शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

जाती धर्माच्या नावावर भांडणे आमची संस्कृती नव्हे : माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 22:26 IST

नागपूरकरांनी नेहमीच एकतेचा संदेश दिला आहे. नागपूरकर नेहमीच जाती पातीच्या पलिकडे जाऊन कार्य करतात. जातीधर्माच्या नावावर भांडणे ही आमची संस्कृती नाही, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांनी केले.

ठळक मुद्देमो. शरफुद्दीन साहिल यांना प्रबोधनकार ठाकरे समाज प्रबोधन पुरस्कार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरकरांनी नेहमीच एकतेचा संदेश दिला आहे. नागपूरकर नेहमीच जाती पातीच्या पलिकडे जाऊन कार्य करतात. जातीधर्माच्या नावावर भांडणे ही आमची संस्कृती नाही, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांनी केले.मारवाडी फाऊंडेशनच्यावतीने स्व. प्रबोधनकार ठाकरे समाज प्रबोधन पुरस्कार २०१९ राष्ट्रीय एकात्मतेच्या संदर्भात महत्त्वाचे कार्य करणाऱ्या डॉ. मोहम्मद शरफुद्दीन साहिल यांना प्रदान करण्यात आला. यावेळी शंकरनगरच्या श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृहात आयोजित समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपीठावर कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस कराडचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा, मारवाडी फाऊंडेशनचे डॉ. गिरीश गांधी, पुनमचंद मालू, अतुल कोटेचा, विजय दमानी, आमदार गिरीश व्यास उपस्थित होते. विकास सिरपूरकर म्हणाले, प्रबोधनाला आपले जीवन मानणाऱ्या मोहम्मद शरफुद्दीन साहिल यांना प्रबोधनाचा पुरस्कार देण्यात आला ही उल्लेखनीय बाब आहे. त्यांनी केलेले समाज प्रबोधनाचे कार्य अलौकिक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. डॉ. वेदप्रकाश मिश्रा म्हणाले, मो. शरफुद्दीन साहिल यांना पुरस्कार मिळाला नसता तर प्रबोधनासोबत न्याय झाला नसता. कथाकार, प्रवचनकार होणे सोपे आहे, परंतु प्रबोधनकार होणे अवघड आहे. समाजाला एकजूट ठेऊन वैचारिक उत्थानासाठी प्रवचन, कथेने चालत नाही तर प्रबोधनाची गरज भासते. प्रबोधन हे समाजाचे धन असून समाजातील करंट्या मानसिकतेला उद्बोधनाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. सत्काराला उत्तर देताना मो. शरफुद्दीन साहिल म्हणाले, हा मुस्लीम समाजाचा सत्कार असून यामुळे देशात राष्ट्रीयता संपणार नसल्याचा संदेश मिळतो. भगवद्गीता, रामायण, बायबल आणि कुराणात ईश्वर एक असल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु आपण जातीधर्माच्या नावावर भांडतो. आपल्यात भांडणे लावून इंग्रज निघून गेले. समाज जातीधर्माच्या नावावर विखुरल्या जात आहे. धर्म, सत्तेच्या नावावर भांडणे वाढली आहेत. त्यामुळे कबीर, ज्ञानेश्वर, सुफी, संतांनी दिलेल्या एकतेच्या संदेशावर वाटचाल करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. प्रास्ताविकातून गिरीश गांधी यांनी साहिल यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. मोहम्मद असदुल्ला यांनी डॉ. मोहम्मद शरफुद्दीन साहिल यांचा परिचय करून दिला. व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनी शाल, श्रीफळ आणि एक लाखाचा धनादेश देऊन मो. शरफुद्दीन साहिल यांना पुरस्कार प्रदान केला. संचालन सुधीर बाहेती यांनी केले. आभार अतुल कोटेचा यांनी मानले.

टॅग्स :nagpurनागपूर