शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

जाती धर्माच्या नावावर भांडणे आमची संस्कृती नव्हे : माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 22:26 IST

नागपूरकरांनी नेहमीच एकतेचा संदेश दिला आहे. नागपूरकर नेहमीच जाती पातीच्या पलिकडे जाऊन कार्य करतात. जातीधर्माच्या नावावर भांडणे ही आमची संस्कृती नाही, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांनी केले.

ठळक मुद्देमो. शरफुद्दीन साहिल यांना प्रबोधनकार ठाकरे समाज प्रबोधन पुरस्कार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरकरांनी नेहमीच एकतेचा संदेश दिला आहे. नागपूरकर नेहमीच जाती पातीच्या पलिकडे जाऊन कार्य करतात. जातीधर्माच्या नावावर भांडणे ही आमची संस्कृती नाही, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांनी केले.मारवाडी फाऊंडेशनच्यावतीने स्व. प्रबोधनकार ठाकरे समाज प्रबोधन पुरस्कार २०१९ राष्ट्रीय एकात्मतेच्या संदर्भात महत्त्वाचे कार्य करणाऱ्या डॉ. मोहम्मद शरफुद्दीन साहिल यांना प्रदान करण्यात आला. यावेळी शंकरनगरच्या श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृहात आयोजित समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपीठावर कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस कराडचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा, मारवाडी फाऊंडेशनचे डॉ. गिरीश गांधी, पुनमचंद मालू, अतुल कोटेचा, विजय दमानी, आमदार गिरीश व्यास उपस्थित होते. विकास सिरपूरकर म्हणाले, प्रबोधनाला आपले जीवन मानणाऱ्या मोहम्मद शरफुद्दीन साहिल यांना प्रबोधनाचा पुरस्कार देण्यात आला ही उल्लेखनीय बाब आहे. त्यांनी केलेले समाज प्रबोधनाचे कार्य अलौकिक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. डॉ. वेदप्रकाश मिश्रा म्हणाले, मो. शरफुद्दीन साहिल यांना पुरस्कार मिळाला नसता तर प्रबोधनासोबत न्याय झाला नसता. कथाकार, प्रवचनकार होणे सोपे आहे, परंतु प्रबोधनकार होणे अवघड आहे. समाजाला एकजूट ठेऊन वैचारिक उत्थानासाठी प्रवचन, कथेने चालत नाही तर प्रबोधनाची गरज भासते. प्रबोधन हे समाजाचे धन असून समाजातील करंट्या मानसिकतेला उद्बोधनाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. सत्काराला उत्तर देताना मो. शरफुद्दीन साहिल म्हणाले, हा मुस्लीम समाजाचा सत्कार असून यामुळे देशात राष्ट्रीयता संपणार नसल्याचा संदेश मिळतो. भगवद्गीता, रामायण, बायबल आणि कुराणात ईश्वर एक असल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु आपण जातीधर्माच्या नावावर भांडतो. आपल्यात भांडणे लावून इंग्रज निघून गेले. समाज जातीधर्माच्या नावावर विखुरल्या जात आहे. धर्म, सत्तेच्या नावावर भांडणे वाढली आहेत. त्यामुळे कबीर, ज्ञानेश्वर, सुफी, संतांनी दिलेल्या एकतेच्या संदेशावर वाटचाल करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. प्रास्ताविकातून गिरीश गांधी यांनी साहिल यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. मोहम्मद असदुल्ला यांनी डॉ. मोहम्मद शरफुद्दीन साहिल यांचा परिचय करून दिला. व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनी शाल, श्रीफळ आणि एक लाखाचा धनादेश देऊन मो. शरफुद्दीन साहिल यांना पुरस्कार प्रदान केला. संचालन सुधीर बाहेती यांनी केले. आभार अतुल कोटेचा यांनी मानले.

टॅग्स :nagpurनागपूर