शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

‘एस्मा’नतंरही नागपुरातील मनपाची शहर बस वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 01:15 IST

राज्य शासनाने महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण अधिनियम २०११ (एस्मा) च्या तरतुदीनुसार मंगळवारी आपली बस कर्मचाऱ्यांच्या संपावर बंदी घातली. त्यानतंर शिवसेनाप्रणीत भारतीय कामगार सेनेने संप अखेर मागे घेण्यात आल्याची घोषणा के ली होती. सकाळी १० पर्यंत बस वाहतूक बंदच होती. त्यानंतर काही बसेस सुरू झाल्या. दुपारी ३ वाजेपर्यंत शहरातील रस्त्यांवर जेमतेम ५० बसेस सुरू होत्या. ३२५ बसेस डेपोतच उभ्या असल्याने शहर बससेवा ठप्पच होती. यामुळे विद्यार्थी व प्रवाशांना कमालीचा मनस्ताप सहन करावा लागला. एस्मानंतरही कामावर रुजू न झाल्याने महापालिकेच्या परिवहन विभागाने १८ चालक व वाहकांना सेवेतून बडतर्फ केले आहे.

ठळक मुद्देविद्यार्थी व प्रवाशांचे हाल : १८ आंदोलक कर्मचारी बडतर्फ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर - राज्य शासनाने महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण अधिनियम २०११ (एस्मा) च्या तरतुदीनुसार मंगळवारी आपली बस कर्मचाऱ्यांच्या संपावर बंदी घातली. त्यानतंर शिवसेनाप्रणीत भारतीय कामगार सेनेने संप अखेर मागे घेण्यात आल्याची घोषणा के ली होती. सकाळी १० पर्यंत बस वाहतूक बंदच होती. त्यानंतर काही बसेस सुरू झाल्या. दुपारी ३ वाजेपर्यंत शहरातील रस्त्यांवर जेमतेम ५० बसेस सुरू होत्या. ३२५ बसेस डेपोतच उभ्या असल्याने शहर बससेवा ठप्पच होती. यामुळे विद्यार्थी व प्रवाशांना कमालीचा मनस्ताप सहन करावा लागला. एस्मानंतरही कामावर रुजू न झाल्याने महापालिकेच्या परिवहन विभागाने १८ चालक व वाहकांना सेवेतून बडतर्फ केले आहे.बुधवारी १२ वीच्या परीक्षा सुरू झाल्या. परंतु शहर बसेस बंद असल्याने परीक्षा केंद्रावर पोहचण्यासाठी विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागला. वास्तविक शासनाने एस्मा लागू केल्यानंतर बुधवारी शहर बससेवा सुरळीत सुरू होईल, अशी अपेक्षा होती. परंतु सकाळी १० पर्यंत बस वाहतूक ठप्पच होती. विद्यार्थ्यांना सुविधा व्हावी यासाठी १० च्या सुमारास काही बसेस विनाकंडक्टर सोडण्यात आल्या. यात प्रामुख्याने मोरभवन, हिंगणा, बुटीबोरी, कळमेश्वर आदी भागातील फेºयांचा समावेश होता. यासाठी खासगी बस चालकांची मदत घेण्यात आली. दुपारी ३ नंतर शहरातील रस्त्यांवर १०० बसेस सुरू झाल्याचा दावा परिवहन विभागाने केला आहे. म्हणजे सायंकाळीसुद्धा ३७५ पैकी जेमतेम १०० बसेस रस्त्यांवर उतरल्या होत्या. यामुळे प्रवाशांना आॅटो वा टॅक्सीने प्रवास करावा लागला. शहर बस संपामुळे आॅटोचालकांची चांगली क माई झाली.किमान वेतनाच्या मागणीसाठी मंगळवारी शहर बस कर्मचाºयांनी संप पुकारल्याने शहरातील रस्त्यावर एकही बस धावली नव्हती. एस्मामुळे कामगार संघटनेने संप मागे घेण्याची घोषणा केली. परंतु याचा परिणाम दिसला नाही. परिवहन व्यवस्थान व कामगार संघटनांचे पदाधिकारी यांच्यात समन्वय नसल्याने सायंकाळपर्यंत संपाचा घोळ सुरू होता. याचा नागरिकांना हकनाक फटका बसला.कर्मचाऱ्यांचा नव्हे शिवसेनेचा बंदराज्य शासनाने एस्मा लागू केल्यानंतर शहर बस कर्मचारी कामावर परततील, अशी अपेक्षा होती. संप मागे घ्यावा, यासाठी आयुक्तांनी तीनवेळा कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनीही फोनवरून चर्चा केली. शिवसेनेच्या तथाकथित नेत्यांनी चिथावणी दिल्याने कर्मचारी कामावर परतले नाही. हा बंद कर्मचाऱ्यांचा नव्हे तर शिवसेनेच्या तथाकथित नेत्यांचा असल्याचा आरोप परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे यांनी केला आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा विचारात घेता, सकाळी बसेस सुरळीत सुरू व्हाव्यात यासाठी पोलीस आयुक्तांसह विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. परंतु पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली.                       संपकर्त्यांवर णतीही कारवाई केली नाही. सकाळी काही बसेस सोडण्यात आल्या. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर मोफत सोडण्यात आले. परंतु हिंगणा मार्गावर संपक र्त्यांनी बस अडवून दगडफेक केली. चालकाला धमकी दिली. यामुळे काही बसेस परत आल्या. यासंदर्भात एमआयडीसी पोलिसात तक्रार नोंदविण्यात आल्याची माहिती बंटी कुकडे यांनी दिली. सकाळी ९.३० पासून विविध मार्गावर ५० बसेस सोडण्यात आल्या. सायंकाळी १०० बसेस सुरू करण्यात यश आल्याचे त्यांनी सांगितले.न्यायालयीन लढाई लढणारमंगळवारी महापालिकेची सभा संपल्यानंतर पदाधिकारी व अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत चर्चेसाठी येतील, अशी अपेक्षा होती. परंतु तोडगा न काढता एस्मा लावण्यात आला. ही लोकशाहीची हत्या आहे. बारावीची परीक्षा सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून हा संप मागे घेण्यात येत आहे. असे असले तरी कर्मचाऱ्यांवर जो महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण अधिनियम (एस्मा) लावण्यात आला त्या विरोधात न्यायालयात लढाई लढणार असल्याचे या संघटनेचे नेते व माजी नगरसेवक बंडू तळवेकर व संघटनेचे सचिव अंबादास शेंडे यांनी सांगितले.असे आहेत बडतर्फ कर्मचारीसंपात सहभागी झाल्यामुळे अंबादास शेंडे, भाऊराव रेवतकर, राज सरोदे, विशाल राऊत, यशवंत शिंदे, पंडित राठोड, नरेंद्र कुईरे, अश्विन वाघमारे, प्रदीप चकोले, वसंत खडसे, राजेश गुप्ता, विशाल राऊत, शरद कलेश्वर, प्रशांत कडबे, रितेश चावरे, पवन क्षत्रे, भूमेश वाघमारे, क्रांती काळे, चेकर मनोज करोकर आदींना नोकरीतून बडतर्फ करण्यात आले आहे.प्रशासनाला अपयशआजवर चारवेळा बस कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. संपामुळे वेळोवेळी प्रवाशांची गैरसोय होते. याचा विचार करता पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याचे परिवहन विभागाला निर्देश दिले होते. परंतु कोणतीही पर्यायी व्यवस्था निर्माण केलेली नाही. हे विभागाचे अपयश आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री, महापौर, सत्तापक्षनेते व आयुक्त यांच्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती बंटी कुकडे यांनी पत्रकारांना दिली.मनपाला ३५ लाखांचा फटकागेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या शहर बस कर्मचाऱ्यांच्या संपामुळे महापालिकेला ३५ लाखांचा फटका बसला आहे. बुधवारी सकाळी नवीन ६० चालकांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर दुपारपासून १४५ बसेसची वाहतूक सुरू झाली. यात आर.के.आॅपरेटरच्या ४४, हंसाच्या ६६ व ट्रॅव्हल टाईमच्या ३५ बसेसचा समावेश आहे. सर्व प्र्रवाशांची मोफत वाहतूक करण्यात आली. एस्मा अंतर्गत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. हिंगणा नाक्यावर बस क्रमांक एमएच ६०६५ ची तोडफोड करण्यात आल्याची माहिती परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी दिली.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाBus Driverबसचालक