शहरं
Join us  
Trending Stories
1
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
2
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
3
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
4
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
5
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
6
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
7
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
8
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
9
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
10
‘मद्यपान करून गाडी चालवणारे दहशतवादीच’, कुरनूल बस अपघातानंतर हैदराबादच्या पोलीस आयुक्तांचं परखड विधान
11
युक्रेन युद्धादरम्यान रशियाने केली धोकादायक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी, ‘स्टॉर्म शॅडो क्रूज’ ला रोखणे अशक्य
12
गृहकर्ज घेताय? 'या' सरकारी आणि खासगी बँका देत आहेत सर्वात स्वस्त दरात होम लोन; लगेच तपासा व्याजदर
13
"त्या वेळचे फोटो, व्हिडीओ पोलिसांनी परिवाराला दाखवले नाहीत..."; आमदार धस यांनी व्यक्त केला संशय
14
2016 चौकार...! एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक चौकार लगावणारे ७ फलंदाज, कितव्या क्रमांकावर रोहित आणि विराट?
15
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण; गुन्हा दाखल एकीकडे, आरोपी PSI बदने हजर दुसरीकडे!
16
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
17
इंग्लंड दौऱ्यानंतर गंभीर, आगरकरने काढलं संघाबाहेर, त्याच फलंदाजाने कुटल्या १७४ धावा, केली चौकार, षटकारांची बरसात
18
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
19
गुंतवणूकदारांना बंपर भेट! 'ही' आयटी कंपनी देणार प्रति शेअर १३० रुपये लाभांश; रेकॉर्ड डेट कधी? लगेच तपासा
20
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...

राजकारणातून देशमुखांना गोवण्यात आले; दिलीप वळसे-पाटील यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2022 15:13 IST

केंद्र सरकारने या प्रकरणात योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

नागपूर : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा ज्या प्रकरणाशी काहीही संबंध नव्हता त्या प्रकरणात त्यांना केवळ राजकारणाचा भाग म्हणून गोवण्यात आले. सोमवारी त्यांना जामीन मिळाला, पण लगेच १० दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे. या प्रकरणाचा निकाल लागेल तेव्हा देशमुख हे नक्कीच निर्दोष सुटतील, असा दावा करीत माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी देशमुख यांची भक्कमपणे पाठराखण केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित व्हर्च्युअल रॅलीसाठी वळसे-पाटील सोमवारी गणेश पेठेतील पक्ष कार्यालयात आले होते. या रॅलीनंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, देशमुख यांना अटक होऊन एक वर्षापेक्षा जास्त काळ झाला आहे. त्यांची सुटका होईल याची आम्ही सर्वजण वाट पाहत आहोत. देशमुख यांनी वेळोवेळी त्यांची बाजू न्यायालयात मांडली. मात्र, जामीन मिळाला नाही. राजकीय सूड घेण्याचा प्रकार या प्रकरणात झालेला आहे. पण, ते निश्चितपणे यातून निर्दोषमुक्त होऊन बाहेर पडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, अनिल देशमुख यांना जामीन मिळाल्याचे वृत्त समजताच राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते देशमुख यांच्या सिव्हिल लाइन्स येथील बंगल्यासमोर जमले. कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या निनादात जल्लोष केला. एकमेकांना लाडू भरविले. प्रदेश प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील, शैलेंद्र तिवारी, शैलेश पांडे, नूतन रेवतकर, योगेश कोठेकर, आदींनी देशमुख यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. कट रचून देशमुख यांना तुरुंगात डांबण्यात आले. सोमवारी शरद पवार यांच्या जन्मदिवशी जामीन मिळाला. लवकरच देशमुख निर्दोष असल्याचे सिद्ध होईल, असा दावाही यावेळी कार्यकर्त्यांनी केला. यावेळी शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे उपस्थित होते.

राज्यपालांवर केंद्राने कारवाई करावी

- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत बोलताना वळसे-पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा आदर प्रत्येक माणसाच्या मनात आहे. त्यांच्याबद्दल कुणाकडूनही अशा प्रकारचे वक्तव्य होऊ नये. राज्यपाल कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील लोकांच्या भावना तीव्र आहेत. लोकांमध्ये रोष आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या प्रकरणात योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

टॅग्स :PoliticsराजकारणAnil Deshmukhअनिल देशमुखDilip Walse Patilदिलीप वळसे पाटील