शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

गणेश भक्तांच्या मार्गात जनावरांचा अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2019 00:30 IST

शहरातील प्रमुख मार्गासह अंतर्गत मार्गावरही जनावरे ठिय्या मांडतात. यामुळे मूर्ती बघण्यासाठी जाणाऱ्या गणेश भक्तांच्या मार्गात अडथळा निर्माण झाल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत.

ठळक मुद्देशहरातील मार्गावर ठाण : वर्दळीच्या भागात अपघाताचा धोका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात सध्या गणेशोत्सवाची लगबग सुरू आहे. गणेश मंडळांच्या मोठ्या मूर्ती बघण्यासाठी भाविकांची गर्दी वाढली आहे. शहरातील अर्धवट सिमेंट कांक्रिट रोडमुळे आधीच वाहतुकीत अडथळा निर्माण झाला आहे. त्यात आता मोकाट जनावरांची भर पडली आहे. शहरातील प्रमुख मार्गासह अंतर्गत मार्गावरही जनावरे ठिय्या मांडतात. यामुळे मूर्ती बघण्यासाठी जाणाऱ्या गणेश भक्तांच्या मार्गात अडथळा निर्माण झाल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत.नागपूर शहरात १५ ते १६ हजार जनावरे आहेत. बहुसंख्य गोपालक जनावरांना मोकाट सोडतात यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होण्यासोबतच शेणामुळे रस्त्यांवर घाण पसरते. याला आळा घालणारी सक्षम यंत्रणा महापालिकेकडे नाही. इंदोरा, अजनी, झिंगाबाई टाकळी, पारडी, वर्धमानगर, महाल, अंबाझरी ते अमरावती रोड, फुटाळा तलाव परिसर, मानेवाडा रोड, सक्करदरा, गोपालनगर, त्रिमूर्तीनगर, सोनेगाव व वाठोडा यासह शहराच्या विविध भागात मोकाट जनावरांचा वावर आहे.जनावरे मोकट सोडली म्हणून पशुपालकांवर कारवाई केली जात असल्याचा दावा महापालिकेच्या कोंडवाडा विभागाकडून केला जातो. मात्र प्रत्यक्षात कारवाई करण्यासाठी या विभागाकडे सक्षम यंत्रणाच नाही. मनुष्यबळ व वाहनांचा अभाव असल्याने कारवाईला मर्यादा आहेत. मोकाट जनावरांमुळे रहदारीला अडथळा होण्यासोबतच घाणीची समस्या निर्माण झाली आहे.शहरातील सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यांवर घाण करणाऱ्या कुत्र्यांना व जनावरांना आळा घालण्याची जबाबदारी उपद्रव शोध पथकावर सोपविण्यात आल्याचा दावा केला जातो. परंतु या पथकांकडे अतिक्रमण, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, घाण पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे या पथकाकडून पुन्हा मोकाट जनावरांच्या गोपालकांचा शोध घेण्याची जबाबदारी सोपविल्यास ही समस्या सुटणार नाही.दंड आकारूनही समस्या कायमपशुपालकांनी जनावरे मोकाट सोडू नये यासाठी पहिल्या वेळेस त्यांना दंड आकारला जातो. मात्र दुसऱ्यांदा त्याच पशुपालकाने जनावर मोकाट सोडल्याचे आढळून आल्यास दंड आकारून गुन्हा दाखल करण्याची तरतूद नागरी क्षेत्रात जनावरे पाळणे व त्याची ने-आण करण्याबाबतच्या १९७६ च्या कायद्यात आहे. परंतु या कायद्याची अंमलबजावणी केली जात नाही. फक्त दंड आकारण्याची कारवाई केली जात असल्याने समस्या कायम आहे.पावसाळ्याच्या दिवसात समस्या गंभीरपावसाळ्याच्या दिवसात जनावरे कोरड्या जागेत ठिय्या मारतात. त्यामुळे रस्त्यांवरील कोरड्या जागेत जनावरे बसतात. गोपालक जनावरांना रात्रीलाही गोठ्यात बांधत नसल्याने ते रस्त्यावर बसून असतात. यामुळे अपघाताचा धोका असतो. पथदिवे बंद असल्यास अनेकदा दुचाकीस्वार जनावरांवर जाऊन जखमी होण्याच्या घटना घडतात.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाnagpurनागपूर