शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

विदर्भाचा आवाज बुलंद करणाऱ्या ५०० जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 22:38 IST

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने बंद पुकारला होता. शहरातील चौकाचौकात विदर्भवाद्यांनी घोषणाबाजी करून वेगळ्या विदर्भाचा आवाज बुलंद केला. परंतु पोलिसांनी हे आंदोलन दडपून काढत आंदोलन करणाऱ्या ५०० विदर्भवाद्यांना अटक केली.

ठळक मुद्देपोलिसांची दडपशाही : शहरात विदर्भ बंदला अल्प प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने बंद पुकारला होता. शहरातील चौकाचौकात विदर्भवाद्यांनी घोषणाबाजी करून वेगळ्या विदर्भाचा आवाज बुलंद केला. परंतु पोलिसांनी हे आंदोलन दडपून काढत आंदोलन करणाऱ्या ५०० विदर्भवाद्यांना अटक केली.विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी, शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि विदर्भातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बंद पुकारला होता. नागपूर शहरात या बंदला अल्प प्रतिसाद मिळाला. शाळा, महाविद्यालय, व्यापारी प्रतिष्ठाने, शासकीय, निमशासकीय कार्यालये बंददरम्यान सुरू होती. सकाळी ११ वाजतापासून आंदोलकांनी शहरातील विविध चौकात जमा होऊन वेगळ्या विदर्भाच्या समर्थनार्थ नारेबाजी सुरू केली. परंतु, पोलिसांनी विदर्भवाद्यांचा प्रयत्न हाणून पाडला. तुकडोजी चौक, व्हेरायटी चौक, शहीद चौक, इतवारी, गोकुळपेठ, सक्करदरा चौक, महाल, झाशी राणी चौक आदी ठिकाणी विदर्भवाद्यांनी नारेबाजी सुरू करताच पोलिसांनी लगेच त्यांना अटक केली. यात पोलिसांनी व्हेरायटी चौकात आंदोलक समजून सर्वसामान्य नागरिकांनाही अटक केली. परंतु आंदोलनाशी संबंध नसल्याचे सांगितल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. अटक करण्यात आलेल्या ४० महिला आणि ४५० पुरुषांना दाभा आणि पोलीस मुख्यालयात आणण्यात आले. तेथे त्यांच्या जेवणाची, पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नसल्याचा आरोप समितीने केला आहे. आंदोलनात अ‍ॅड. वामनराव चटप, राम नेवले, डॉ. रमेश गजबे, प्रबीरकुमार चक्रवर्ती, डॉ. श्रीनिवास खांदेवाले, हिमांशु देवघरे, राजकुमार नागुलवार, राजू झोटिंग, सुरेश वानखडे, विजया धोटे, राजेंद्रसिंग ठाकरे, शीला देशपांडे यांच्यासह समितीच्या ५०० कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. सायंकाळी ५ वाजता आंदोलकांची सुटका करण्यात आली. 

टॅग्स :Vidarbhaविदर्भagitationआंदोलन