शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील गॅंगस्टर आंबेकरविरुद्ध आणखी एक गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 23:08 IST

कुख्यात गुंड संतोष शशिकांत आंबेकर याने एका हत्याकांडात सहआरोपी असलेल्या त्याच्या टोळीतील एका गुन्हेगारालाही धमकी देऊन त्याच्याकडून लाखो रुपये उकळल्याचे स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्देटोळीतील साथीदारालाही फसवले : ११ लाखांची खंडणी उकळलीमंत्रालयात आणि न्यायालयात एक कोटी खर्च घातल्याची मखलाशी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कुख्यात गुंड संतोष शशिकांत आंबेकर याने व्यापारी उद्योजक, नोकरदार यांची फसवणूक करून त्यांच्याकडून तर खंडणी वसूल केलीच. मात्र,एका हत्याकांडात सहआरोपी असलेल्या त्याच्या टोळीतील एका गुन्हेगारालाही त्याने धमकी देऊन त्याच्याकडूनही आंबेकरने लाखो रुपये उकळल्याचे स्पष्ट झाले आहे. तहसील पोलीस ठाण्यात जयभारत काळे (वय ४३) नामक व्यक्तीने तशी तक्रार नोंदवताच पोलिसांनी आरोपी संतोष आंबेकर (वय ४९), राजेंद्र ऊर्फ राजा गुलाबराव अरमरकर (वय ५३) आणि नीलेश ज्ञानेश्वर केदार (वय ३४) या तिघांविरुद्ध अवैध सावकारीचा गुन्हा दाखल आहे.विशेष म्हणजे, आंबेकरने काळे याच्याकडून रक्कम उकळताना त्याला ही रक्कम मंत्रालय तसेच न्यायालयात वापरण्यात आली, त्याचमुळे एका हत्याकांडात निर्दोष सुटका झाल्याचे म्हटल्याचे पोलीस रेकॉर्डवर आले आहे. या घडामोडीमुळे सर्वत्र खळबळ निर्माण झाली आहे.कधी काळी चांगला मित्र असलेला मात्र एका व्यवहारामुळे विरोधात गेलेला कुख्यात गुंड बाल्या गावंडे याची कुख्यात संतोष आंबेकरने सावजीच्या माध्यमातून हत्या करवून घेतली होती. या हत्याकांडाचा मास्टर मार्इंड संतोष आंबेकरच होता, मात्र तो फरार झाला. या गुन्ह्याचा निकाल लागेपर्यंत आंबेकर फरारच होता. पुरावे नसल्यामुळे या हत्याकांडातील आरोपींना दोषमुक्त करण्यात आले. त्यानंतर संतोषने डिसेंबर २०१८ मध्ये पोलिसांकडे आत्मसमर्पण केले. या हत्याकांडात जयभारत काळे हा देखील आरोपी होता. बाल्याच्या खुनातून जामिनावर बाहेर येण्यासाठी, आपल्या बाजूने निर्णय देण्यासाठी न्यायाधीशाला, मोक्काची कारवाई न करण्यासाठी मुंबई मंत्रालयात एक कोटी रुपये खर्च केले, असे संतोषने जयभारत काळे याला सांगितले होते. त्यातील १५ लाखांची रोकड काळेला परत मागितली होती. पैसे नसल्याने काळेला आंबेकरचा राईट हॅण्ड सराफा राजू अरमरकर याच्याकडून व्याजाने १५ लाख रुपये घेतल्याचे संतोषने सांगितले. या रकमेच्या व्याजापोटी आरोपी राजू अरमरकर आणि संतोषचा भाचा नीलेश केदार हे दर महिन्याला ३ टक्के व्याजदराने काळेकडून ४५ हजार रुपये उकळत होते. व्याजाची रक्कम देण्यास एक दिवस उशीर झाला तर त्यासाठी प्रति दिवस एक हजार रुपये जास्त घेतले जायचे.शिवीगाळ करून धमकीही द्यायचे. अशाप्रकारे सराफा अरमरकर आणि नीलेश केदार यांनी काळेकडून आतापर्यंत ११ लाख २५ हजार रुपये उकळले होते. दर महिन्याला ४५ हजार रुपये देणे शक्य नसल्यामुळे आणि पोलिसांनी आंबेकरविरुद्ध कडक कारवाई सुरू केल्याने काळेला हिंमत आली. त्यामुळे त्याने मंगळवारी तहसील ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यावरून पोलिसांनी कलम ३८६, ५०४, ५०६ (ब), ३४ आणि सावकारी कायद्याचे सहकलम ४४,४५ अन्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचाही तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर