शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

पोलीस पोस्टमॅन आहेत काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 21:19 IST

वेश्या व्यवसायातील रॅकेट शोधण्यासाठी सखोल तपास न केल्यामुळे शहर पोलीस प्रशासनाला मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून अपरिपक्व आणि पोस्टमॅन असे झणझणीत ताशेरे सहन करावे लागले. पोलीस प्रशासन गांभीर्याने वागले नाही. परिणामी, न्यायालय संतप्त झाले होते.

ठळक मुद्देहायकोर्टाचे ताशेरे : वेश्या व्यवसायातील रॅकेट शोधण्यात अपयश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वेश्या व्यवसायातील रॅकेट शोधण्यासाठी सखोल तपास न केल्यामुळे शहर पोलीस प्रशासनाला मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून अपरिपक्व आणि पोस्टमॅन असे झणझणीत ताशेरे सहन करावे लागले. पोलीस प्रशासन गांभीर्याने वागले नाही. परिणामी, न्यायालय संतप्त झाले होते.अल्पवयीन मुलींना वेश्या व्यवसायातून बाहेर काढून त्यांचे पुनर्वसन करणे व अल्पवयीन मुलींना वेश्या व्यवसायात ढकलणारे रॅकेट नष्ट करणे यासाठी फ्रिडम फर्म या सामाजिक संस्थेने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व अरुण उपाध्ये यांच्यासमक्ष सुनावणी झाली. संस्थेने राजस्थानमधील एका अल्पवयीन मुलीला गंगा जमुनातील वेश्या व्यवसायातून बाहेर काढले आहे. त्या मुलीचा ताबा घेण्यासाठी राजस्थानवरून एक व्यक्ती आली असून तो मुलीचा पिता असल्याचा दावा करीत आहे. परंतु, मुलीने व त्या व्यक्तीने न्यायालयाला स्वतंत्रपणे दिलेल्या माहितीमध्ये बरीच तफावत आहे. परिणामी, न्यायालयाने या दोघांचे नाते व मुलीच्या वयाची शहानिशा करण्यासाठी पोलिसांना राजस्थानमध्ये जाऊन रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र इत्यादी कागदपत्रे मिळविण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर पोलिसांनी राजस्थानमध्ये जाऊन केवळ कागदपत्रे गोळा केली. त्या आधारावर कोणताही तपास केला नाही.प्रकरणावरील सुनावणीदरम्यान, फ्रिडम फर्मचे वकील अ‍ॅड. निहालसिंग राठोड यांनी कागदपत्रांच्या आधारे दोघांचे नाते सिद्ध होत नसल्याचे व मुलीच्या वयाबाबतही विविध प्रश्न उपस्थित होत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. संबंधित व्यक्तीचे वकील अ‍ॅड. शशिभूषण वाहने यांनीही काही गंभीर त्रुटींकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. त्यानंतर सरकारी वकील मेहरोज पठाण यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला, पण न्यायालयाने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस प्रशासनाची चांगलीच खरडपट्टी काढली. पोलीस प्रशासनाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही. त्यांनी राजस्थानमध्ये जाऊन केवळ पोस्टमनची भूमिका बजावली व कागदपत्रे गोळा करून आणली. त्यावरून कोणत्याही प्रकारचा तपास केला नाही. मुलगी सज्ञान आहे की अल्पवयीन, तिचे व संबंधित व्यक्तीचे नाते काय आहे याची उत्तरे पोलिसांनी शोधली नाही. पोलीस प्रशासनाकडून परिपक्वतेची अपेक्षा असताना त्यांनी हा निष्काळजीपणा दाखवला असे मत न्यायालयाने व्यक्त केले.आयपीएस अधिकाऱ्याने योग्य माहिती द्यावीसामान्य पोलीस कर्मचाऱ्यांकडून आवश्यक सहकार्य न मिळाल्यामुळे उच्च न्यायालयाने आयपीएस अधिकाऱ्यांनी यासंदर्भात योग्य माहिती सादर करावी, असा आदेश दिला. आयपीएस अधिकाऱ्यांनी प्रकरणातील सर्व कागदपत्रे तपासावी व पुढच्या तारखेला अचूक उत्तरे द्यावीत असे न्यायालय म्हणाले. पुढील सुनावणी १५ मार्च रोजी निश्चित करण्यात आली असून तेव्हापर्यंत पीडित मुलीला करुणा शासकीय आश्रयालयात ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर