शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा निकाल लागताच राज ठाकरे वर्षा निवासस्थानी; CM देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
4
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
5
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
7
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
8
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
9
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
10
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
11
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
12
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
13
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
14
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
15
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
16
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
17
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
18
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
19
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
20
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...

नागपुरातील गॅंगस्टर आंबेकरविरुद्ध आणखी एक गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 23:08 IST

कुख्यात गुंड संतोष शशिकांत आंबेकर याने एका हत्याकांडात सहआरोपी असलेल्या त्याच्या टोळीतील एका गुन्हेगारालाही धमकी देऊन त्याच्याकडून लाखो रुपये उकळल्याचे स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्देटोळीतील साथीदारालाही फसवले : ११ लाखांची खंडणी उकळलीमंत्रालयात आणि न्यायालयात एक कोटी खर्च घातल्याची मखलाशी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कुख्यात गुंड संतोष शशिकांत आंबेकर याने व्यापारी उद्योजक, नोकरदार यांची फसवणूक करून त्यांच्याकडून तर खंडणी वसूल केलीच. मात्र,एका हत्याकांडात सहआरोपी असलेल्या त्याच्या टोळीतील एका गुन्हेगारालाही त्याने धमकी देऊन त्याच्याकडूनही आंबेकरने लाखो रुपये उकळल्याचे स्पष्ट झाले आहे. तहसील पोलीस ठाण्यात जयभारत काळे (वय ४३) नामक व्यक्तीने तशी तक्रार नोंदवताच पोलिसांनी आरोपी संतोष आंबेकर (वय ४९), राजेंद्र ऊर्फ राजा गुलाबराव अरमरकर (वय ५३) आणि नीलेश ज्ञानेश्वर केदार (वय ३४) या तिघांविरुद्ध अवैध सावकारीचा गुन्हा दाखल आहे.विशेष म्हणजे, आंबेकरने काळे याच्याकडून रक्कम उकळताना त्याला ही रक्कम मंत्रालय तसेच न्यायालयात वापरण्यात आली, त्याचमुळे एका हत्याकांडात निर्दोष सुटका झाल्याचे म्हटल्याचे पोलीस रेकॉर्डवर आले आहे. या घडामोडीमुळे सर्वत्र खळबळ निर्माण झाली आहे.कधी काळी चांगला मित्र असलेला मात्र एका व्यवहारामुळे विरोधात गेलेला कुख्यात गुंड बाल्या गावंडे याची कुख्यात संतोष आंबेकरने सावजीच्या माध्यमातून हत्या करवून घेतली होती. या हत्याकांडाचा मास्टर मार्इंड संतोष आंबेकरच होता, मात्र तो फरार झाला. या गुन्ह्याचा निकाल लागेपर्यंत आंबेकर फरारच होता. पुरावे नसल्यामुळे या हत्याकांडातील आरोपींना दोषमुक्त करण्यात आले. त्यानंतर संतोषने डिसेंबर २०१८ मध्ये पोलिसांकडे आत्मसमर्पण केले. या हत्याकांडात जयभारत काळे हा देखील आरोपी होता. बाल्याच्या खुनातून जामिनावर बाहेर येण्यासाठी, आपल्या बाजूने निर्णय देण्यासाठी न्यायाधीशाला, मोक्काची कारवाई न करण्यासाठी मुंबई मंत्रालयात एक कोटी रुपये खर्च केले, असे संतोषने जयभारत काळे याला सांगितले होते. त्यातील १५ लाखांची रोकड काळेला परत मागितली होती. पैसे नसल्याने काळेला आंबेकरचा राईट हॅण्ड सराफा राजू अरमरकर याच्याकडून व्याजाने १५ लाख रुपये घेतल्याचे संतोषने सांगितले. या रकमेच्या व्याजापोटी आरोपी राजू अरमरकर आणि संतोषचा भाचा नीलेश केदार हे दर महिन्याला ३ टक्के व्याजदराने काळेकडून ४५ हजार रुपये उकळत होते. व्याजाची रक्कम देण्यास एक दिवस उशीर झाला तर त्यासाठी प्रति दिवस एक हजार रुपये जास्त घेतले जायचे.शिवीगाळ करून धमकीही द्यायचे. अशाप्रकारे सराफा अरमरकर आणि नीलेश केदार यांनी काळेकडून आतापर्यंत ११ लाख २५ हजार रुपये उकळले होते. दर महिन्याला ४५ हजार रुपये देणे शक्य नसल्यामुळे आणि पोलिसांनी आंबेकरविरुद्ध कडक कारवाई सुरू केल्याने काळेला हिंमत आली. त्यामुळे त्याने मंगळवारी तहसील ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यावरून पोलिसांनी कलम ३८६, ५०४, ५०६ (ब), ३४ आणि सावकारी कायद्याचे सहकलम ४४,४५ अन्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचाही तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर