळे महापालिकेला ३५ लाखांचा फटका बसला आहे. बुधवारी सकाळी नवीन ६० चालकांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर दुपारपासून १४५ बसेसची वाहतूक सुरू झाली. यात आर.के.आॅपरेटरच्या ४४, हंसाच्या ६६ व ट्रॅव्हल टाईमच्या ३५ बसेसचा समावेश आहे. सर्व प्र्रवाशांची मोफत वाहतूक करण्यात आली. एस्मा अंतर्गत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. हिंगणा नाक्यावर बस क्रमांक एमएच ६०६५ ची तोडफोड करण्यात आल्याची माहिती परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी दिली.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाBus Driverबसचालक