शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

दीक्षाभूमीवरील भूमिगत पार्किंगविरोधात आंबेडकरी अनुयायांचे आंदोलन

By आनंद डेकाटे | Updated: July 1, 2024 18:37 IST

राज्यभरातून हजारो अनुयायी दीक्षाभूमीवर धडकले, काम बंद पाडले : भूमिगत पार्किंग रद्द करण्याची समितीने केली घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भूमिगत पार्किंगमुळे भविष्यात स्मारक व बोधिवृक्षाला धोका होण्याची शक्यता असल्याने दीक्षाभूमीवर भूमिगत पार्किंगविरोधात आंबेडकरी अनुयायांनी सोमवारी एल्गार पुकारला. भूमिगत पार्किंग नकोच? अशी आक्रमक भूमिका घेत सोमवारी राज्यभरातून हजारो आंबेडकरी समाजबांधवांनी दीक्षाभूमीवर धडक देत भूमिगत पार्किंगचे काम बंद पाडले. आंबेडकरी अनुयायांची तीव्र भावना लक्षात घेऊन दीक्षाभूमी स्मारक समितीने तातडीने भूमिगत पार्किंग रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले. तसे लेखी पत्रही आंदोलकांना दिले, तसेच यासंदर्भात नोडल एजन्सी असलेल्या एनएमआरडीएला पत्रही लिहिले.

दीक्षाभूमीवर सौंदर्यीकरण व नवीनीकरणाच्या प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पासाठी २१४ कोटी रूपये शासनाने मंजूर केले आहेत. त्यातील पहिल्या टप्प्याचे काम सध्या सुरू करण्यात आले आहे. या पहिल्या टप्प्यात दीक्षाभूमीवरील भूमिगत पार्किंगचा समावेश आहे; परंतु या भूमिगत पार्किंगलाच आंबेडकरी अनुयायांचा विरोध होता. भूमिगत पार्किंगमुळे भविष्यात अनेक धोके निर्माण हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. भविष्यात स्मारक व बोधिवृक्षालाही धोका होण्याची शक्यताही समाजबांधवांकडून वर्तविली जात होती. यासंदर्भात दीक्षाभूमी स्मारक समितीच्या वतीने दोन बैठकी घेऊन समाजबांधवांची समजूत काढण्याचा प्रयत्नही करण्यात आला, तसेच भूमिगत पार्किंग रद्द करण्याबाबत अधिकाऱ्यांना पत्र लिहिण्यात येईल, असे आश्वासनही देण्यात आले होते; परंतु भूमिगत पार्किंग नकोच? ती रद्द करण्याचा निर्णय तातडीने घ्यावा, अशी आंबेडकरी समाजाची भूमिका होती.

यासंदर्भात सोमवारी पुन्हा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दलासह राज्यभरातील विविध आंबेडकरी संघटनांचे कार्यकर्ते व आंबेडकरी अनुयायी सोमवारी सकाळपासूनच दीक्षाभूमीवर धडकले. सकाळी १० वाजेपासून कार्यकर्ते यायला सुरुवात झाली. राज्यभरातून हजारो अनुयायी पोहोचले. त्यांनी सुरुवातीला घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यानंतर भूमिगत पार्किंगच्या कामाच्या ठिकाणी जाऊन काम बंद पाडले. त्याची तोडफोड करीत जाळपोळ केली. यावेळी पोलिसांनी सामंजस्यांची भूमिका घेत आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला.

आंदोलक आपल्या मागणीवर ठाम होते. जोपर्यंत समितीने पार्किंगबाबत निर्णय घेत नाही तोपर्यंत येथून हटणार नाही, अशी भूमिका घेत हजारो अनुयायांनी दीक्षाभूमीवर ठाण मांडले. आंबेडकरी अनुयायांची आक्रमक भूमिका पाहता दीक्षाभूमी स्मारक समितीने येथील भूमिगत पार्किंगचे काम आजपासूनच रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले; परंतु आंदोलकांनी याबाबतचे लेखी आश्वासन मागितले. त्यानंतर दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव डॉ. राजेंद्र गवई, माजी सचिव डॉ. सुधीर फुलझेले, विलास गजघाटे, डॉ. प्रदीप आगलावे, डी.जी. दाभाडे यांनी यासंदर्भात आंदोलकांना लेखी आश्वासनाचे पत्र दिले, तसेच सर्व आंदोलकांसमोर त्या पत्राचे जाहीर वाचन करण्यात आले. त्यानंतर आंदोलक शांत झाले.

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमीnagpurनागपूर