शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
3
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
4
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
5
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
6
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
7
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
8
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
9
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
10
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
11
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
12
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
13
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
14
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
15
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
16
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
17
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
18
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
19
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
20
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज

वनबलप्रमुखांचा ‘सातसूत्री’ अजेंडा

By admin | Updated: July 4, 2014 01:13 IST

राज्याचे नवनियुक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबलप्रमुख) ए. के. सक्सेना यांनी पदभार स्वीकारताच आपल्या १५ महिन्यांच्या कामकाजाचा ‘रोडमॅप’ तयार केला आहे. त्यामुळे पुढील काळात

इतर विभागाशी समन्वय साधणार : १५ महिन्यांचा ‘रोडमॅप’नागपूर : राज्याचे नवनियुक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबलप्रमुख) ए. के. सक्सेना यांनी पदभार स्वीकारताच आपल्या १५ महिन्यांच्या कामकाजाचा ‘रोडमॅप’ तयार केला आहे. त्यामुळे पुढील काळात वन विभागाची गाडी ‘सुपर फास्ट’ गतीने धावण्याची शक्यता आहे. यासाठी सक्सेना यांनी तयार केलेल्या ‘सातसूत्री’ अजेंड्याची त्यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत माहिती दिली. त्यानुसार सक्सेना यांनी वन विभागातील कार्यप्रणाली हाताळताना व्यक्तिआधारित व्यवस्था न ठेवता, संस्थाआधारित व्यवस्था निर्माण करणे, अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या शनिवारी सभा घेणे, वन विकास महामंडळ व सामाजिक वनीकरण विभागाशी समन्वय साधणे, कार्यालयीन क्षमता वाढविण्यासाठी अभिलेख्यांचे वर्गीकरण करणे, जुन्या व निरुपयोगी नस्ती नष्ट करून कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे, मूल्यांकन विभागाचे बळकटीकरण व चांगल्या कामांची नोंद घेऊन त्याचे समाजासमोर सादरीकरण करणे, असे प्रमुख निर्णय घेतले आहेत. सेवानिवृत्त वनबलप्रमुख एस. डब्ल्यू. एच. नकवी यांच्या जागी सक्सेना यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी अलीकडेच १ जुलै रोजी या पदाचा पदभार स्वीकारला. यानंतर ते प्रथमच पत्रकारांशी बोलत होते. सक्सेना पुढे म्हणाले, गत पाच वर्षांत वन विभागात फार मोठा बदल झाला. पूर्वी निधीची फार मोठी समस्या भेडसावत होती. परंतु गत काही वर्षांत ती दूर झाली आहे. त्यामुळे विकास कामांना गती मिळाली आहे. पुढील १५ महिन्यांच्या काळात खूपकाही करण्याची इच्छा आहे, शिवाय यापूर्वीही अनेक विकास कामे झाली आहेत. गत २०१० ते २०१४ दरम्यान राज्यात १५७२.१४ लाख रोपांची लागवड करण्यात आली आहे. तसेच २०१४-१५ या आर्थिक वर्षांसाठी सहा कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले असून, आतापर्यंत त्यापैकी दोन कोटींचे उद्दिष्ट साध्य करण्यात यश मिळाले आहे. दुसरीकडे जंगलाशेजारी राहणाऱ्या लोकांचा जंगलावरील भार कमी करण्यासाठी २०१२-१३ मध्ये २८.६१ कोटी रुपयांचा खर्च करून ४१ हजार ६४६ कुटुंबांना एलपीजी व बायोगॅसचे वाटप करण्यात आले. तसेच २०१३-१४ मध्ये ३२ हजार ८६५ कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सर्जन भगत, एपीसीसीएफ व्ही. के. सिन्हा व शेषराव पाटील यांच्यासह आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)