शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

संवेदनशील आणि मने जुळणाऱ्या थोड्या लेखकांमध्ये आशा बगे अग्रस्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2023 21:05 IST

Nagpur News महाराष्ट्रात संवेदनशील आणि मने जुळणारे लेखन फार कमी झाले आहे आणि ज्यांनी असे लेखन केले, त्यात सर्वांत अग्रस्थानी ज्यांचे नाव घ्यायला हवे, त्या आशा बगे असल्याची भावना ज्येष्ठ संपादक व विचारवंत प्रा. सुरेश द्वादशीवार यांनी सोमवारी येथे व्यक्त केली.

ठळक मुद्दे कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आशा बगे यांचा सत्कार

नागपूर : महाराष्ट्रात संवेदनशील आणि मने जुळणारे लेखन फार कमी झाले आहे आणि ज्यांनी असे लेखन केले, त्यात सर्वांत अग्रस्थानी ज्यांचे नाव घ्यायला हवे, त्या आशा बगे असल्याची भावना ज्येष्ठ संपादक व विचारवंत प्रा. सुरेश द्वादशीवार यांनी सोमवारी येथे व्यक्त केली.

ज्येष्ठ साहित्यिक आशा बगे यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने जनस्थान पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्कारानिमित्त विदर्भ गौरव प्रतिष्ठान व आधार बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार प्रा. सुरेश द्वादशीवार यांच्या हस्ते करण्यात आला.

श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृहात पार पडलेल्या या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी गिरीश गांधी होते, तर व्यासपीठावर हेमंत काळीकर, डॉ. अविनाश रोडे, बाळ कुळकर्णी, नीलेश खांडेकर उपस्थित होते.

आशा बगे यांनी पारंपरिकता जपतानाच आधुनिकेतची कास कधीच सोडली नाही. स्वभावाची सात्त्विक, सोज्वळ छाप असलेल्या त्यांच्या लिखाणामध्ये अतिशय समर्पकरीत्या पारंपरिकतेची आधुनिकतेची सांगड घातल्याचे दिसून येते, अशा शब्दांत प्रा. सुरेश द्वादशीवार यांनी भावना व्यक्त केल्या.

आशाताईंना साहित्य अकादमीनंतर जनस्थान पुरस्कार मिळणे, ही केवळ नागपूरच नाही तर विदर्भाच्या साहित्यिक विश्वासाठी अभिमानाची गोष्ट आहे, असे डॉ. गिरीश गांधी अध्यक्षस्थानाहून म्हणाले.

सूत्रसंचालन शुभदा फडणवीस यांनी केले, तर आभार बाळ कुळकर्णी यांनी मानले. प्रेक्षकांमध्ये ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार, डॉ. कुमार शास्त्री, सुनीती देव यांच्यासह साहित्य व सामाजिक क्षेत्रांतील अनेक मान्यवर उपस्थित होते.

लेखिकाच मागे का? - आशा बगे

- कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दिल्या जाणाऱ्या जनस्थान पुरस्काराच्या गेल्या १७ वर्षांच्या काळात केवळ दोन-तीन लेखिकांनाच हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदीही लेखिकांना नगण्य स्थान मिळाले आहे. हे असे का? की लेखिकांची दखल घेतली जात नाही? असे प्रश्न आशा बगे यांनी सत्काराला उत्तर देताना यावेळी उपस्थित केले.

 

................

टॅग्स :literatureसाहित्य