शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

खड्ड्यात अ‍ॅम्ब्युलन्स फसली अन् युवकाचा झाला मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 19:56 IST

एका युवकाला मध्यरात्री हृदयविकाराचा झटका आला. त्याला रुग्णालयात घेऊन जात असताना रस्त्यावरील खड्ड्यात रुग्णवाहिका फसली, त्यामुळे वेळेत रुग्णालयात पोहचू न शकल्याने युवकाचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देउपराजधानीत घडलीय घटना : आता तरी प्रशासनाला येईल का जाग?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहराचा विकास झपाट्याने होत आहे. जागोजागी सिमेंटचे गुळगुळीत रस्ते बनत आहेत. मात्र या विकासाच्या प्रक्रियेत शहरालगत असलेल्या वस्त्या कोसोदूर आहे. लोकमतने बेसा-बेलतरोडी परिसरातील अशाच काही वस्त्यांवर यापूर्वी फोकस केला होता. घातपाताची शक्यताही वर्तविली होती. अन् अखेर घटना घडलीच. परिसरातील एका युवकाला मध्यरात्री हृदयविकाराचा झटका आला. त्याला रुग्णालयात घेऊन जात असताना रस्त्यावरील खड्ड्यात रुग्णवाहिका फसली, त्यामुळे वेळेत रुग्णालयात पोहचू न शकल्याने युवकाचा मृत्यू झाला. (काही कारणास्तव युवकाचे नाव देऊ शकत नाही.) ही घटना प्रशासनासाठी, लोकप्रतिनिधींसाठी नाकर्तेपणाची आहे. घटना १ सप्टेंबरच्या मध्यरात्रीची असून, ती आता उजेडात आली.मिहान प्रकल्पाचा गाजावाजा झाल्यानंतर अनेकांनी बेसा, बेलतरोडी या भागात निवासासाठी प्राथमिकता दर्शविली. त्यामुळे मनीषनगरपासून सोमलवाडा, बेलतरोडीपर्यंत नवीन नागपूर वसले. मोठमोठ्या फ्लॅट स्कीम, कॉलनी बिल्डरांनी बनविल्या. यातील काही कॉलनी शहरातील सीमेला लागून आहेत, त्यांचा समावेश ग्रामपंचायतीमध्ये होत आहे. त्यामुळे या कॉलनी, सोसायट्यांमध्ये विकास कामे ना मनपा करीत आहे, ना ग्रामपंचायत. बेसा ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या जयंतीनगरी-३ येथील रहिवाशांना याचा फटका बसत आहे. याच जयंतीनगरी-३ मध्ये तो युवक कुटुंबासह राहत होता. १ सप्टेंबरच्या मध्यरात्री त्याला हृदयविकाराचा झटका आला. तत्काळ अ‍ॅम्ब्युलन्स बोलावण्यात आली. तेव्हा पाऊसही जोराचा होता. अ‍ॅम्ब्युलन्स रुग्णाला घेऊन रुग्णालयाकडे निघाली. दरम्यान, रात्री १.३० वाजताच्या सुमारास प्रभूनगरातील गणपती मंदिराच्या समोरील खड्ड्यात ती अ‍ॅम्ब्युलन्स फसली. खड्ड्यातून अ‍ॅम्ब्युलन्स काढण्यासाठी अ‍ॅम्ब्युलन्समधील डॉक्टर, ड्रायव्हर आणि रुग्णासोबत असलेल्या महिलेचे प्रयत्न सुरू झाले. परंतु यश आले नाही. अखेर त्या महिलेने रात्री २ वाजता आजूबाजूच्या घरात जाऊन लोकांना उठविले. काही युवकांच्या मदतीने अ‍ॅम्ब्युलन्स खड्ड्यातून काढण्यात आली. पण यात अर्ध्या तासापेक्षा अधिक वेळ निघून गेला होता. रुग्णालयात पोहचल्यानंतर डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले. मात्र तो युवक उपचाराला प्रतिसाद देऊ शकला नाही आणि त्याचा मृत्यू झाला. उपराजधानीत जिथे विकासाचा झपाटा सुरू आहे, तिथे खड्ड्यात अ‍ॅम्ब्युलन्स फसल्याने रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो, ही शोकांतिका आहे. विशेष म्हणजे घटना घडल्यानंतर तो खड्डा परिसरातील नागरिकांनी बुजविला आहे.हा प्रशासनाने केलेला मर्डर आहेअ‍ॅम्ब्युलन्स फसणे, रुग्ण दगावणे या घटना दुर्गम भागात घडतात. आम्ही तर शहरात राहतोय. जिथे विकास आमच्या डोळ्यासमोर दिसतोय. आम्हीही हा विकास आमच्या घरापर्यंत पोहचविण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधींकडे कित्येकदा गळ घातली. पण कर्तव्यदक्ष प्रशासन आमच्याबाबतीत शून्य ठरले. हा मृत्यू अकस्मात नाही, तर प्रशासनाने केलेला तो मर्डर आहे.वैशाली आसकर, घटनेच्या साक्षीदार, रहिवासी जयंतीनगरी - ३सहा वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहेआम्ही २०१३ पासून मूलभूत सोयीसुविधांसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहोत. वेळोवेळी ग्रा.पं.ला निवेदन, नगरसेवकांना भेटून तक्रारी केल्या. पालकमंत्र्यांपर्यंत आम्ही आमच्या समस्या मांडल्या आहेत. रस्ते तरी सुरळीत करा, अशी आमची अपेक्षा आहे. मात्र आतापर्यंत कुणीच लक्ष दिले नाही. त्यामुळेच आमच्या कॉलनीतील एका सहकाऱ्याचा बळी गेला.राहुल राऊत, रहिवासी, जयंतीनगरी - ३

 

 

 

टॅग्स :Deathमृत्यूnagpurनागपूर