शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

गणेश भक्तांच्या मार्गात जनावरांचा अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2019 00:30 IST

शहरातील प्रमुख मार्गासह अंतर्गत मार्गावरही जनावरे ठिय्या मांडतात. यामुळे मूर्ती बघण्यासाठी जाणाऱ्या गणेश भक्तांच्या मार्गात अडथळा निर्माण झाल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत.

ठळक मुद्देशहरातील मार्गावर ठाण : वर्दळीच्या भागात अपघाताचा धोका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात सध्या गणेशोत्सवाची लगबग सुरू आहे. गणेश मंडळांच्या मोठ्या मूर्ती बघण्यासाठी भाविकांची गर्दी वाढली आहे. शहरातील अर्धवट सिमेंट कांक्रिट रोडमुळे आधीच वाहतुकीत अडथळा निर्माण झाला आहे. त्यात आता मोकाट जनावरांची भर पडली आहे. शहरातील प्रमुख मार्गासह अंतर्गत मार्गावरही जनावरे ठिय्या मांडतात. यामुळे मूर्ती बघण्यासाठी जाणाऱ्या गणेश भक्तांच्या मार्गात अडथळा निर्माण झाल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत.नागपूर शहरात १५ ते १६ हजार जनावरे आहेत. बहुसंख्य गोपालक जनावरांना मोकाट सोडतात यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होण्यासोबतच शेणामुळे रस्त्यांवर घाण पसरते. याला आळा घालणारी सक्षम यंत्रणा महापालिकेकडे नाही. इंदोरा, अजनी, झिंगाबाई टाकळी, पारडी, वर्धमानगर, महाल, अंबाझरी ते अमरावती रोड, फुटाळा तलाव परिसर, मानेवाडा रोड, सक्करदरा, गोपालनगर, त्रिमूर्तीनगर, सोनेगाव व वाठोडा यासह शहराच्या विविध भागात मोकाट जनावरांचा वावर आहे.जनावरे मोकट सोडली म्हणून पशुपालकांवर कारवाई केली जात असल्याचा दावा महापालिकेच्या कोंडवाडा विभागाकडून केला जातो. मात्र प्रत्यक्षात कारवाई करण्यासाठी या विभागाकडे सक्षम यंत्रणाच नाही. मनुष्यबळ व वाहनांचा अभाव असल्याने कारवाईला मर्यादा आहेत. मोकाट जनावरांमुळे रहदारीला अडथळा होण्यासोबतच घाणीची समस्या निर्माण झाली आहे.शहरातील सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यांवर घाण करणाऱ्या कुत्र्यांना व जनावरांना आळा घालण्याची जबाबदारी उपद्रव शोध पथकावर सोपविण्यात आल्याचा दावा केला जातो. परंतु या पथकांकडे अतिक्रमण, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, घाण पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे या पथकाकडून पुन्हा मोकाट जनावरांच्या गोपालकांचा शोध घेण्याची जबाबदारी सोपविल्यास ही समस्या सुटणार नाही.दंड आकारूनही समस्या कायमपशुपालकांनी जनावरे मोकाट सोडू नये यासाठी पहिल्या वेळेस त्यांना दंड आकारला जातो. मात्र दुसऱ्यांदा त्याच पशुपालकाने जनावर मोकाट सोडल्याचे आढळून आल्यास दंड आकारून गुन्हा दाखल करण्याची तरतूद नागरी क्षेत्रात जनावरे पाळणे व त्याची ने-आण करण्याबाबतच्या १९७६ च्या कायद्यात आहे. परंतु या कायद्याची अंमलबजावणी केली जात नाही. फक्त दंड आकारण्याची कारवाई केली जात असल्याने समस्या कायम आहे.पावसाळ्याच्या दिवसात समस्या गंभीरपावसाळ्याच्या दिवसात जनावरे कोरड्या जागेत ठिय्या मारतात. त्यामुळे रस्त्यांवरील कोरड्या जागेत जनावरे बसतात. गोपालक जनावरांना रात्रीलाही गोठ्यात बांधत नसल्याने ते रस्त्यावर बसून असतात. यामुळे अपघाताचा धोका असतो. पथदिवे बंद असल्यास अनेकदा दुचाकीस्वार जनावरांवर जाऊन जखमी होण्याच्या घटना घडतात.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाnagpurनागपूर