शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरचे  आर्चबिशप अब्राहम विरूथकुलंगारा यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 23:28 IST

नागपूरचे रेव्हरंड आर्चबिशप अब्राहम विरुथकुलंगारा यांचे गुरुवारी दिल्ली येथे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर २३ एप्रिल रोजी दुपारी ३.३० वाजता नागपुरात अंत्यसंस्कार करण्यात येतील. ते सीबीसीआय सेंटर दिल्ली येथे आयोजित हिंदी बोलणाऱ्या बिशपांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी गेले होते. त्याच वेळी त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला. त्यांचे पार्थिव दिल्लीवरून विमानाने रात्री उशिरा नागपूरला आणण्यात आले.

ठळक मुद्दे २३ एप्रिल रोजी नागपुरातच अंत्यसंस्कार

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूरचे रेव्हरंड आर्चबिशप अब्राहम विरुथकुलंगारा यांचे गुरुवारी दिल्ली येथे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर २३ एप्रिल रोजी दुपारी ३.३० वाजता नागपुरात अंत्यसंस्कार करण्यात येतील. ते सीबीसीआय सेंटर दिल्ली येथे आयोजित हिंदी बोलणाऱ्या बिशपांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी गेले होते. त्याच वेळी त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला. त्यांचे पार्थिव दिल्लीवरून विमानाने रात्री उशिरा नागपूरला आणण्यात आले.१९७७ मध्ये मध्य प्रदेशातील खंडवा येथे बिशप म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी त्यांचे वय केवळ ३४ वर्षांचे होते. त्यांचा जन्म ५ जून १९४३ रोजी केरळमध्ये झाला. १९६० मध्ये महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर मध्य प्रदेशातील इंदूर येथे त्यांनी सेमिनरी जॉईन केली होती. २८ आॅक्टोबर १९६९ मध्ये त्यांना ‘प्रीस्ट’ घोषित करण्यात आले. यानंतर त्यांनी नागपुरातील सेंट चार्ल्स सेमिनरीमधून पुरोहितचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर तब्बल आठ वर्ष त्यांनी गोंड आदिवासींमध्ये समन्वयाचे कार्य केले. त्यांचे कार्य आणि समर्पणामुळे पोप यांनी त्यांच्यावर खंडवा येथील आदिवासी क्षेत्राचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी सोपविली. संत मदर टेरेसा यांनी त्यांचे कौतुक करताना म्हटले होते की, ‘युवा आणि ऊर्जावान असलेल्या या प्रधान पादरीने आपल्या भाषेच्या प्राविण्याने हजारो लोकांचे जीवन बदलविले आहे’. तब्बल २१ वर्षे त्यांनी खंडवा येथे घालविले. यानंतर २२ एप्रिल १९८८ रोजी त्यांना नागपूरचे आर्चबिशप म्हणून पदोन्नती देण्यात आली. त्यांनी नागपूरला आपले मिशन ‘आर्किडियोसीस’ सुरू केले. ते कॅथोलिक बिशप युवा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते. ते वेस्टर्न रिजन बिशपचे चेअरमनही राहिले आहेत.त्यांचे निधन एक मोठी क्षतीनागपूरचे आर्चबिशप रेव्हरंड अब्राहम विरुथकुलंगारा यांचे निधन मोठी क्षती आहे. ते आपल्या सिद्धांताचे पक्के होते. त्यांनी मध्य भारतातील मोठ्या समुदायासाठी धार्मिक विचारांचे नेतृत्व केले.बनवारीलाल पुरोहितराज्यपाल, तामिळनाडू 

 

टॅग्स :Deathमृत्यूAll saints cathedral Church Nagpurऑल सेंट कॅथेड्रल चर्च