शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

शिंगाड्याचे शेव खाल्ल्याने पुन्हा १० जणांना विषबाधा

By सुमेध वाघमार | Updated: March 21, 2024 17:40 IST

भगर व शिंगाड्याचा पिठापासून तयार केलेले खाद्य पदार्थ खावून तर काहींना हॉटेलमधील फराळी चिवडा व जिलेबी खाल्ल्यानंतर उलट्या, मळमळणे, पोटात दुखणे व अतिसाराची लक्षणे दिसून आली.

नागपूर : महाशिवरात्रीत उपवासानिमित्य शिंगाड्याचे पीठ व उपवास भाजणी पीठापासून तयार केलेल्या खाद्य पदार्थ खाल्ल्याने शहर व ग्रामीण भागातील १०० हून अधिक जणांना रुग्णालयांत दाखल होण्याची वेळ आली होती, याला १५ दिवसांचा कालावधी होत नाही तोच गुरुवारी पुन्हा शिंगाड्याचा पीठाचे शेव खाल्याने तीन महिलांसह सात पुरुष असे एकूण १० जणांना एका खासगी रुग्णालयात भरती व्हावे लागले. 

७ व ८ मार्च रोजी तयार भगर व शिंगाड्याचा पिठापासून तयार केलेले खाद्य पदार्थ खावून तर काहींना हॉटेलमधील फराळी चिवडा व जिलेबी खाल्ल्यानंतर उलट्या, मळमळणे, पोटात दुखणे व अतिसाराची लक्षणे दिसून आली. जवळपास १००वर जणांना शासकीयसह खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. एकट्या मेयोमध्ये ३४वर रुग्ण भरती होते. या घटनेला गंभीरतेने घेत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) उपवासाची भाजणी, भगर, सिंगाडा पिठ, सिंगाडा (अख्खा), राजगिरा आटा, फराळी चिवडा, खवा जिलेबी अशा एकूण ९ अन्न पदार्थाचे नमुने घेतले.

विश्लेषणासाठी ते प्रयोगशाळेत पाठविले. एकूण १ लाख ३२ हजार ९०० रुपये किंमतीचा साठाही जप्त केला. या शिवाय, एकुण ८ आस्थापनांच्या विरुध्द पुढील कायदेशीर कारवाई प्रक्रिया सुरू केली. उपवासाची भाजणी पीठ, सिंगाडा आटा उत्पादकास संबंधित बॅचचा साठा बाजारातून परत बोलविण्याचे आणि पुढील आदेशापर्यंत व्यवसाय बंद करण्याचे लेखी आदेशही दिले. एका कंपनीवर गुन्हाही दाखल करण्यात आला. परंतु  निकृष्ट दर्जाचे भगर, शिंगाड्याचे पीठ अद्यापही मार्केटमध्ये असल्याने कठोर कारवाई कधी होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

नाश्यात खाल्ली शिंगाड्याचा पीठाची शेव

प्राप्त माहितीनुसार, मिहानमधील एका प्रतिष्ठीत फार्मा कंपनीत काम करणाऱ्या १० कर्मचाऱ्यांनी कंपनीमधीलच कॅन्टीमधील शिंगाड्याचा पीठाची शेव खाल्ली. त्यानंतर तीन ते चार तास होताच सर्वांनाच मळमळ, उलट्या, पोटदुखीचा त्रास सुरू झाला. काही थंडी वाजून थरथर कापायला लागले. कंपनीच्या अधिकाºयांनी तातडीने त्यांना किंग्जवे हॉस्पिटलमध्ये दाखल केले. 

पदार्थात ‘अल्फा टॉक्सीन’ असण्याची शक्यता

रुग्णांवर उपचार करणारे डॉ. हर्षवर्धन बोरा यांनी ‘लोकमत’ला सांगितले, महाशिवरात्रीच्यावेळी जसे अन्नातून विषबाधेचे रुग्ण आढळून आले होते तशीच लक्षणे या रुग्णांना दिसून येत आहेत. अन्नात ‘अल्फा टॉक्सीन’ असल्यामुळे विषबाधा होते. विषबाधा झालेल्या दहा पैकी तीन महिला आहेत. त्यांची प्रकृती खालवल्याने त्यांना ‘आयसीयू’मध्ये तर सात पुरुषांना वॉर्डात भरती करण्यात आले. सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

टॅग्स :nagpurनागपूर