शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आषाढीला कुर्बानी देणार नाही; यवतमाळ जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2023 18:57 IST

Yawatmal News आषाढी एकादशीला कुर्बानी न देण्याचा निर्णय बाभूळगाव येथील मुस्लिम बांधवांनी घेतला आहे. ईदच्या दिवशी होणारी कुर्बानी गुरुवारऐवजी शुक्रवार आणि शनिवारी केली जाईल.

विलास गावंडे 

यवतमाळ : आषाढी एकादशीला कुर्बानी न देण्याचा निर्णय बाभूळगाव व दारव्हा तालुक्यातील नऊ गावांमधील मुस्लिम बांधवांनी घेतला आहे. शांतता समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय जाहीर करण्यात आला. संबंधित गावातील मशीद कमिटी आणि मौलवींनी पोलिस ठाण्याला तसे निवेदनही दिले आहे. बाभूळगाव येथील पोलिस ठाण्याच्या प्रांगणात उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या अध्यक्षतेत झालेल्या शांतता समितीच्या सभेत ईदच्या दिवशी होणारी कुर्बानी गुरुवारऐवजी शुक्रवार आणि शनिवारी केली जाईल, अशी माहिती देण्यात आली.

संवेदनशील तालुका अशी दारव्हाची ओळख आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील रामगाव रामेश्वर, हरू, तरनोळी, जवळा, सिंधी, पळशी, तरोडा, पेकर्डा, लोणी या गावांमध्ये ईदनिमित्त शांतता समितीची बैठक घेण्यात आली. तेथील मुस्लीम समाजबांधव आणि नागरिकांसोबत चर्चा करण्यात आली. आषाढी एकादशीनिमित्त २९ जून रोजी केवळ नमाज पठन केला जाईल. कुर्बानी ईदच्या दुसऱ्या दिवशी करण्यात येईल, असे सांगण्यात आले. तसे निवेदनही पोलिस ठाण्याला दिले.

बाभूळगाव येथे सभेप्रसंगी मंचावर ठाणेदार रवींद्र जेधे, नगराध्यक्ष संगीता मालखुरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाशचंद छाजेड, नगरसेवक शेख कादर, तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष आरिफ अली, माजी सरपंच भारत इंगोले, जिल्हा सेवाधिकारी पद्माकर ठाकरे, मौलाना मोहम्मद शफाकत, मौलाना सलाउद्दीन, मौलाना अली हसन आदी विराजमान होते. गुरुवारी (दि. २९) आषाढी एकादशीला हिंदू बांधव उपवास ठेवतात. याच दिवशी बकरी ईद आहे. सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी मुस्लिम बांधवांनी जामा मशीदमध्ये बैठक घेऊन गुरुवारी कुर्बानी न करण्याचा निर्णय घेतला. शांतता समितीच्या सभेत जामा मशीद ट्रस्टचे अध्यक्ष आरिफ अली यांनी ही माहिती दिली.

आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी आहे. उपवासाचे महत्त्व ओळखून मुस्लिम बांधवांनी घेतलेला निर्णय स्तुत्य असल्याचे मत उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.बाभूळगाव तालुका जातीय आणि धार्मिक सलोख्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात ओळखला जातो. मुस्लिम बांधवांनी घेतलेला निर्णय जिल्ह्यासाठीच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी शांतता राखण्याकरिता मोठी बाब आहे, असे प्रतिपादन पोलिस निरीक्षक रवींद्र जेधे यांनी प्रास्ताविकात व्यक्त केले. संचालन व आभार पोलिस उपनिरीक्षक मंगेश डांगे यांनी मानले.

सभेला नगरपंचायतचे उपाध्यक्ष श्याम जगताप, नगरसेवक सुरेश वर्मा, भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मानलवार, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष गजानन पांडे (ठाकरे गट), भारतीय जैन संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रवीण तातेड, रमेशचंद तातेड, नगरसेवक अनिकेत पोहोकार, माजी नगराध्यक्ष प्रवीण गौरकार, अमर शिरसाट, पत्रकार शहजाद भाई, जाकीर खान, अंकुश सोयाम, नईम खान, शब्बीर खान, प्रदीप नांदुरकर, मुस्तफाखाँ, नियाज अहमद, शेख जब्बार, मोहम्मद जावेद, जावेद खान मनवर खान, अक्षय राऊत, सरफराज खान आदी उपस्थित होते.

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशी