शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

रामदेवबाबा विद्यापीठास मंत्रिमंडळाची मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 21:49 IST

विदर्भासह राज्यात गुणवत्तापूर्ण तंत्रज्ञानाच्या शिक्षणासाठी ओळखल्या जाणाऱ्या श्री रामदेवबाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड मॅनेजमेंटला स्वायत्त विद्यापीठाचा दर्जा देण्याच्या प्रस्तावाला मंगळवारी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सत्र २०१९-२० मध्ये श्री रामदेवबाबा विद्यापीठाची स्थापना होईल. या निर्णयामुळे नागपूर विभागात पहिले स्वायत्त विद्यापीठ स्थापन होईल. हे विद्यापीठ विदर्भातील दुसरे राहिल. त्याचबरोबर पुण्यात श्री बालाजी सोसायटीला स्वायत्त विद्यापीठ स्थापण्याची मंजुरी दिली आहे.

ठळक मुद्देसत्र २०१९-२० पासून सुरू करण्याची मिळाली मान्यतानागपूर विभागातील पहिले सेल्फ फायनान्स विद्यापीठ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भासह राज्यात गुणवत्तापूर्ण तंत्रज्ञानाच्या शिक्षणासाठी ओळखल्या जाणाऱ्या श्री रामदेवबाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड मॅनेजमेंटला स्वायत्त विद्यापीठाचा दर्जा देण्याच्या प्रस्तावाला मंगळवारी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सत्र २०१९-२० मध्ये श्री रामदेवबाबा विद्यापीठाची स्थापना होईल. या निर्णयामुळे नागपूर विभागात पहिले स्वायत्त विद्यापीठ स्थापन होईल. हे विद्यापीठ विदर्भातील दुसरे राहिल. त्याचबरोबर पुण्यात श्री बालाजी सोसायटीला स्वायत्त विद्यापीठ स्थापण्याची मंजुरी दिली आहे.मंत्रिमंडळाच्या या निर्णयाचा शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञांनी स्वागत केले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, श्री रामदेवबाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड मॅनेजमेंटने हजारो विद्यार्थ्यांना गुणवत्तापुर्ण तांत्रिक शिक्षण दिले असून, देशाच्या विकासात उल्लेखनीय भूमिका पार पाडली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या कॉलेजला यापूर्वी २०११ मध्ये स्वायत्तेचा दर्जा प्रदान करण्यात आला होता. कॉलेजला आयएसओ ९००१:२००५ दर्जा प्राप्त झाला आहे. त्याचबरोबर नॅकच्या मूल्यांकनात संस्थेला ‘अ’ दर्जा प्राप्त झाला आहे.श्री बालाजी सोसायटी पुणे यांच्या माध्यमातून पुण्यातील विद्यापीठाची स्थापना होत आहे. या संस्थेकडून यापूर्वीच व्यवस्थापन, अभियांत्रिकी, विधि हे अभ्यासक्रम चालविण्यात येत आहेत. स्वयंअर्थसाहाय्यित विद्यापीठाच्या स्थापनेनंतर मॉडर्न मॅनेजमेंट, टेलिकॉम मॅनेजमेंट, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट असे विविध अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहे.असे होणार लाभश्री रामदेवबाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड मॅनेजमेंटचे श्री रामदेवबाबा विद्यापीठात रुपांतर झाल्यानंतर नागपूर विभागाबरोबरच संपूर्ण विदर्भाला त्याचा फायदा होणार आहे. विद्यापीठाच्या रूपात संस्थेला पूर्णत: अभ्यासक्रमाचे स्वातंत्र्य मिळणार आहे. त्यामुळे विद्यापीठ रिसर्चवर आधारीत अभ्यासक्रम व औद्योगिक क्षेत्राच्या मागणीनु सार अभ्यासक्रम सुरु करू शकते. त्याचबरोबर भविष्यातील व जागतिक मागणी लक्षात घेता विद्यार्थ्यांना तसे शिक्षण उपलब्ध करून देता येऊ शकते. संस्थेला विद्यापीठासारखेच पूर्ण शैक्षणिक व आर्थिक अधिकार मिळतील. विदर्भातील विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल.२०१७ मध्ये दिला होता प्रस्तावयासंदर्भात कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेश पांडे यांच्याशी संपर्क केला असता, ते म्हणाले की, अद्यापपर्यंत आम्हाला कुठलीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र कॉलेजकडून २०१७ मध्ये यासंदर्भातील प्रस्ताव राज्य सरकारला पाठविला होता. प्रस्तावाला मंजुरी देण्यापूर्वी विविध समित्यांनी कॉलेजचा दौरा केला होता. सरकारच्या सर्वच मापदंडामध्ये कॉलेज योग्य ठरले आहे. ते म्हणाले की, कॉलेजमध्ये सध्या इंजिनिअरिंग, एमबीए व एमसीए अभ्यासक्रम सुरू आहे. विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यानंतर योजना आखण्यात येईल. यात कुठले अभ्यासक्रम सुरू करता येईल, हे ठरविण्यात येईल . संशोधनावर आधारीत अभ्यासक्रमाला विशेष प्राधान्य देण्याची त्यांची योजना आहे. त्यामुळे विदर्भातील समस्यांचे अध्ययन होईल. देशाच्या विकासात प्रशिक्षित मानव संसाधन तयार होईल.श्रेष्ठतेच्या मापदंडाला पूर्ण केलेश्री रामदेवबाबा सार्वजनिक समितीद्वारा संचालित श्री रामदेवबाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड मॅनेजमेंटला गुणवत्तापूर्ण शिक्षण व विद्यार्थ्यांना उत्तम सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्र व देशातही ओळखले जाते. कॉलेजचे वैशिष्ट्य म्हणजे राष्ट्रीय स्तरावर चांगली गुणवत्ता प्रदान केली आहे. मानवसंसाधन विकास मंत्रालयाकडून देण्यात येणाऱ्या नॅशनल इन्स्टिट्युशन रँकिंग फ्रेम वर्क (एनआयआरएफ) मध्ये कॉलेजने उत्कृष्ट गुणवत्ता प्राप्त केली आहे. कॉलेजच्या कॅम्पस प्लेसमेंटचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. दररवर्षी कॉलेजमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्या कॅम्पस प्लेसमेंटसाठी येतात. हेच कारण आहे की, दरवर्षी हजारोच्या संख्येने विद्यार्थी येथे प्रवेश घेतात.

टॅग्स :universityविद्यापीठnagpurनागपूर