शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात तब्बल ४,२०० कोटींवर चलान प्रलंबित; बहुतेक चालकांकडून लोकअदालतीची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2024 07:39 IST

नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी ‘लोकमत भवन’ येथे सदिच्छा भेट दिली व वरिष्ठ संपादकीय सहकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी ‘लोकमत’ एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार डॉ. विजय दर्डा प्रामुख्याने उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांकडून ई-चलान कारवाई केली जाते; पण बहुतांश घटनांमध्ये वाहनचालक त्यांचे ई-चलान भरत नाहीत, असे चित्र आहे. महाराष्ट्रात ४२०० कोटींहून अधिक रकमेची चलान प्रलंबित आहेत,  अशी माहिती नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली. मंगळवारी डॉ. सिंगल यांनी ‘लोकमत भवन’ येथे सदिच्छा भेट दिली व वरिष्ठ संपादकीय सहकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी ‘लोकमत’ एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार डॉ. विजय दर्डा प्रामुख्याने उपस्थित होते.

नागपुरात येण्याअगोदर सिंगल हे राज्याचे अतिरिक्त महासंचालक (वाहतूक) होते.  त्यांच्या निरीक्षणातून ही बाब समोर आली.

काय म्हणाले डॉ. सिंगल

- रहदारीचे नियम पाळणे हे प्रत्येकाचे कर्तव्यच आहे. मात्र, तरीही वाहतूक पोलिसांची तैनात करण्याची गरज पडते. - जागरूक नागरिक या नात्याने आपल्याही काही जबाबदाऱ्या आहेत, ज्या आपण चांगल्या प्रकारे पार पाडल्या पाहिजेत. - सिग्नल लाल असेल तर वाहतूक पोलिसाची गरजच काय आहे. - पोलिसांनी दंडुके घेऊन नियमांचे पालन करून घेणे हा या प्रश्नावरचा उपाय नाही, असे ते म्हणाले.

 

टॅग्स :nagpurनागपूर