शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

आणि माणसाची सावली दिसेनाशी झाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 21:48 IST

अंधार असल्याशिवाय सावली आपली साथ सोडत नाही, असे म्हणतात पण मंगळवारी तो क्षण आलाच. दुपारी १२.१० ची वेळ झाली आणि काही क्षणापूरती आपली सावली दिसेनाशी झाली. यालाच शून्य सावली दिवस म्हणतात. विशेष म्हणजे हा अनुभव केवळ नागपूरकरानाच घेता आला. कारण खगोलशास्त्राची ही अलौकिक घटना घडण्यासाठी केवळ उपराजधानीची स्थिती अनुकूल होती.

ठळक मुद्देनागरिकांनी अनुभवला शून्य सावली दिवस : पृथ्वीचा कोन साडे २३ अंश कलल्याने ही स्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अंधार असल्याशिवाय सावली आपली साथ सोडत नाही, असे म्हणतात पण मंगळवारी तो क्षण आलाच. दुपारी १२.१० ची वेळ झाली आणि काही क्षणापूरती आपली सावली दिसेनाशी झाली. यालाच शून्य सावली दिवस म्हणतात. विशेष म्हणजे हा अनुभव केवळ नागपूरकरानाच घेता आला. कारण खगोलशास्त्राची ही अलौकिक घटना घडण्यासाठी केवळ उपराजधानीची स्थिती अनुकूल होती.सूर्य डोक्यावर येतो किंवा आला असे आपण म्हणतो पण प्रत्यक्षात दोन दिवस वगळता सूर्य कधीच आपल्या डोक्यावर येत नाही, थोडा ना थोडा तो तिरपा असतोच. तो प्रत्यक्ष डोक्यावर येण्याचे दोन दिवस म्हणजे २६ मे आणि १७ जुलै. याचे शास्त्रीय कारणही तसे महत्त्वाचे आहे. रमण विज्ञान केंद्राचे शिक्षक विलास चौधरी यांनी झिरो शॅडो डे चे शास्त्रीय कारण समजावून सांगितले. आकाशातून सूर्याचे भ्रमण उत्तरेकडून दक्षिणेकडे आणि दक्षिणेकडून उत्तरेकडे होत असते ज्याला उत्तरायण व दक्षिणायन म्हणतात. पृथ्वी सूर्याभोवती फिरताना साडेतेवीस अशाचा कोन करीत असते. ज्या दिवशी, ज्या वेळी हा कोन होतो त्या वेळी शून्य सावली दिवस येतो. मजेशीर बाब म्हणजे हा सर्वत्र सारखा नसतो तर वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या भागात असतो.रमण विज्ञान केंद्र दरवर्षी झिरो शॅडो दे चे मार्गदर्शक आयोजन करीत असतो मात्र यावर्षी लॉकडाऊनमुळे ते शक्य झाले नाही.नागपुरातच सावली का गायब झाली ?तुमच्या मनात प्रश्न निर्माण होईल की नागपुरात शून्य सावली का झाली. उत्तर आहे... विलास चौधरी यांनी सांगितले, नागपूर शहराचा अक्षांश २१.१७ अंश आहे. सूर्याचा डिक्लीणेशन पॉईंट उत्तरायण किंवा दक्षिणायन करताना २१.१७ अंश असतो तेव्हा नागपुरात सूर्य डोक्यावर येतो. म्हणजेच दुपारी १२.१० वाजता सूर्याचा डिक्लीणेशन पॉईंट २१.१० अंश असल्याने आज शून्य सावली दिवस अनुभवता आला.११५० लोकांनी पाहिले फेसबुक लाईव्हलॉकडाऊन लक्षात घेता रमण विज्ञान केंद्रातर्फे केंद्राच्या फेसबुक पेजवर शून्य सावली दिवस लाईव्ह करण्यात आला. मंगळवारी आश्चर्याची बाब म्हणजे तब्बल ११५० च्यावर लोकांनी या क्षणाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. केंद्रात यासाठी व्यवस्था व्यवसथा करण्यात आली होती आणि यावेळी काही लोक उपस्थित होते.

टॅग्स :Zero Shadow Dayशून्य सावली दिवसnagpurनागपूर