शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वनबलप्रमुखांचा ‘सातसूत्री’ अजेंडा

By admin | Updated: July 4, 2014 01:13 IST

राज्याचे नवनियुक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबलप्रमुख) ए. के. सक्सेना यांनी पदभार स्वीकारताच आपल्या १५ महिन्यांच्या कामकाजाचा ‘रोडमॅप’ तयार केला आहे. त्यामुळे पुढील काळात

इतर विभागाशी समन्वय साधणार : १५ महिन्यांचा ‘रोडमॅप’नागपूर : राज्याचे नवनियुक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबलप्रमुख) ए. के. सक्सेना यांनी पदभार स्वीकारताच आपल्या १५ महिन्यांच्या कामकाजाचा ‘रोडमॅप’ तयार केला आहे. त्यामुळे पुढील काळात वन विभागाची गाडी ‘सुपर फास्ट’ गतीने धावण्याची शक्यता आहे. यासाठी सक्सेना यांनी तयार केलेल्या ‘सातसूत्री’ अजेंड्याची त्यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत माहिती दिली. त्यानुसार सक्सेना यांनी वन विभागातील कार्यप्रणाली हाताळताना व्यक्तिआधारित व्यवस्था न ठेवता, संस्थाआधारित व्यवस्था निर्माण करणे, अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या शनिवारी सभा घेणे, वन विकास महामंडळ व सामाजिक वनीकरण विभागाशी समन्वय साधणे, कार्यालयीन क्षमता वाढविण्यासाठी अभिलेख्यांचे वर्गीकरण करणे, जुन्या व निरुपयोगी नस्ती नष्ट करून कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे, मूल्यांकन विभागाचे बळकटीकरण व चांगल्या कामांची नोंद घेऊन त्याचे समाजासमोर सादरीकरण करणे, असे प्रमुख निर्णय घेतले आहेत. सेवानिवृत्त वनबलप्रमुख एस. डब्ल्यू. एच. नकवी यांच्या जागी सक्सेना यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी अलीकडेच १ जुलै रोजी या पदाचा पदभार स्वीकारला. यानंतर ते प्रथमच पत्रकारांशी बोलत होते. सक्सेना पुढे म्हणाले, गत पाच वर्षांत वन विभागात फार मोठा बदल झाला. पूर्वी निधीची फार मोठी समस्या भेडसावत होती. परंतु गत काही वर्षांत ती दूर झाली आहे. त्यामुळे विकास कामांना गती मिळाली आहे. पुढील १५ महिन्यांच्या काळात खूपकाही करण्याची इच्छा आहे, शिवाय यापूर्वीही अनेक विकास कामे झाली आहेत. गत २०१० ते २०१४ दरम्यान राज्यात १५७२.१४ लाख रोपांची लागवड करण्यात आली आहे. तसेच २०१४-१५ या आर्थिक वर्षांसाठी सहा कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले असून, आतापर्यंत त्यापैकी दोन कोटींचे उद्दिष्ट साध्य करण्यात यश मिळाले आहे. दुसरीकडे जंगलाशेजारी राहणाऱ्या लोकांचा जंगलावरील भार कमी करण्यासाठी २०१२-१३ मध्ये २८.६१ कोटी रुपयांचा खर्च करून ४१ हजार ६४६ कुटुंबांना एलपीजी व बायोगॅसचे वाटप करण्यात आले. तसेच २०१३-१४ मध्ये ३२ हजार ८६५ कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सर्जन भगत, एपीसीसीएफ व्ही. के. सिन्हा व शेषराव पाटील यांच्यासह आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)