शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

नागपूरच्या अमृता ठरल्या डेलिवूडच्या मिसेस इंडिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 00:49 IST

मनात स्वप्न असेल, ते पूर्ण करण्याची जिद्द असेल आणि सोबत कुटुंबाचाही विश्वासपूर्ण पाठिंबा असेल तर मोठ्यातले मोठे स्वप्न आत्मविश्वासाने पूर्ण करता येते. नागपूरच्या अमृता देवेन पाघडाल यांनी ही बाब खरी करून दाखविली. देशभरातील विवाहित सौंदर्यवतींना मात देत उपराजधानीच्या अमृता यांनी डेलिवूडचा ‘मिसेस इंडिया-२०१८’ हा किताब प्राप्त केला आहे. त्यामुळे सौंदर्य क्षेत्रामध्येही संत्रानगरीची ओळख निर्माण केली आहे.

ठळक मुद्देसौंदर्य स्पर्धेत संत्रानगरीच्या सौंदर्यवतीचा डंका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मनात स्वप्न असेल, ते पूर्ण करण्याची जिद्द असेल आणि सोबत कुटुंबाचाही विश्वासपूर्ण पाठिंबा असेल तर मोठ्यातले मोठे स्वप्न आत्मविश्वासाने पूर्ण करता येते. नागपूरच्या अमृता देवेन पाघडाल यांनी ही बाब खरी करून दाखविली. देशभरातील विवाहित सौंदर्यवतींना मात देत उपराजधानीच्या अमृता यांनी डेलिवूडचा ‘मिसेस इंडिया-२०१८’ हा किताब प्राप्त केला आहे. त्यामुळे सौंदर्य क्षेत्रामध्येही संत्रानगरीची ओळख निर्माण केली आहे.अमृता या उद्योजक देवेन पाघडाल यांच्या पत्नी. विवाहानंतर महिलांचा सौंदर्य स्पर्धांमध्ये सहभाग सहज स्वीकारला जात नाही. अमृता यांनी या अशक्य गोष्टीला शक्य केले. सौंदर्य स्पर्धांबाबत आवड असली तरी पूर्वी कधीही याबाबत विचार केला नव्हता. मिस, मिसेस व मिस्टर इंडिया आदी सौंदर्य स्पर्धा आयोजित करणाऱ्या दिल्लीच्या डेलिवूडतर्फे ही सौंदर्य स्पर्धा घेण्यात आली. त्यासाठी एप्रिल महिन्यात नागपूरला आॅडिशन घेण्यात आले. त्याही या आॅडिशनमध्ये सहभागी झाल्या. मात्र परीक्षकांना त्यांच्यातील आत्मविश्वास आवडला व त्यांची निवड केली. हा त्यांच्यासाठीही आश्चर्याचा धक्का होता. मात्र निवड झाल्याने त्यांनी गंभीरतेने हे आव्हान स्वीकारले. दोन महिने त्यांच्याकडे होते. सौंदर्य स्पर्धा म्हटले की आहारात बरेच परिवर्तन करावे लागते. मात्र बाहेरच्या खाद्यपदार्थावर बंधन घालण्यापलीकडे फार परिवर्तन न केल्याचे त्यांनी सांगितले. त्यापेक्षा सौंदर्य स्पर्धामध्ये चालणे, व्यवहार, हावभाव, वक्तृ त्व आणि व्यक्तिमत्त्वाबाबत अधिक अभ्यास केल्याचे त्या म्हणाल्या. १५ जुलैपासून दिल्ली येथे प्रत्यक्ष स्पर्धेला सुरुवात झाली. देशभरातील ४१ महिला स्पर्धक यामध्ये सहभागी होते. यावेळी डेलिवूडचे संस्थापक विनोद अहलावत, त्यांच्या पत्नी ओनम अहलावत आणि नृत्य दिग्दर्शक बाबला कथुरीया यांनी विशेष मार्गदर्शन केल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्यातील आत्मविश्वासाने स्पर्धेचे विजेते पद पटकाविण्यासह बुद्धिमत्ता व सर्वोत्कृष्ट हास्याचा किताबही त्यांनी प्राप्त केला.सौंदर्य स्पर्धांचा विषय आजही समाजामध्ये सन्मानाने स्वीकारला जात नाही. मात्र पाघडाल कुटुंबाने अतिशय विश्वासाने अमृता यांना पाठिंबा दिला. कुटुंबाच्या सहकार्याने आपण विजेता ठरू शकल्याचे अमृता यांनीही मान्य केले. स्वत:ला सिद्ध करायचे व या क्षेत्रात चांगली माणसे आहेत हे समाजाला सांगायचे होते. या क्षेत्रात पुढच्या वाटचालीबाबत विचार केला नाही, मात्र आपल्या शहरात संधी मिळाली तर नक्की विचार करेन, असे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

 

टॅग्स :nagpurनागपूर