शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३१ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
3
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
4
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
5
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
8
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
9
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
10
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
11
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
12
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
13
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
14
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
15
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
16
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
17
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
18
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
19
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
20
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'

‘आंबेडकर’ हेच बहुजन समाजाला पर्याय 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 20:25 IST

आज जातीयवादी शक्ती या देशातील लोकशाही नष्ट करू पाहत आहे. अनुसूचित जाती, जमाती, ओबीसीसह एकूणच बहुजन समाजाला मिळालेले संविधानिक हक्क हिरावून घेतले जात आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी बहुजन समाजासमोर आजच्या घडीला केवळ आणि केवळ अ‍ॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर हेच एकमेव पर्याय आहेत. तेव्हा आपसातले सारे मतभेद विसरून त्यांना शक्ती द्या, असे आवाहन भारिप बहुजन महासंघाच्या नेत्यांनी शनिवारी कार्यकर्ता मेळाव्यात केले.

ठळक मुद्देकार्यकर्ता मेळावा : भारिप बहुजन महासंघाच्या नेत्यांचा एकसूर

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आज जातीयवादी शक्ती या देशातील लोकशाही नष्ट करू पाहत आहे. अनुसूचित जाती, जमाती, ओबीसीसह एकूणच बहुजन समाजाला मिळालेले संविधानिक हक्क हिरावून घेतले जात आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी बहुजन समाजासमोर आजच्या घडीला केवळ आणि केवळ अ‍ॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर हेच एकमेव पर्याय आहेत. तेव्हा आपसातले सारे मतभेद विसरून त्यांना शक्ती द्या, असे आवाहन भारिप बहुजन महासंघाच्या नेत्यांनी शनिवारी कार्यकर्ता मेळाव्यात केले.भारिप बहुजन महासंघ नागपूर शहर व जिल्हा यांच्यावतीने उंटखाना येथील अजंटा सभागृहात कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी पक्षाचे महासचिव अमित भुईगळ होते तर पक्षाचे सल्लागार माजी आमदार हरिभाऊ भदे, कुशल मेश्राम, युसुफ पुंजानी, डॉ. सुरेश रोकडे प्रमुख मार्गदर्शक होते. व्यासपीठावर अ‍ॅड. संदीप नंदेश्वर, शहराध्यक्ष विनोद गजभिये, वनमाला उके, मनिषा लोखंडे, राजू मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी पक्षातील अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा व नेत्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी मोठ्या संख्येने इतर पक्षातील व सामाजिक संघटनांमध्ये काम करणाऱ्यांनी पक्षात प्रवेश घेतला. त्यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.अमित भुईगळ आपल्या अध्यक्षीय भाषणात, बहुजन समाजाचे एकमेव नेतृत्व म्हणजे प्रकाश आंबेडकर असल्याचे स्पष्ट केले. आंबेडकरी समाजासह एकूणच बहुजन समाजावर जेव्हा-जेव्हा अन्याय अत्याचार झाला, तेव्हा-तेव्हा प्रकाश आंबेडकर धावून आले. रस्त्यावर उतरले. तेव्हा त्यांना साथ द्या. येणाºया निवडणुकीमध्ये सर्व समाजाने आपापले मतभेद विसरून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. यापुढे महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर यांना विश्वासात घेतल्याशिवाय कुणाचेही सरकार बनणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. उपस्थित इतर वक्त्यांनी सुद्धा आपल्या भाषणात समाजाने प्रकाश आंबेडकरांमागे एक शक्ती म्हणून उभे राहावे, असे आवाहन केले.प्रास्ताविक सेवक डांगे यांनी केले. संचालन अजय सहारे यांनी केले.नागपुरातही राबवा अकोला पॅटर्नपक्षाचे सल्लागार आणि माजी आमदार हरिभाऊ भदे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत प्रकाश आंबेडकरांनी अकोला जिल्ह्यात राबवलेला निवडणूक पॅटर्न समजावून सांगितला. यानुसार बहुजन समजाला सत्ता प्राप्त करता येणे शक्य आहे, तेव्हा नागपुरातील कार्यकर्त्यांनी सुद्धा येथे ‘अकोला पॅटर्न’ राबवावा, असे आवाहन केले.

टॅग्स :nagpurनागपूर