शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
2
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
3
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
4
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
5
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
6
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
7
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
8
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
9
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
10
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
11
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
12
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
13
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
14
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
15
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
16
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
17
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
18
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
19
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
20
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार

.. आणि तयार झाले जबाबदारीचे ‘सोशल कनेक्शन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 11:30 IST

नागपूरच्या काही तरुणांनी देशव्यापी ग्रुप तयार करून या माध्यमातून भुकेल्यांना अन्न, आजारी लोकांच्या प्राथमिक उपचारासाठी डॉक्टरांची मदत, ज्येष्ठांसाठी औषधांचा पुरवठा आणि गरजवंतांना हवी ती मदत पोहचविण्याचा वसा त्यांनी घेतला आहे.

ठळक मुद्देफोनवर डॉक्टर, ज्येष्ठांना औषध व अन्नदानहीअफवा नियंत्रणाचीही यंत्रणा

निशांत वानखेडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या महामारीने भल्याभल्या देशांना विळख्यात घेतले, तसे ते संकट भारतावरही ओढवले आहे. या कठीण प्रसंगी संकटाची प्रत्यक्ष झळ पोहचलेल्यांसाठी मदतीचे असंख्य हात पुढे सरसावले आहेत. सोशल मीडियावर एकीकडे अफवांचे पेव फुटले असताना याच सोशल मीडियाच्या माध्यमातून काहींनी मदतीचा सेतू उभा केला आहे. नागपूरच्या काही तरुणांनी असा देशव्यापी ग्रुप तयार करून या माध्यमातून भुकेल्यांना अन्न, आजारी लोकांच्या प्राथमिक उपचारासाठी डॉक्टरांची मदत, ज्येष्ठांसाठी औषधांचा पुरवठा आणि गरजवंतांना हवी ती मदत पोहचविण्याचा वसा त्यांनी घेतला आहे. जगात कोरोना विषाणूचा उद्रेक झाला तसा समाजमाध्यमांवर अफवांचा बाजार सुरू झाला होता. यावरील संदेशांनी लोकांमध्ये भीतीचे आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण केले. कोरोनाबाबत पसरविण्यात येणारे यातील बहुतेक संदेश खोटे (फेक) असूनही सामान्य नागरिकांना याची जाणीव नसल्याने अधिक नुकसानकारक होते. अशी खोटी माहिती पसरविणाऱ्या संदेशांची पोलखोल करण्यासाठी खरेतर या ग्रुपची निर्मिती झाल्याचे डॉ. अभिक घोष यांनी सांगितले. आलेल्या संदेशाला इंटरप्रीट करून त्यातील खरेपणा लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम सुरू करण्यात आले. त्यासाठी माध्यम तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला. पुढे मात्र या कामाची व्याप्ती वाढत गेली. लॉकडाऊनमुळे समाजातील वेगवेगळ्या वर्गातील लोक अडचणीत आले. ही अडचण लक्षात घेऊन तरुणांनी मदतीसाठी पुढाकार घेतला. सर्वात महत्त्वाची होती वैद्यकीय मदत. आरोग्यसेवा अत्यावश्यक सेवेत असली तरी शहरातील बहुतेक डॉक्टरांचे क्लिनिक, नर्सिंग होम, रुग्णालये बंद झाली आहेत. अशावेळी साधा ताप, खोकला जरी असला तरी लोकांमध्ये भीती निर्माण होते. अशांसाठी ‘डॉक्टर्स आॅन कॉल’ ही सेवा सुरू करण्यात आली. कोणत्याही आजारामध्ये प्राथमिक उपचार मिळेल, यासाठी ग्रुपमध्ये असलेले तरुण डॉक्टर्स मदतीसाठी पोहचू लागले. लोकांची भीती दूर करण्यासाठी ग्रुपमधल्या ५ मानसोपचारतज्ज्ञ आणि २५ कौन्सिलर्सची मदत घेतली जात आहे. या काळात कुणी मदतीसाठी नसलेल्या ज्येष्ठ नागरिकांना व आजारी रुग्णांना मोठी समस्या सहन करावी लागत असल्याचे लक्षात आल्यावर तरुणांनी औषधोपचार आणि जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा करण्याची सेवाही राबविली आहे. यातूनच पुढे अन्न पुरवठ्याचीही संकल्पना आली आणि भुकेल्या गरजूंपर्यंत दररोज २०० पॅकेट्स शिजलेले अन्न पोहचविण्याची सेवाही सुरू झाली. ग्रुपमधील जवळपास १८० सदस्यांच्या संपर्कातूनच हे सर्व सेवाकार्य चालले आहे. विशेष म्हणजे यातील काही आर्थिक संपन्न व्यक्तींनी या प्रत्येक कामासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. या ग्रुपमधील जाणकारांनी पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट (पीपीई) किट तयार करण्याचे कामही सुरू केले आहे. अडचणीत फसलेल्या इतर शहरांतील लोकांना त्या त्या शहरातील सदस्यांद्वारे तातडीची मदत पोहचविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही डॉ. घोष यांनी य्पष्ट केले. अशाप्रकारे सोशल मीडियातून सामाजिक जाणिवेचा सेतू उभा राहिला आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस