शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

नागपूरचे  आर्चबिशप अब्राहम विरूथकुलंगारा यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 23:28 IST

नागपूरचे रेव्हरंड आर्चबिशप अब्राहम विरुथकुलंगारा यांचे गुरुवारी दिल्ली येथे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर २३ एप्रिल रोजी दुपारी ३.३० वाजता नागपुरात अंत्यसंस्कार करण्यात येतील. ते सीबीसीआय सेंटर दिल्ली येथे आयोजित हिंदी बोलणाऱ्या बिशपांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी गेले होते. त्याच वेळी त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला. त्यांचे पार्थिव दिल्लीवरून विमानाने रात्री उशिरा नागपूरला आणण्यात आले.

ठळक मुद्दे २३ एप्रिल रोजी नागपुरातच अंत्यसंस्कार

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूरचे रेव्हरंड आर्चबिशप अब्राहम विरुथकुलंगारा यांचे गुरुवारी दिल्ली येथे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर २३ एप्रिल रोजी दुपारी ३.३० वाजता नागपुरात अंत्यसंस्कार करण्यात येतील. ते सीबीसीआय सेंटर दिल्ली येथे आयोजित हिंदी बोलणाऱ्या बिशपांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी गेले होते. त्याच वेळी त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला. त्यांचे पार्थिव दिल्लीवरून विमानाने रात्री उशिरा नागपूरला आणण्यात आले.१९७७ मध्ये मध्य प्रदेशातील खंडवा येथे बिशप म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी त्यांचे वय केवळ ३४ वर्षांचे होते. त्यांचा जन्म ५ जून १९४३ रोजी केरळमध्ये झाला. १९६० मध्ये महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर मध्य प्रदेशातील इंदूर येथे त्यांनी सेमिनरी जॉईन केली होती. २८ आॅक्टोबर १९६९ मध्ये त्यांना ‘प्रीस्ट’ घोषित करण्यात आले. यानंतर त्यांनी नागपुरातील सेंट चार्ल्स सेमिनरीमधून पुरोहितचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर तब्बल आठ वर्ष त्यांनी गोंड आदिवासींमध्ये समन्वयाचे कार्य केले. त्यांचे कार्य आणि समर्पणामुळे पोप यांनी त्यांच्यावर खंडवा येथील आदिवासी क्षेत्राचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी सोपविली. संत मदर टेरेसा यांनी त्यांचे कौतुक करताना म्हटले होते की, ‘युवा आणि ऊर्जावान असलेल्या या प्रधान पादरीने आपल्या भाषेच्या प्राविण्याने हजारो लोकांचे जीवन बदलविले आहे’. तब्बल २१ वर्षे त्यांनी खंडवा येथे घालविले. यानंतर २२ एप्रिल १९८८ रोजी त्यांना नागपूरचे आर्चबिशप म्हणून पदोन्नती देण्यात आली. त्यांनी नागपूरला आपले मिशन ‘आर्किडियोसीस’ सुरू केले. ते कॅथोलिक बिशप युवा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते. ते वेस्टर्न रिजन बिशपचे चेअरमनही राहिले आहेत.त्यांचे निधन एक मोठी क्षतीनागपूरचे आर्चबिशप रेव्हरंड अब्राहम विरुथकुलंगारा यांचे निधन मोठी क्षती आहे. ते आपल्या सिद्धांताचे पक्के होते. त्यांनी मध्य भारतातील मोठ्या समुदायासाठी धार्मिक विचारांचे नेतृत्व केले.बनवारीलाल पुरोहितराज्यपाल, तामिळनाडू 

 

टॅग्स :Deathमृत्यूAll saints cathedral Church Nagpurऑल सेंट कॅथेड्रल चर्च