शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
3
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
4
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
5
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...
6
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
7
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
8
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
9
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
10
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
11
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
12
अंबानींना टक्कर देऊ शकतील का मस्क? स्टारलिंकच्या इंटरनेटच्या किंमतीवरूनच येईल अंदाज
13
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
14
प्राजक्ताच्या 'मदनमंजिरी'वर युरोपीयन्सचा डान्स, लावणीवर महिलांसह पुरुषांनीही धरला ठेका, अभिनेत्री म्हणाली...
15
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
16
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
17
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
18
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
20
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा

संविधान व लोकशाही वाचविण्यासाठी आंबेडकरांनी सोबत यावे : विजय वडेट्टीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 20:12 IST

वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम आहे, असे आपण म्हणणार नाही. कारण तसा पुरावा आपल्याकडे नाही. परंतु सी, डी. ई असे काही तरी आहे. त्यांची सध्याची भूमिका ही भाजपच्या फायद्याची दिसत आहे. संविधान व लोकशाही वाचवण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेससोबत यावे, अशी पक्षाची आणि माझी इच्छा आहे. बैठक झाल्यास जागेसंदर्भात निश्चित काही ठरवता येईल, अशी भूमिका विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

ठळक मुद्देसध्याची भूमिका भाजपच्या फायद्याची

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम आहे, असे आपण म्हणणार नाही. कारण तसा पुरावा आपल्याकडे नाही. परंतु सी, डी. ई असे काही तरी आहे. त्यांची सध्याची भूमिका ही भाजपच्या फायद्याची दिसत आहे. संविधान व लोकशाही वाचवण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेससोबत यावे, अशी पक्षाची आणि माझी इच्छा आहे. बैठक झाल्यास जागेसंदर्भात निश्चित काही ठरवता येईल, अशी भूमिका विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.वंचित बहुजन आघाडीने कॉग्रेसला ४० जागा देण्याची भाषा केली आहे. यावर वडेट्टीवार यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला साडेसहा टक्के तर काँग्रेसला जवळपास १६ टक्के मते मिळाली. तेव्हा काँग्रेसला ४० जागा सोडता असे म्हणणे म्हणजे आघाडीबाबत ते गंभीर दिसत नाही. प्रकाश आंबेडकर यांचे निश्चित झाले असे वाटते. त्यांची ही भूमिका भाजपला फायदा पोहोचविणार आहे. आम्ही त्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी त्यांच्याशी बोलणी करू. संविधान आणि लोकशाही वाचविण्यासाठी त्यांनी एकत्र आले पाहिजे. भाजप द्वेष आणि भीतीचे राजकारण करीत असल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. लोकसभेतील पराभवाची जबाबदारी राहुल गांधी यांनी स्वीकारली. पण जबाबदारी ही सर्वांचीच आहे. आम्ही कमी पडलो. काँग्रेसलाच नव्हे तर एकूणच संविधान व लोकशाही वाचविण्यासाठी, देशात विरोधी पक्षाची जागा कायम राहण्यासाठी राहुल गांधी हे आवश्यक आहेत. त्यामुळे त्यांनी अध्यक्षपदी कायम राहावे, अशी आम्हा सर्वांची इच्छा असल्याचेही वडेट्टीवार म्हणाले. यावेळी माजी मंत्री राजेंद्र मुळक, शहर अध्यक्ष विकास ठाकरे, माजी आमदार एस.क्यू. जमा, अतुल लोंढे, उमाकांत अग्निहोत्री उपस्थित होते.साडेचार वर्षात विदर्भात एक टक्केही सिंचन नाहीहे सरकार केवळ बोलघेवडे आहे. गेल्या पाच वर्षात कुठलेही काम सरकारने केलेले नाही. इतर अधिवेशनाप्रमाणेच शेवटचेही अधिवेशन पार पडले. केवळ फसव्या घोषणा झाल्या. अधिवेशनात मंत्र्यांचे भ्रष्टाचार काढले, परंतु मुख्यमंत्र्यांनी सर्वांना क्लीन चिट देण्याचा सपाटा लावला. साडेचार वर्षात पदभरती केली नाही. राज्यात बेरोजगारी वाढली आहे. गेल्या साडेचार वर्षात विदर्भात एक टक्केही सिंचन झालेले नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.तिवर धरण प्रकरणी ३०२ चा गुन्हा दाखल करातिवर धरणाला तडे गेल्याची माहिती वर्षभरापूर्वीच स्थानिक नागरिकांनी दिली होती. मात्र त्यावर काहीच केले नाही. सत्ताधारी आमदाराकडे याचे कंत्राट होते. सरकारच्या दुर्लक्षतेमुळे नागरिकांचे बळी गेले. सरकार जबाबदार आहे. तिवर धरण प्रकरणी दोषींवर ३०२ चा गुन्हा दाखल करण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांमार्फत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येईल, असे ते म्हणाले. पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले. तरीही येथील एक पूल वाहून गेला. धरणाचेही स्ट्रक्चरल ऑडिट केले पाहिजे. या प्रकरणी अधिकाऱ्यांवर चिखलफेक करण्यात आली. मंत्र्यावर ती केली असता तर बरे वाटले असते, असा चिमटाही त्यांनी काढला.

 

 

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरMediaमाध्यमे