शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! तुफान गर्दी, प्रचंड उत्साह, वरळी डोममध्ये काय घडतंय?
2
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
3
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
4
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
5
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
6
"मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
7
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
8
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
9
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला भक्तिरंगात न्हाऊन निघा; प्रियजनांना पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश!
10
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
11
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
12
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
13
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
14
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
15
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
16
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
17
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
18
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
19
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
20
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!

पैशांवरून वाद, धक्का अन थेट चाकूने हत्याच; मध्यरात्रीनंतर शांतीनगरात थरार

By योगेश पांडे | Updated: April 4, 2024 16:29 IST

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट बंदोबस्त असताना तरुणांचे टोळके बाहेर फिरतातच कसे असा सवाल उपस्थित होत आहे.

नागपूर : पैशांवरून वाद सुरू असताना मध्यस्थी करताना धक्का लागल्याने आरोपीने एका तरुणाचा चाकूने भोसकून खून केला. शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील यादव कॉलनीत ही घटना घडली असून यामुळे खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट बंदोबस्त असताना तरुणांचे टोळके बाहेर फिरतातच कसे असा सवाल उपस्थित होत आहे.

विजय हरिचंद्र चौहान (३३, द्वारका नगर, कळमना) असे मृतकाचे नाव आहे. तर सागर यादव (३०, यादव कॉलनी, शांतीनगर) व हर्षल कटारे (२७, तुलसीनगर, शांतीनगर) हे आरोपी आहेत. विजयचे यशोधरानगर रेल्वे क्रॉसिंगला कपड्यांचे दुकान होते मात्र रेल्वे पुलाचे काम सुरू असल्याने काही काळापासून तो घरीच होता. बुधवारी साडेदहा वाजताच्या सुमारास तो त्याचे मित्र बादल बरमकर, सूरज बंबानी, सय्यद शहाबाज सय्यद मुजफ्फर यांच्यासोबत बाहेर गेला. ते सागरला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेले. सागर तेथे हर्षलसोबत उभा होता.

सागरच्या घराजवळील सिमेंट रस्त्यावर उभे राहून सर्व बोलत होते. सागरने सुजयला खर्चासाठी पैसे मागितले. त्यांच्यात त्या कारणावरून वाद सुरू झाला. त्यामुळे बादल व विजयने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यात विजयचा सागरला धक्का लागला. यावरून सागर संतापला व त्याने हर्षलला चाकू देण्यास सांगितले. हर्षलने चाकू देताच कुणाला काही कळण्याच्या आतच शिवीगाळ करत सागरने विजयवर चाकूने वार करणे सुरू केले. त्याने विजयच्या पोट, छाती, हाताचे कोपर, दंडावर वार केले. यात विजय गंभीर जखमी झाला. आरोपी तेथून फरार झाले. विजयच्या मित्रांनी त्याला ऑटोने मेयो इस्पितळात नेले व त्याच्या कुटुंबियांना माहिती दिली. डॉक्टरांनी विजयला मृत घोषित केले. त्याचे मोठे भाऊ दिलीप यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा नोंदविला. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक तीनच्या पथकाने हर्षल कटारे याला अटक केली तर सागरचा शोध सुरू आहे.

पोलिसांकडून टोळक्यांकडे दुर्लक्ष

नागपूर शहरात आचारसंहिता लागू असून गुन्हेगारी हालचालींवर बारीक नजर असल्याचा दावा पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे. प्रत्यक्षात मध्यरात्रीनंतर शहरातील अनेक भागांमध्ये तरुणांची टोळकी थिल्लरबाजी करत बसलेली किंवा फिरताना दिसून येतात. त्यांच्यावर वचक आणण्यासाठी पोलिसांकडून कुठलेही प्रयत्न सुरू नसल्याचे चित्र आहे.

टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारी