शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

अन् नागपूर कारागृहाच्या भेसूर भिंती हसल्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 12:10 IST

उंच, उंच भक्कम दगडी भिंती आणि आतबाहेरचे रुक्ष वातावरण बघून कारागृहच काय, कारागृहाच्या आजूबाजूलाही भटकण्याची कुणाची इच्छा होत नाही. गुरुवारी मात्र भल्या सकाळपासूनच कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर अनाहूत पाहुण्यांनी गर्दी केली होती.

ठळक मुद्देचिमुकल्यांचा चिवचिवाटगळाभेट कार्यक्रमअन् लगबग, रुक्ष वातावरणात पेरली गेली हिरवळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उंच, उंच भक्कम दगडी भिंती आणि आतबाहेरचे रुक्ष वातावरण बघून कारागृहच काय, कारागृहाच्या आजूबाजूलाही भटकण्याची कुणाची इच्छा होत नाही. गुरुवारी मात्र भल्या सकाळपासूनच कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर अनाहूत पाहुण्यांनी गर्दी केली होती. सूर्य जसजसा वर येत होता, तसतशी या पाहुण्यांची वर्दळ वाढत होती. वर्दळच नव्हे तर आतबाहेर अस्वस्थताही ताणली जात होती. अखेर तो क्षण आला अन् पुढे कारागृहाच्या भेसूर भिंतीही हसू लागल्या. चिमुकल्यांचा चिवचिवाट अन् लगबग रुक्ष वातावरणात हिरवळ पेरणारी ठरली. निमित्त होते गळाभेट कार्यक्रमाचे.कारागृह प्रशासनाकडून वर्षांतून दोनदा गळाभेट उपक्रम पार पाडला जातो. त्यासाठी कैद्यांच्या नातेवाईकांना दोन आठवड्यांपूर्वीच सूचना दिली जाते. त्यांच्याकडून नावे मागवून घेतल्यानंतर गळाभेटीचा कार्यक्रम पार पडतो. आज गुरुवारी बालक दिनाचे औचित्य साधून कारागृहात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कारागृहात बंदिस्त असलेल्या कैद्यांना त्यांच्या चिमुकल्यांना भेटता येणार होते तर, कित्येक दिवसांपासून ज्याला बघितलेही नाही, तो आपला जन्मदाता, जन्मदात्री हिची आज प्रत्यक्ष भेट घेता येणार होती. त्याच्यासोबत गुजगोष्टी करता येणार होत्या म्हणून सकाळी ७ वाजल्यापासूनच कारागृहाच्या आत आणि बाहेरची अस्वस्थता क्षणोक्षणी तीव्र होत होती. अखेर तो क्षण आला. सकाळी ९ वाजता कारागृहाचे मुख्य प्रवेशद्वार उघडले गेले अन् बाहेर असलेल्या चिमुकल्यांना आतमध्ये सोडण्याची प्रक्रिया सुरू झाली. कारागृहाच्या आत गळाभेट सुरू झाली. ज्या कैद्यांची मुले एकदमच छोटी असेल तर त्याच्या पत्नी किंवा अन्य नातेवाईकांना या चिमुकल्यांना कारागृहात आणण्याची मुभा दिली जाते. त्यानुसार, दोन महिला आणि ६० पुरूष अशा एकूण ६२ कैद्यांची १११ मुले आणि नातेवाईकांसह १३१ जणांना टप्प्याटप्प्याने कारागृहात प्रवेश देण्यात आला.आपल्या काळजाच्या तुकड्याला भेटण्यासाठी, त्याच्याशी गुजगोष्टी करण्यासाठी आतूर असलेल्या कैद्यांना मुलगा, मुलगी समोर आल्याचे पाहून प्रारंभीचे काही क्षण अत्यानंदामुळे काही सुचतच नव्हते. अनेकजण नसते त्यांना छाताशी कवटाळून अश्रूंना वाट मोकळी करून देत होते. नंतर मात्र, त्यांना खाऊ देणे, त्यांच्याशी हितगूज साधण्यात, चिमुकल्याचा खोडकरपणा पहाण्यात ते दंग झाल्याचे चित्र होते. कारागृहाचे अधीक्षक अनुपकुमार कुमरे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने कैदी आणि त्यांच्या मुलांसाठी शिरा, पुरी, भाजीची व्यवस्था केली होती. शिवाय चॉकलेट, वेफर्स, बिस्कीट चिवडा आदीही कारागृहातून उपलब्ध करून दिले होते.कुणी बनले घोडा, कुणी बनले अ‍ॅक्टरसमजाच्या लेखी क्रूर ठरलेले हे कैदी आपल्या चिमुल्यांसाठी लहानगे झाले होते. कुणी आपल्या मुलांसाठी घोडा बनून त्यांना पाठीवर बसवून फिरत होते तर, कुणी प्राण्यापक्ष्याचे आवाज काढत मिमिक्री करताना दिसत होते तर कुणी आपल्या मुलांना अ‍ॅक्टिंग करून दाखवत होते. बापलेक अन् मायलेकांमधील हा सर्वोच्च आनंदाचा कार्यक्रम ३० मिनिटे चालत होता. नंतर, दुसºया कैद्यांना आणि त्यांच्या मुलांना बोलवून घेतले जात होते. या कार्यक्रमाचा समारोप झाला तेव्हा कैदी आणि त्यांचे नातेवाईकच नव्हे तर कारागृह प्रशासनही गहिवरले होते.डॉ. उपाध्याय यांची कल्पना !पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय हे राज्य कारागृहाचे प्रमुख असताना त्यांनी हा उपक्रम महाराष्ट्रातील कारागृहात सुरू केला होता. वेगवेगळ्या कारणांमुळे अनेक कैद्यांना संचित किंवा अभिवचन रजेवर जाता येत नाही. त्यामुळे त्या कैद्याची मानसिक स्थिती बिघडते. तो खचून जातो. अशा कैद्यांच्या १६ वर्षांपर्यंतच्या मुलांना कारागृहात बोलवून कैद्यासोबत त्यांची भेट घडवून आणण्याची या उपक्रमामागे कल्पना होती. आज कार्यक्रमाच्या प्रारंभी कारागृह अधीक्षक अनुपकुमार कुमरे यांच्या हस्ते पं. जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. वरिष्ठ तुरुंगाधिकारी व्ही. सी. वानखेडे, कारखाना व्यवस्थापक आर. आर. भोसले, तुरुंगाधिकारी ए. एस. कांदे, कमलाकर मिराशे, डी. एस. आढे, विठ्ठल शिंदे, योगेश पाटील, संजीव हटवादे, सामाजिक कार्यकर्ते महादेव डोंगरे आणि मीना लाटकर प्रामुख्याने उपस्थित होते.

टॅग्स :jailतुरुंग