शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
4
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
5
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
6
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
7
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
8
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
9
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
10
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
11
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
12
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
13
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
14
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
15
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
16
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
17
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
18
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
19
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
20
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!

उत्तर द्या, अन्यथा ११० कोटी जमा करा : हायकोर्टाचा सरकारला आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 01:21 IST

समता सहकारी बँकेचे मुख्य अवसायक पंकज वानखेडे हे ठेवीदारांचे हित जपण्यात अपयशी ठरत आहेत. त्यामुळे त्यांच्या जागेवर सक्षम व्यक्तीची नियुक्ती करण्यात यावी अशा विनंतीसह ठेवीदार कृती समितीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात न्यायालयाने आवश्यक वेळ देऊनही राज्य सरकार उत्तर सादर करण्यात अपयशी ठरले. त्यामुळे न्यायालयाने गुरुवारी राज्य सरकारला फटकारून येत्या २६ नोव्हेंबरपर्यंत उत्तर सादर करण्यास सांगितले. तसेच, या आदेशाचे उल्लंघन झाल्यास न्यायालयात ११० कोटी रुपये जमा करण्याची तंबी दिली.

ठळक मुद्देसमता सहकारी बँक घोटाळा प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : समता सहकारी बँकेचे मुख्य अवसायक पंकज वानखेडे हे ठेवीदारांचे हित जपण्यात अपयशी ठरत आहेत. त्यामुळे त्यांच्या जागेवर सक्षम व्यक्तीची नियुक्ती करण्यात यावी अशा विनंतीसह ठेवीदार कृती समितीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात न्यायालयाने आवश्यक वेळ देऊनही राज्य सरकार उत्तर सादर करण्यात अपयशी ठरले. त्यामुळे न्यायालयाने गुरुवारी राज्य सरकारला फटकारून येत्या २६ नोव्हेंबरपर्यंत उत्तर सादर करण्यास सांगितले. तसेच, या आदेशाचे उल्लंघन झाल्यास न्यायालयात ११० कोटी रुपये जमा करण्याची तंबी दिली.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व श्रीराम मोडक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यामुळे रिझर्व्ह बँकेने २००६ मध्ये समता बँकेचे सर्व बँकिंग व्यवहार बंद करण्याचा आदेश जारी केला होता. त्यानंतर २२ डिसेंबर २००६ रोजी सहकार आयुक्तांनी तत्कालीन सहायक निबंधक चैतन्य नासरे यांची बँकेवर प्रशासक म्हणून नियुक्ती केली. नासरे यांनी केलेल्या लेखा परीक्षणातून बँकेत १४५ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे पुढे आले. त्या आधारावर बँक संचालकांविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात आला. राज्य गुन्हे अन्वेशन विभागाने सखोल तपास करून संचालकांविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. दरम्यान, २२ मार्च २०१० रोजी बँकेचे लायसन्स रद्द करण्यात आले. सहकार आयुक्तांनी बँक गुंडाळण्याचा आदेश जारी करून अवसायानाची कार्यवाही करण्यासाठी अवसायक मंडळ स्थापन केले. नासरे यांची मुख्य अवसायक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर नासरे यांनी १५ हजार ठेवीदारांना ३८ कोटी रुपये परत केले. ते अतिशय उत्तम पद्धतीने कार्य करीत होते. असे असताना १६ आॅक्टोबर २०१६ रोजी पंकज वानखेडे यांची मुख्य अवसायकपदी नियुक्ती करण्यात आली. परंतु, वानखेडे यांनी एक वर्ष विलंबाने सूत्रे स्वीकारली. तेव्हापासून त्यांनी ठेवीदारांच्या हिताचे काहीच निर्णय घेतले नाही. अद्याप एकही पैसा वसूल करून ठेवीदारांना देण्यात आला नाही असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांनी बाजू मांडली.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयGovernmentसरकार