शहरं
Join us  
Trending Stories
1
'देश वाचवण्यासाठी मी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
2
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
3
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
4
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
5
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
6
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
7
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांचा खोचक टोला
8
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
9
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
10
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
11
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
12
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
13
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
14
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
15
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
16
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
17
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
18
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
19
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर

आशिष जैस्वाल शिवसेनेवर नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 4:06 AM

नागपूर : सलग चार वेळा आमदार होऊनही मंत्रीपदी वर्णी न लागल्यामुळे रामटेकचे आमदार आशिष जैस्वाल हे नाराज आहेत. बाहेरून ...

नागपूर : सलग चार वेळा आमदार होऊनही मंत्रीपदी वर्णी न लागल्यामुळे रामटेकचे आमदार आशिष जैस्वाल हे नाराज आहेत. बाहेरून आलेल्यांना मंत्रीपदाची संधी मिळते. कार्यकर्त्यांना वाटते की, एवढी वर्षे काम केल्यावर मंत्री करायला हवे. शेवटी कुणाला मंत्री करावे, हा पक्षश्रेष्ठींचा निर्णय असतो, अशा शब्दांत जैस्वाल यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

बुधवारी पत्रकारांशी बोलताना आ. जैस्वाल म्हणाले, मी चार टर्म आमदार आहे. पक्षाने संधी न दिल्यामुळे कार्यकर्ते नाराज आहेत. गेल्या मंत्रिमंडळाचा विस्तार होता तेव्हाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील तो मी मान्य करेन, असे स्पष्ट केले होते. मात्र, ही बाब सत्य आहे की, कार्यकर्त्यांना असे वाटते की, एवढी वर्षे काम केल्यावर संधी मिळायला हवी. विदर्भात शिवसेना वाढली पाहिजे; पण नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत पक्षाचा एकही आमदार नाही. मी तर अपक्ष निवडून आलो. या सर्व परिस्थितीत मनाला वेदना होतात. दुख होते. ते दु:ख नेत्यांपुढे मांडणे माझे काम आहे. संधी मिळते तेव्हा मी ते मांडत असतो, अशा शब्दांत त्यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखविली.

----------

विदर्भात सेनेचा एकही मंत्री नाही

- विदर्भाला संजय राठोड यांच्या रूपात एक मंत्रीपद होते. दुर्दैवाने त्यांचा राजीनामा झाला. आता विदर्भातील अकरा जिल्ह्यांत शिवसेनेचा एकही मंत्री नाही. जेव्हा केव्हा विस्तार होईल, तेव्हा पक्षप्रमुख विदर्भाला न्याय देतील. तळागाळातील कार्यकर्त्यांना न्याय देतील, अशी खात्री आहे, असेही सांगत जैस्वाल यांनी अप्रत्यक्षपणे मंत्रीपदाची इच्छा व्यक्त केली आहे.

--------

कोट....

राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. अनेक अपक्षांना शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रीपद दिले गेले. त्यामुळे माझ्यासारख्या वर्षानुवर्षे काम करणाऱ्या अनेकांना पक्ष न्याय देऊ शकला नाही.

-आ. आशिष जैस्वाल