शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

अ‍ॅन्टिजन टेस्टचा रिपोर्ट खराच असेल असे नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 10:22 IST

अ‍ॅन्टिजन टेस्ट निगेटिव्ह असेल आणि तरीदेखील रुग्णामध्ये लक्षणे आढळून येत असतील तर तात्काळ त्याने आरटी-पीसीआर टेस्ट करणे गरजेचे असल्याचे मुंबई मनपा आयुक्त इकबाल चहल यांनी सांगितले.

ठळक मुद्देआरटी-पीसीआर टेस्ट वाढविण्याचे आवाहनमुंबई मनपा आयुक्तांचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई मनपा आयुक्त इकबाल चहल यांनी कोरोना संदर्भातील अ‍ॅन्टिजन टेस्टवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पॉझिटिव्ह आलेल्या अ‍ॅन्टिजन टेस्ट रिपोर्टवर कोणतीच शंका नाही. मात्र, जे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, ते चूक असू शकतात, असे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे.मुंबईहून नागपूरला आलेल्या तज्ज्ञ चमूचे सदस्य असलेल्या चहल यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना हा दावा केला आहे. अ‍ॅन्टिजन टेस्ट निगेटिव्ह असेल आणि तरीदेखील रुग्णामध्ये लक्षणे आढळून येत असतील तर तात्काळ त्याने आरटी-पीसीआर टेस्ट करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. निगेटिव्ह रिपोर्टसंदर्भात ही टेस्ट तेवढीशी कारगर नाही. पॉझिटिव्ह आलेल्या रिपोर्टमध्ये कोणतीच समस्या नाही. टेस्टची संख्या वाढविण्यापेक्षा त्याच्या गुणवत्तेवर अधिक जोर देण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले. मृत्यूदर कमी करण्यावर सर्वाधिक जोर देण्याचीही आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.

बैठकीमध्ये चहल यांनी आरटी-पीसीआर टेस्ट वाढविण्यावर भर देत, अ‍ॅन्टिजन टेस्टचा उपयोग केवळ गंभीर स्वरूपात आजारी संशयित रुग्णासाठीच करण्यावर मत मांडले. यावेळी त्यांनी शासकीय व खासगी हॉस्पिटल्समध्ये वॉररूम तयार करण्याचे निर्देश दिले. सोबतच तक्रारींचा निपटारा करण्यासाठी, सीसीटीव्ही लावूनच उपचार करण्याचे आवाहन केले. बैठकीत पालकमंत्री नितीन राऊत, गृहमंत्री अनिल देशमुख, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., पोलीस आयुक्त अमितेश कुमार, निवर्तमान पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर उपस्थित होते.मुंबईतल्या परिस्थितीची हाताळणीबैठकीत चमूने आपले अनुभव व्यक्त करताना धारावी आणि मुंबईच्या अन्य भागांमध्ये समन्वयाने काम पार पडले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वत: झोपडपट्टीमध्ये जाऊन स्थितीचा अंदाज घेतला. त्यामुळे, परिस्थिती आटोक्यात आणण्यास मदत मिळाली. नागपुरातही अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष दौरा करण्याची गरज आहे. ज्या पॉझिटिव्ह रुग्णांकडे वेगळे स्वच्छतागृह नाही किंवा कमी जागा आहे, त्यांच्या नातेवाईकांनाही क्वारंटाईन करावे लागेल.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस