शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

संविधान व लोकशाही वाचविण्यासाठी आंबेडकरांनी सोबत यावे : विजय वडेट्टीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 20:12 IST

वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम आहे, असे आपण म्हणणार नाही. कारण तसा पुरावा आपल्याकडे नाही. परंतु सी, डी. ई असे काही तरी आहे. त्यांची सध्याची भूमिका ही भाजपच्या फायद्याची दिसत आहे. संविधान व लोकशाही वाचवण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेससोबत यावे, अशी पक्षाची आणि माझी इच्छा आहे. बैठक झाल्यास जागेसंदर्भात निश्चित काही ठरवता येईल, अशी भूमिका विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

ठळक मुद्देसध्याची भूमिका भाजपच्या फायद्याची

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम आहे, असे आपण म्हणणार नाही. कारण तसा पुरावा आपल्याकडे नाही. परंतु सी, डी. ई असे काही तरी आहे. त्यांची सध्याची भूमिका ही भाजपच्या फायद्याची दिसत आहे. संविधान व लोकशाही वाचवण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेससोबत यावे, अशी पक्षाची आणि माझी इच्छा आहे. बैठक झाल्यास जागेसंदर्भात निश्चित काही ठरवता येईल, अशी भूमिका विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.वंचित बहुजन आघाडीने कॉग्रेसला ४० जागा देण्याची भाषा केली आहे. यावर वडेट्टीवार यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला साडेसहा टक्के तर काँग्रेसला जवळपास १६ टक्के मते मिळाली. तेव्हा काँग्रेसला ४० जागा सोडता असे म्हणणे म्हणजे आघाडीबाबत ते गंभीर दिसत नाही. प्रकाश आंबेडकर यांचे निश्चित झाले असे वाटते. त्यांची ही भूमिका भाजपला फायदा पोहोचविणार आहे. आम्ही त्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी त्यांच्याशी बोलणी करू. संविधान आणि लोकशाही वाचविण्यासाठी त्यांनी एकत्र आले पाहिजे. भाजप द्वेष आणि भीतीचे राजकारण करीत असल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. लोकसभेतील पराभवाची जबाबदारी राहुल गांधी यांनी स्वीकारली. पण जबाबदारी ही सर्वांचीच आहे. आम्ही कमी पडलो. काँग्रेसलाच नव्हे तर एकूणच संविधान व लोकशाही वाचविण्यासाठी, देशात विरोधी पक्षाची जागा कायम राहण्यासाठी राहुल गांधी हे आवश्यक आहेत. त्यामुळे त्यांनी अध्यक्षपदी कायम राहावे, अशी आम्हा सर्वांची इच्छा असल्याचेही वडेट्टीवार म्हणाले. यावेळी माजी मंत्री राजेंद्र मुळक, शहर अध्यक्ष विकास ठाकरे, माजी आमदार एस.क्यू. जमा, अतुल लोंढे, उमाकांत अग्निहोत्री उपस्थित होते.साडेचार वर्षात विदर्भात एक टक्केही सिंचन नाहीहे सरकार केवळ बोलघेवडे आहे. गेल्या पाच वर्षात कुठलेही काम सरकारने केलेले नाही. इतर अधिवेशनाप्रमाणेच शेवटचेही अधिवेशन पार पडले. केवळ फसव्या घोषणा झाल्या. अधिवेशनात मंत्र्यांचे भ्रष्टाचार काढले, परंतु मुख्यमंत्र्यांनी सर्वांना क्लीन चिट देण्याचा सपाटा लावला. साडेचार वर्षात पदभरती केली नाही. राज्यात बेरोजगारी वाढली आहे. गेल्या साडेचार वर्षात विदर्भात एक टक्केही सिंचन झालेले नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.तिवर धरण प्रकरणी ३०२ चा गुन्हा दाखल करातिवर धरणाला तडे गेल्याची माहिती वर्षभरापूर्वीच स्थानिक नागरिकांनी दिली होती. मात्र त्यावर काहीच केले नाही. सत्ताधारी आमदाराकडे याचे कंत्राट होते. सरकारच्या दुर्लक्षतेमुळे नागरिकांचे बळी गेले. सरकार जबाबदार आहे. तिवर धरण प्रकरणी दोषींवर ३०२ चा गुन्हा दाखल करण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांमार्फत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येईल, असे ते म्हणाले. पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले. तरीही येथील एक पूल वाहून गेला. धरणाचेही स्ट्रक्चरल ऑडिट केले पाहिजे. या प्रकरणी अधिकाऱ्यांवर चिखलफेक करण्यात आली. मंत्र्यावर ती केली असता तर बरे वाटले असते, असा चिमटाही त्यांनी काढला.

 

 

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरMediaमाध्यमे