शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात कल चाचणीची विनाकारण ‘कलकल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 22:58 IST

गेल्या तीन वर्षांपासून दहावीनंतर विद्यार्थ्यांचा कल जाणून घेण्यासाठी शिक्षण विभागाने कल चाचणीचा प्रयोग राबविला आहे. पहिल्याच वर्षी कलचाचणीच्या प्रमाणपत्रावर शिक्षणमंत्र्यांचा फोटो छापल्याने कलचाचणी वादात आली होती. यावर्षी कलचाचणी शिक्षण विभागाने न घेता, एका संस्थेला काम दिले आहे. दुसरीकडे शाळेत विद्यार्थ्यांना मोबाईल वापरण्यावर बंधन असल्याने, कलचाचणी मात्र मोबाईलवर घेण्यात येणार आहे. गेल्या तीन वर्षात शिक्षकांच्या अनुभवातून कलचाचणीचा कुठलाही उपयोग विद्यार्थ्यांना होत नसतानाही शिक्षण विभागाकडून कलचाचणी रेटून धरत त्यात उगाच नवनवीन प्रयोग करून शिक्षकांची डोकेदुखी वाढवित आहे.

ठळक मुद्देदरवर्षी ठरतेय वादाचा विषय : मोबाईलवरील कलचाचणी ठरणार शिक्षकांसाठी डोकेदुखी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या तीन वर्षांपासून दहावीनंतर विद्यार्थ्यांचा कल जाणून घेण्यासाठी शिक्षण विभागाने कल चाचणीचा प्रयोग राबविला आहे. पहिल्याच वर्षी कलचाचणीच्या प्रमाणपत्रावर शिक्षणमंत्र्यांचा फोटो छापल्याने कलचाचणी वादात आली होती. यावर्षी कलचाचणी शिक्षण विभागाने न घेता, एका संस्थेला काम दिले आहे. दुसरीकडे शाळेत विद्यार्थ्यांना मोबाईल वापरण्यावर बंधन असल्याने, कलचाचणी मात्र मोबाईलवर घेण्यात येणार आहे. गेल्या तीन वर्षात शिक्षकांच्या अनुभवातून कलचाचणीचा कुठलाही उपयोग विद्यार्थ्यांना होत नसतानाही शिक्षण विभागाकडून कलचाचणी रेटून धरत त्यात उगाच नवनवीन प्रयोग करून शिक्षकांची डोकेदुखी वाढवित आहे.दहावीनंतर विद्यार्थ्यांचा कल जाणून घेण्यासाठी १८ डिसेंबर ते १७ जानेवारी दरम्यान कल चाचणी घेण्यात येत आहे. यावर्षी कल चाचणीची जबाबदारी शामची आई फाऊंडेशन या संस्थेला दिली आहे. ही संस्था मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची कलचाचणी घेणार आहे. खासगी संस्थेला कलचाचणीने दिलेल्या अधिकारावर शिक्षकांनी आक्षेप घेतला आहे. आतापर्यंत झालेल्या तीन कलचाचण्या शिक्षण मंडळाने घेतल्या होत्या. शासनाचा शिक्षण मंडळावर विश्वास राहिला नाही का, असा सवाल शिक्षकांनी केला आहे. कलचाचणीसाठी मोबाईलच्या वापरावरसुद्धा शिक्षकांनी आक्षेप घेतला आहे. चाचणीसाठी मोबाईल कोण उपलब्ध करून देईल? यासाठी शिक्षकांनी आपला मोबाईल का वापरावा? विद्यार्थ्यांना घरचा मोबाईल आणण्यासाठी सांगितले तर त्याचे काय परिणाम होतील? मोबाईल वापराचे दुष्परिणाम समोर येत आहेत. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोबाईल वापरण्यास निर्बंध आहे. विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर टाळावा, असा आग्रह आणि विचार सगळीकडे सुरू असताना मोबाईलवर कलचाचणी घेतली जात आहे, असे विविध प्रश्न शिक्षण क्षेत्रातून विचारल्या जात आहे.आधी शिक्षण मंडळाकडून चाचणीसाठी सिडी दिली जात होती. त्याचा कालावधी ४० मिनिट होता. आता कलचाचणी सोबतच अभिक्षमता चाचणी देणे आहे. कालावधी १ तास ३० मिनिटांचा आहे. डिसेंबर महिना हा विद्यार्थ्यांना व शाळांसाठी फार महत्त्वाचा असतो. अभ्यासक्रम पूर्ण करणे, सराव परीक्षांचे नियोजन करणे, तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षांचे नियोजन करणे व त्याद्वारे विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसाठी तयार करण्याची कसरत शिक्षकांना करावी लागते. याकाळात कलचाचणीचे आयोजन करणे विद्यार्थी व शिक्षकांच्या हिताचे नसल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.कल चाचणीचा आतापर्यंतचा अनुभव लक्षात घेता, विद्यार्थ्यांसाठी त्याची उपयुक्तता सिद्ध झाली नाही. ज्या गोष्टीची उपयुक्तता विशेष नाही शासन त्यावर जास्त भर देत आहे. परीक्षेचे दिवस जवळ असताना, अशा परीक्षा घेऊन शासन विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांचीही डोकेदुखी वाढवित आहे.पुरुषोत्तम पंचभाई, महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघटना

 

टॅग्स :Studentविद्यार्थीexamपरीक्षा