शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

अन् शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 23:32 IST

सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना जाहीर करते. त्याचा शुभारंभही होतो, परंतु योजनेचा लाभ प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहचायला प्रतीक्षाच करावी लागते. परंतु एखाद्या योजनेचा शुभारंभ होताच त्याच दिवशी शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाल्याचे सुखद चित्र रविवारी नागपुरात पाहायला मिळाले. योजनेचा शुभारंभ झाला आणि शेतकऱ्यांच्या खात्यात पैसेही जमा झाले, या सुखद आश्चर्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरही हास्य फुलले.

ठळक मुद्देपंतप्रधान किसान सन्मान निधी योजनापहिल्याच दिवशी ४,४८३ शेतकऱ्यांच्या खात्यात थेट निधी जमा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना जाहीर करते. त्याचा शुभारंभही होतो, परंतु योजनेचा लाभ प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहचायला प्रतीक्षाच करावी लागते. परंतु एखाद्या योजनेचा शुभारंभ होताच त्याच दिवशी शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाल्याचे सुखद चित्र रविवारी नागपुरात पाहायला मिळाले. योजनेचा शुभारंभ झाला आणि शेतकऱ्यांच्या खात्यात पैसेही जमा झाले, या सुखद आश्चर्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरही हास्य फुलले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकºयांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना जाहीर केली. केंद्र सरकारची ही अतिशय महत्त्वाकांक्षी योजना असून, याची सुरुवात रविवारी देशभरात करण्यात आली. नागपुरातही याची सुरुवात झाली. रविवारी पहिल्याच दिवशी नागपूर जिल्ह्यातील तब्बल ४,४८३ शेतकऱ्यांच्या खात्यात थेट दोन हजार रुपये जमा झाले. पैसे जमा झाल्याचे एसएमएसही त्यांच्या मोबाईलवर आले, हे विशेष.नागपूर जिल्ह्यात एकूण शेतकरी ३ लाख ४४ हजार ११ असून, दोन हेक्टरपेक्षा कमी शेतजमीन असणारे २ लाख ४३ हजार २७० शेतकरी आहेत. दोन हेक्टरपर्यंत क्षेत्र असलेल्या शेतकरी कुटुंबीयास दोन हजार प्रति हप्ता याप्रमाणे दरवर्षी तीन हप्त्यात सहा हजार रुपयापर्यंत लाभ मिळणार आहे. या योजनेचा पहिला हप्ता ३१ मार्चपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा होणार आहे.योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचे निश्चितीकरण करून लाभार्थ्यांची यादी तयार करणे. यासाठी शेतकऱ्याचे नाव, लिंग, प्रवर्ग, आधार क्रमांक, बँकखाते क्रमांक, आयएफएससी कोड, मो.क्र. जन्मतारीख व पत्ता इत्यादी माहिती शेतकऱ्यांना द्यावयाची आहे. तसेच सामायिक कुटुंबातील एका सदस्याने योजनेचा लाभ बँक खात्यावर अदा करण्यासाठी स्वयं घोषणापत्र द्यावयाचे आहे. लाभार्थ्यांची यादी अंतिम झाल्यावर केंद्र शासनाच्या पीएम किसान पोर्टलवर अपलोड केली जाणार आहे. त्यानंतर लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर डीबीटीद्वारे निधी जमा होणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तर, जिल्हास्तर, तालुकास्तर व ग्रामस्तरावर सनियंत्रण समित्या गठित करण्यात आल्या असून, त्यानुसार योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.यासाठी जिल्हा प्रशासनाचे कार्य वाखाणण्याजोगे आहे. नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख २ हजार ३१७ पात्र शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती गोळा करून, ती अपलोड करण्यात आली आहे. यापैकी ६० हजारावर शेतकऱ्यांच्या अर्जांची तपासणी करून लाभ पोहचविण्याची कारवाई सुरू झाली आहे.प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्यापर्यंत पोहचणार योजनापंतप्रधानांची ही योजना अतिशय चांगली आहे. ती शेवटच्या पात्र शेतकऱ्यापर्यंत पोहचविण्यात येईल, अशी योजना आखली आहे. आतापर्यंत एक लाख दोन हजारावर शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती अपलोड झाली आहे. इतरही लाभार्थ्यांची माहिती अपलोड केली जात आहे. प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत योजना पोहोचावी यासाठी चित्ररथ तयार करून तो गावोगावी फिरवला जात आहे. या योजनेपासून एकही लाभार्थी शेतकरी वंचित राहणार नाही.अश्विन मुदगल, जिल्हाधिकारी

टॅग्स :Farmerशेतकरीfundsनिधी