शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
3
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
4
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
5
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
6
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
7
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
8
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
9
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
10
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
11
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
12
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
13
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
14
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
15
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
16
Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
17
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
18
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
19
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
20
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...

नागपुरातील हत्या प्रकरणातील आरोपी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 00:05 IST

: प्रतापनगर आणि हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या दोन्ही हत्यांच्या गुन्ह्याचा छडा पोलिसांनी लावला आहे. प्रतापनगर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले. त्यांचा ९ जूनपर्यंत पीसीआर मिळवण्यात आला आहे. तर हुडकेश्­वर पोलिसांनी चारपैकी तीन आरोपींना अटक केली असून एक आरोपी फरार आहे. त्यांना शनिवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

ठळक मुद्देप्रतापनगरातील आरोपींचा पीसीआर : हुडकेश्वरमधील चारपैकी एक आरोपी फरार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रतापनगर आणि हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या दोन्ही हत्यांच्या गुन्ह्याचा छडा पोलिसांनी लावला आहे.प्रतापनगर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले. त्यांचा ९ जूनपर्यंत पीसीआर मिळवण्यात आला आहे. तर हुडकेश्­वर पोलिसांनी चारपैकी तीन आरोपींना अटक केली असून एक आरोपी फरार आहे. त्यांना शनिवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.प्रतापनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुरुवारी दुपारी २ ते २.३० च्या सुमारास आरोपी विक्रम हुकुमबहादुर कार्की आणि त्याचा साथीदार रामू बहादुर गोमासे यांनी कार्तिक लक्ष्मण सारवे (वय ३५, रा. गोपाल नगर) याची भीषण हत्या केली होती. पोलिसांनी सहा तासात दोन्ही आरोपींना अटक केली. त्यांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी तसेच लोखंडी रॉड जप्त केला. आज या दोघांना न्यायालयात हजर करून त्यांचा ९ जूनपर्यंत पीसीआर मिळवला.आतापर्यंतच्या पोलीस तपासात उघड झालेल्या माहितीनुसार आरोपी विक्रम याच्या विवाहित बहिणीसोबत मृत कार्तिक सारवे याचे अनैतिक संबंध होते. या संबंधामुळे बदनामी होत असल्यामुळे आरोपीने कार्तिक याला तिच्याशी संबंध तोडून टाकण्यासाठी अनेकदा बजावले होते. मात्र तो ऐकत नसल्यामुळे अखेर विक्रमने साथीदाराच्या मदतीने कार्तिक सारवेची हत्या केली.हुडकेश्वरमध्ये वैभव सुरेश मुरते (३४) याची आरोपी कुणाल बच्छेरे याने त्याच्या तीन साथीदारांसह गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास धारदार शस्त्राचे घाव घालून हत्या केली होती.या घटनेला अवैध सावकारीतून निर्माण झालेला वाद कारणीभूत असल्याचे पुढे आले आहे. मृत वैभव हा अवैध सावकारी करीत होता. आरोपी कुणाल बछेरे याने वैभवकडून ८० हजार रुपये व्याजाने घेतले होते. कुणालने गेल्या तीन महिन्यांपासून व्याजाचा एकही रुपया वैभवला दिला नव्हता. त्यामुळे वैभव आणि कुणालच्या संबंधात तेढ निर्माण झाले होते. मुद्दल नाही तर व्याजाची तरी रक्कम मिळावी म्हणून वैभव कुणालला सारख्या शिव्या द्यायचा. चारचौघात अपमान करायचा आणि धमक्याही द्यायचा. त्यामुळे कुणाल प्रचंड चिडून होता. यातूनच त्याने वैभवच्या हत्येचा कट रचला. कुणालने रितिक मांझी, गोपाळ त्रिवेदी तसेच निरंजन साळवेला सोबत घेऊन वैभवची भीषण हत्या केली.अटक केल्यानंतर आरोपी कुणालने हुडकेश्वर पोलिसांना सांगितल्यानुसार, वैभव त्याला पैशासाठी प्रचंड त्रास देत होता चारचौघात अपमान करत होता, तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. दारूच्या नशेत असलेल्या मित्रांना त्याने दोन दिवसांपूर्वी ही बाब सांगितली. तो आपल्याला ठार मारणार आहे, असे सांगितल्यामुळे आरोपी रितिक, गोपाळ आणि निरंजन याने 'तू कशाला मरतो, त्याचेच काम करू' असे म्हटले. त्यामुळे चौघांनी संगणमत करून वैभवला गुरुवारी सायंकाळी निर्घृणपणे ठार मारले. या प्रकरणात आरोपी निरंजन वगळता अन्य तिघांना अटक केली असून, निरंजनचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :MurderखूनArrestअटक