शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
3
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
4
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
5
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
6
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...
7
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
8
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
9
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
10
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
11
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले
12
यूएई सामन्याआधी केलेलं नाटक पाकिस्तानच्या अंगलट, आयसीसीनं पाठवला ईमेल!
13
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
14
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
15
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
16
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
18
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
19
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
20
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!

शिंगाड्याचे शेव खाल्ल्याने पुन्हा १० जणांना विषबाधा

By सुमेध वाघमार | Updated: March 21, 2024 17:40 IST

भगर व शिंगाड्याचा पिठापासून तयार केलेले खाद्य पदार्थ खावून तर काहींना हॉटेलमधील फराळी चिवडा व जिलेबी खाल्ल्यानंतर उलट्या, मळमळणे, पोटात दुखणे व अतिसाराची लक्षणे दिसून आली.

नागपूर : महाशिवरात्रीत उपवासानिमित्य शिंगाड्याचे पीठ व उपवास भाजणी पीठापासून तयार केलेल्या खाद्य पदार्थ खाल्ल्याने शहर व ग्रामीण भागातील १०० हून अधिक जणांना रुग्णालयांत दाखल होण्याची वेळ आली होती, याला १५ दिवसांचा कालावधी होत नाही तोच गुरुवारी पुन्हा शिंगाड्याचा पीठाचे शेव खाल्याने तीन महिलांसह सात पुरुष असे एकूण १० जणांना एका खासगी रुग्णालयात भरती व्हावे लागले. 

७ व ८ मार्च रोजी तयार भगर व शिंगाड्याचा पिठापासून तयार केलेले खाद्य पदार्थ खावून तर काहींना हॉटेलमधील फराळी चिवडा व जिलेबी खाल्ल्यानंतर उलट्या, मळमळणे, पोटात दुखणे व अतिसाराची लक्षणे दिसून आली. जवळपास १००वर जणांना शासकीयसह खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. एकट्या मेयोमध्ये ३४वर रुग्ण भरती होते. या घटनेला गंभीरतेने घेत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) उपवासाची भाजणी, भगर, सिंगाडा पिठ, सिंगाडा (अख्खा), राजगिरा आटा, फराळी चिवडा, खवा जिलेबी अशा एकूण ९ अन्न पदार्थाचे नमुने घेतले.

विश्लेषणासाठी ते प्रयोगशाळेत पाठविले. एकूण १ लाख ३२ हजार ९०० रुपये किंमतीचा साठाही जप्त केला. या शिवाय, एकुण ८ आस्थापनांच्या विरुध्द पुढील कायदेशीर कारवाई प्रक्रिया सुरू केली. उपवासाची भाजणी पीठ, सिंगाडा आटा उत्पादकास संबंधित बॅचचा साठा बाजारातून परत बोलविण्याचे आणि पुढील आदेशापर्यंत व्यवसाय बंद करण्याचे लेखी आदेशही दिले. एका कंपनीवर गुन्हाही दाखल करण्यात आला. परंतु  निकृष्ट दर्जाचे भगर, शिंगाड्याचे पीठ अद्यापही मार्केटमध्ये असल्याने कठोर कारवाई कधी होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

नाश्यात खाल्ली शिंगाड्याचा पीठाची शेव

प्राप्त माहितीनुसार, मिहानमधील एका प्रतिष्ठीत फार्मा कंपनीत काम करणाऱ्या १० कर्मचाऱ्यांनी कंपनीमधीलच कॅन्टीमधील शिंगाड्याचा पीठाची शेव खाल्ली. त्यानंतर तीन ते चार तास होताच सर्वांनाच मळमळ, उलट्या, पोटदुखीचा त्रास सुरू झाला. काही थंडी वाजून थरथर कापायला लागले. कंपनीच्या अधिकाºयांनी तातडीने त्यांना किंग्जवे हॉस्पिटलमध्ये दाखल केले. 

पदार्थात ‘अल्फा टॉक्सीन’ असण्याची शक्यता

रुग्णांवर उपचार करणारे डॉ. हर्षवर्धन बोरा यांनी ‘लोकमत’ला सांगितले, महाशिवरात्रीच्यावेळी जसे अन्नातून विषबाधेचे रुग्ण आढळून आले होते तशीच लक्षणे या रुग्णांना दिसून येत आहेत. अन्नात ‘अल्फा टॉक्सीन’ असल्यामुळे विषबाधा होते. विषबाधा झालेल्या दहा पैकी तीन महिला आहेत. त्यांची प्रकृती खालवल्याने त्यांना ‘आयसीयू’मध्ये तर सात पुरुषांना वॉर्डात भरती करण्यात आले. सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

टॅग्स :nagpurनागपूर