शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

आषाढीला कुर्बानी देणार नाही; यवतमाळ जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2023 18:57 IST

Yawatmal News आषाढी एकादशीला कुर्बानी न देण्याचा निर्णय बाभूळगाव येथील मुस्लिम बांधवांनी घेतला आहे. ईदच्या दिवशी होणारी कुर्बानी गुरुवारऐवजी शुक्रवार आणि शनिवारी केली जाईल.

विलास गावंडे 

यवतमाळ : आषाढी एकादशीला कुर्बानी न देण्याचा निर्णय बाभूळगाव व दारव्हा तालुक्यातील नऊ गावांमधील मुस्लिम बांधवांनी घेतला आहे. शांतता समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय जाहीर करण्यात आला. संबंधित गावातील मशीद कमिटी आणि मौलवींनी पोलिस ठाण्याला तसे निवेदनही दिले आहे. बाभूळगाव येथील पोलिस ठाण्याच्या प्रांगणात उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या अध्यक्षतेत झालेल्या शांतता समितीच्या सभेत ईदच्या दिवशी होणारी कुर्बानी गुरुवारऐवजी शुक्रवार आणि शनिवारी केली जाईल, अशी माहिती देण्यात आली.

संवेदनशील तालुका अशी दारव्हाची ओळख आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील रामगाव रामेश्वर, हरू, तरनोळी, जवळा, सिंधी, पळशी, तरोडा, पेकर्डा, लोणी या गावांमध्ये ईदनिमित्त शांतता समितीची बैठक घेण्यात आली. तेथील मुस्लीम समाजबांधव आणि नागरिकांसोबत चर्चा करण्यात आली. आषाढी एकादशीनिमित्त २९ जून रोजी केवळ नमाज पठन केला जाईल. कुर्बानी ईदच्या दुसऱ्या दिवशी करण्यात येईल, असे सांगण्यात आले. तसे निवेदनही पोलिस ठाण्याला दिले.

बाभूळगाव येथे सभेप्रसंगी मंचावर ठाणेदार रवींद्र जेधे, नगराध्यक्ष संगीता मालखुरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाशचंद छाजेड, नगरसेवक शेख कादर, तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष आरिफ अली, माजी सरपंच भारत इंगोले, जिल्हा सेवाधिकारी पद्माकर ठाकरे, मौलाना मोहम्मद शफाकत, मौलाना सलाउद्दीन, मौलाना अली हसन आदी विराजमान होते. गुरुवारी (दि. २९) आषाढी एकादशीला हिंदू बांधव उपवास ठेवतात. याच दिवशी बकरी ईद आहे. सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी मुस्लिम बांधवांनी जामा मशीदमध्ये बैठक घेऊन गुरुवारी कुर्बानी न करण्याचा निर्णय घेतला. शांतता समितीच्या सभेत जामा मशीद ट्रस्टचे अध्यक्ष आरिफ अली यांनी ही माहिती दिली.

आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी आहे. उपवासाचे महत्त्व ओळखून मुस्लिम बांधवांनी घेतलेला निर्णय स्तुत्य असल्याचे मत उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.बाभूळगाव तालुका जातीय आणि धार्मिक सलोख्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात ओळखला जातो. मुस्लिम बांधवांनी घेतलेला निर्णय जिल्ह्यासाठीच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी शांतता राखण्याकरिता मोठी बाब आहे, असे प्रतिपादन पोलिस निरीक्षक रवींद्र जेधे यांनी प्रास्ताविकात व्यक्त केले. संचालन व आभार पोलिस उपनिरीक्षक मंगेश डांगे यांनी मानले.

सभेला नगरपंचायतचे उपाध्यक्ष श्याम जगताप, नगरसेवक सुरेश वर्मा, भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मानलवार, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष गजानन पांडे (ठाकरे गट), भारतीय जैन संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रवीण तातेड, रमेशचंद तातेड, नगरसेवक अनिकेत पोहोकार, माजी नगराध्यक्ष प्रवीण गौरकार, अमर शिरसाट, पत्रकार शहजाद भाई, जाकीर खान, अंकुश सोयाम, नईम खान, शब्बीर खान, प्रदीप नांदुरकर, मुस्तफाखाँ, नियाज अहमद, शेख जब्बार, मोहम्मद जावेद, जावेद खान मनवर खान, अक्षय राऊत, सरफराज खान आदी उपस्थित होते.

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशी