शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणातून देशमुखांना गोवण्यात आले; दिलीप वळसे-पाटील यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2022 15:13 IST

केंद्र सरकारने या प्रकरणात योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

नागपूर : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा ज्या प्रकरणाशी काहीही संबंध नव्हता त्या प्रकरणात त्यांना केवळ राजकारणाचा भाग म्हणून गोवण्यात आले. सोमवारी त्यांना जामीन मिळाला, पण लगेच १० दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे. या प्रकरणाचा निकाल लागेल तेव्हा देशमुख हे नक्कीच निर्दोष सुटतील, असा दावा करीत माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी देशमुख यांची भक्कमपणे पाठराखण केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित व्हर्च्युअल रॅलीसाठी वळसे-पाटील सोमवारी गणेश पेठेतील पक्ष कार्यालयात आले होते. या रॅलीनंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, देशमुख यांना अटक होऊन एक वर्षापेक्षा जास्त काळ झाला आहे. त्यांची सुटका होईल याची आम्ही सर्वजण वाट पाहत आहोत. देशमुख यांनी वेळोवेळी त्यांची बाजू न्यायालयात मांडली. मात्र, जामीन मिळाला नाही. राजकीय सूड घेण्याचा प्रकार या प्रकरणात झालेला आहे. पण, ते निश्चितपणे यातून निर्दोषमुक्त होऊन बाहेर पडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, अनिल देशमुख यांना जामीन मिळाल्याचे वृत्त समजताच राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते देशमुख यांच्या सिव्हिल लाइन्स येथील बंगल्यासमोर जमले. कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या निनादात जल्लोष केला. एकमेकांना लाडू भरविले. प्रदेश प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील, शैलेंद्र तिवारी, शैलेश पांडे, नूतन रेवतकर, योगेश कोठेकर, आदींनी देशमुख यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. कट रचून देशमुख यांना तुरुंगात डांबण्यात आले. सोमवारी शरद पवार यांच्या जन्मदिवशी जामीन मिळाला. लवकरच देशमुख निर्दोष असल्याचे सिद्ध होईल, असा दावाही यावेळी कार्यकर्त्यांनी केला. यावेळी शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे उपस्थित होते.

राज्यपालांवर केंद्राने कारवाई करावी

- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत बोलताना वळसे-पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा आदर प्रत्येक माणसाच्या मनात आहे. त्यांच्याबद्दल कुणाकडूनही अशा प्रकारचे वक्तव्य होऊ नये. राज्यपाल कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील लोकांच्या भावना तीव्र आहेत. लोकांमध्ये रोष आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या प्रकरणात योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

टॅग्स :PoliticsराजकारणAnil Deshmukhअनिल देशमुखDilip Walse Patilदिलीप वळसे पाटील