शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

नागपुरातील हत्या प्रकरणातील आरोपी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 00:05 IST

: प्रतापनगर आणि हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या दोन्ही हत्यांच्या गुन्ह्याचा छडा पोलिसांनी लावला आहे. प्रतापनगर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले. त्यांचा ९ जूनपर्यंत पीसीआर मिळवण्यात आला आहे. तर हुडकेश्­वर पोलिसांनी चारपैकी तीन आरोपींना अटक केली असून एक आरोपी फरार आहे. त्यांना शनिवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

ठळक मुद्देप्रतापनगरातील आरोपींचा पीसीआर : हुडकेश्वरमधील चारपैकी एक आरोपी फरार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रतापनगर आणि हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या दोन्ही हत्यांच्या गुन्ह्याचा छडा पोलिसांनी लावला आहे.प्रतापनगर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले. त्यांचा ९ जूनपर्यंत पीसीआर मिळवण्यात आला आहे. तर हुडकेश्­वर पोलिसांनी चारपैकी तीन आरोपींना अटक केली असून एक आरोपी फरार आहे. त्यांना शनिवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.प्रतापनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुरुवारी दुपारी २ ते २.३० च्या सुमारास आरोपी विक्रम हुकुमबहादुर कार्की आणि त्याचा साथीदार रामू बहादुर गोमासे यांनी कार्तिक लक्ष्मण सारवे (वय ३५, रा. गोपाल नगर) याची भीषण हत्या केली होती. पोलिसांनी सहा तासात दोन्ही आरोपींना अटक केली. त्यांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी तसेच लोखंडी रॉड जप्त केला. आज या दोघांना न्यायालयात हजर करून त्यांचा ९ जूनपर्यंत पीसीआर मिळवला.आतापर्यंतच्या पोलीस तपासात उघड झालेल्या माहितीनुसार आरोपी विक्रम याच्या विवाहित बहिणीसोबत मृत कार्तिक सारवे याचे अनैतिक संबंध होते. या संबंधामुळे बदनामी होत असल्यामुळे आरोपीने कार्तिक याला तिच्याशी संबंध तोडून टाकण्यासाठी अनेकदा बजावले होते. मात्र तो ऐकत नसल्यामुळे अखेर विक्रमने साथीदाराच्या मदतीने कार्तिक सारवेची हत्या केली.हुडकेश्वरमध्ये वैभव सुरेश मुरते (३४) याची आरोपी कुणाल बच्छेरे याने त्याच्या तीन साथीदारांसह गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास धारदार शस्त्राचे घाव घालून हत्या केली होती.या घटनेला अवैध सावकारीतून निर्माण झालेला वाद कारणीभूत असल्याचे पुढे आले आहे. मृत वैभव हा अवैध सावकारी करीत होता. आरोपी कुणाल बछेरे याने वैभवकडून ८० हजार रुपये व्याजाने घेतले होते. कुणालने गेल्या तीन महिन्यांपासून व्याजाचा एकही रुपया वैभवला दिला नव्हता. त्यामुळे वैभव आणि कुणालच्या संबंधात तेढ निर्माण झाले होते. मुद्दल नाही तर व्याजाची तरी रक्कम मिळावी म्हणून वैभव कुणालला सारख्या शिव्या द्यायचा. चारचौघात अपमान करायचा आणि धमक्याही द्यायचा. त्यामुळे कुणाल प्रचंड चिडून होता. यातूनच त्याने वैभवच्या हत्येचा कट रचला. कुणालने रितिक मांझी, गोपाळ त्रिवेदी तसेच निरंजन साळवेला सोबत घेऊन वैभवची भीषण हत्या केली.अटक केल्यानंतर आरोपी कुणालने हुडकेश्वर पोलिसांना सांगितल्यानुसार, वैभव त्याला पैशासाठी प्रचंड त्रास देत होता चारचौघात अपमान करत होता, तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. दारूच्या नशेत असलेल्या मित्रांना त्याने दोन दिवसांपूर्वी ही बाब सांगितली. तो आपल्याला ठार मारणार आहे, असे सांगितल्यामुळे आरोपी रितिक, गोपाळ आणि निरंजन याने 'तू कशाला मरतो, त्याचेच काम करू' असे म्हटले. त्यामुळे चौघांनी संगणमत करून वैभवला गुरुवारी सायंकाळी निर्घृणपणे ठार मारले. या प्रकरणात आरोपी निरंजन वगळता अन्य तिघांना अटक केली असून, निरंजनचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :MurderखूनArrestअटक