शहरं
Join us  
Trending Stories
1
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
2
"तुमच्या मर्यादेत राहा..." ODI मालिका जिंकताच गंभीरनं काढला मनातला राग! तो नेमकं कुणाला अन् काय म्हणाला?
3
एकनाथ शिंदेंनी मुलाचे भरसभेत केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, “श्रीकांत हे व्हिजन असलेले खासदार”
4
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
5
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
6
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
7
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालिका गाजवणारा 'किंग' ठरला कोहली! तेंडुलकरचा 'महारेकॉर्ड' मोडला
8
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
9
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
10
“चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
11
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
12
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
13
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
14
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
15
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
16
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
17
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
18
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
19
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
20
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील हत्या प्रकरणातील आरोपी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 00:05 IST

: प्रतापनगर आणि हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या दोन्ही हत्यांच्या गुन्ह्याचा छडा पोलिसांनी लावला आहे. प्रतापनगर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले. त्यांचा ९ जूनपर्यंत पीसीआर मिळवण्यात आला आहे. तर हुडकेश्­वर पोलिसांनी चारपैकी तीन आरोपींना अटक केली असून एक आरोपी फरार आहे. त्यांना शनिवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

ठळक मुद्देप्रतापनगरातील आरोपींचा पीसीआर : हुडकेश्वरमधील चारपैकी एक आरोपी फरार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रतापनगर आणि हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या दोन्ही हत्यांच्या गुन्ह्याचा छडा पोलिसांनी लावला आहे.प्रतापनगर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले. त्यांचा ९ जूनपर्यंत पीसीआर मिळवण्यात आला आहे. तर हुडकेश्­वर पोलिसांनी चारपैकी तीन आरोपींना अटक केली असून एक आरोपी फरार आहे. त्यांना शनिवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.प्रतापनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुरुवारी दुपारी २ ते २.३० च्या सुमारास आरोपी विक्रम हुकुमबहादुर कार्की आणि त्याचा साथीदार रामू बहादुर गोमासे यांनी कार्तिक लक्ष्मण सारवे (वय ३५, रा. गोपाल नगर) याची भीषण हत्या केली होती. पोलिसांनी सहा तासात दोन्ही आरोपींना अटक केली. त्यांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी तसेच लोखंडी रॉड जप्त केला. आज या दोघांना न्यायालयात हजर करून त्यांचा ९ जूनपर्यंत पीसीआर मिळवला.आतापर्यंतच्या पोलीस तपासात उघड झालेल्या माहितीनुसार आरोपी विक्रम याच्या विवाहित बहिणीसोबत मृत कार्तिक सारवे याचे अनैतिक संबंध होते. या संबंधामुळे बदनामी होत असल्यामुळे आरोपीने कार्तिक याला तिच्याशी संबंध तोडून टाकण्यासाठी अनेकदा बजावले होते. मात्र तो ऐकत नसल्यामुळे अखेर विक्रमने साथीदाराच्या मदतीने कार्तिक सारवेची हत्या केली.हुडकेश्वरमध्ये वैभव सुरेश मुरते (३४) याची आरोपी कुणाल बच्छेरे याने त्याच्या तीन साथीदारांसह गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास धारदार शस्त्राचे घाव घालून हत्या केली होती.या घटनेला अवैध सावकारीतून निर्माण झालेला वाद कारणीभूत असल्याचे पुढे आले आहे. मृत वैभव हा अवैध सावकारी करीत होता. आरोपी कुणाल बछेरे याने वैभवकडून ८० हजार रुपये व्याजाने घेतले होते. कुणालने गेल्या तीन महिन्यांपासून व्याजाचा एकही रुपया वैभवला दिला नव्हता. त्यामुळे वैभव आणि कुणालच्या संबंधात तेढ निर्माण झाले होते. मुद्दल नाही तर व्याजाची तरी रक्कम मिळावी म्हणून वैभव कुणालला सारख्या शिव्या द्यायचा. चारचौघात अपमान करायचा आणि धमक्याही द्यायचा. त्यामुळे कुणाल प्रचंड चिडून होता. यातूनच त्याने वैभवच्या हत्येचा कट रचला. कुणालने रितिक मांझी, गोपाळ त्रिवेदी तसेच निरंजन साळवेला सोबत घेऊन वैभवची भीषण हत्या केली.अटक केल्यानंतर आरोपी कुणालने हुडकेश्वर पोलिसांना सांगितल्यानुसार, वैभव त्याला पैशासाठी प्रचंड त्रास देत होता चारचौघात अपमान करत होता, तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. दारूच्या नशेत असलेल्या मित्रांना त्याने दोन दिवसांपूर्वी ही बाब सांगितली. तो आपल्याला ठार मारणार आहे, असे सांगितल्यामुळे आरोपी रितिक, गोपाळ आणि निरंजन याने 'तू कशाला मरतो, त्याचेच काम करू' असे म्हटले. त्यामुळे चौघांनी संगणमत करून वैभवला गुरुवारी सायंकाळी निर्घृणपणे ठार मारले. या प्रकरणात आरोपी निरंजन वगळता अन्य तिघांना अटक केली असून, निरंजनचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :MurderखूनArrestअटक