शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

आषाढीला कुर्बानी देणार नाही; यवतमाळ जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2023 18:57 IST

Yawatmal News आषाढी एकादशीला कुर्बानी न देण्याचा निर्णय बाभूळगाव येथील मुस्लिम बांधवांनी घेतला आहे. ईदच्या दिवशी होणारी कुर्बानी गुरुवारऐवजी शुक्रवार आणि शनिवारी केली जाईल.

विलास गावंडे 

यवतमाळ : आषाढी एकादशीला कुर्बानी न देण्याचा निर्णय बाभूळगाव व दारव्हा तालुक्यातील नऊ गावांमधील मुस्लिम बांधवांनी घेतला आहे. शांतता समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय जाहीर करण्यात आला. संबंधित गावातील मशीद कमिटी आणि मौलवींनी पोलिस ठाण्याला तसे निवेदनही दिले आहे. बाभूळगाव येथील पोलिस ठाण्याच्या प्रांगणात उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या अध्यक्षतेत झालेल्या शांतता समितीच्या सभेत ईदच्या दिवशी होणारी कुर्बानी गुरुवारऐवजी शुक्रवार आणि शनिवारी केली जाईल, अशी माहिती देण्यात आली.

संवेदनशील तालुका अशी दारव्हाची ओळख आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील रामगाव रामेश्वर, हरू, तरनोळी, जवळा, सिंधी, पळशी, तरोडा, पेकर्डा, लोणी या गावांमध्ये ईदनिमित्त शांतता समितीची बैठक घेण्यात आली. तेथील मुस्लीम समाजबांधव आणि नागरिकांसोबत चर्चा करण्यात आली. आषाढी एकादशीनिमित्त २९ जून रोजी केवळ नमाज पठन केला जाईल. कुर्बानी ईदच्या दुसऱ्या दिवशी करण्यात येईल, असे सांगण्यात आले. तसे निवेदनही पोलिस ठाण्याला दिले.

बाभूळगाव येथे सभेप्रसंगी मंचावर ठाणेदार रवींद्र जेधे, नगराध्यक्ष संगीता मालखुरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाशचंद छाजेड, नगरसेवक शेख कादर, तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष आरिफ अली, माजी सरपंच भारत इंगोले, जिल्हा सेवाधिकारी पद्माकर ठाकरे, मौलाना मोहम्मद शफाकत, मौलाना सलाउद्दीन, मौलाना अली हसन आदी विराजमान होते. गुरुवारी (दि. २९) आषाढी एकादशीला हिंदू बांधव उपवास ठेवतात. याच दिवशी बकरी ईद आहे. सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी मुस्लिम बांधवांनी जामा मशीदमध्ये बैठक घेऊन गुरुवारी कुर्बानी न करण्याचा निर्णय घेतला. शांतता समितीच्या सभेत जामा मशीद ट्रस्टचे अध्यक्ष आरिफ अली यांनी ही माहिती दिली.

आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी आहे. उपवासाचे महत्त्व ओळखून मुस्लिम बांधवांनी घेतलेला निर्णय स्तुत्य असल्याचे मत उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.बाभूळगाव तालुका जातीय आणि धार्मिक सलोख्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात ओळखला जातो. मुस्लिम बांधवांनी घेतलेला निर्णय जिल्ह्यासाठीच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी शांतता राखण्याकरिता मोठी बाब आहे, असे प्रतिपादन पोलिस निरीक्षक रवींद्र जेधे यांनी प्रास्ताविकात व्यक्त केले. संचालन व आभार पोलिस उपनिरीक्षक मंगेश डांगे यांनी मानले.

सभेला नगरपंचायतचे उपाध्यक्ष श्याम जगताप, नगरसेवक सुरेश वर्मा, भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मानलवार, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष गजानन पांडे (ठाकरे गट), भारतीय जैन संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रवीण तातेड, रमेशचंद तातेड, नगरसेवक अनिकेत पोहोकार, माजी नगराध्यक्ष प्रवीण गौरकार, अमर शिरसाट, पत्रकार शहजाद भाई, जाकीर खान, अंकुश सोयाम, नईम खान, शब्बीर खान, प्रदीप नांदुरकर, मुस्तफाखाँ, नियाज अहमद, शेख जब्बार, मोहम्मद जावेद, जावेद खान मनवर खान, अक्षय राऊत, सरफराज खान आदी उपस्थित होते.

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशी