शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादीचे देशव्यापी पुनरावलोकन का गरजेचे? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
3
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
5
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
6
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
7
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
8
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
9
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
10
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
11
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
12
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
13
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
14
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
15
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...
16
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
17
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
18
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
19
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
20
ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर

मी खलनायक आहे काय? श्रीपाद जोशी यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 22:09 IST

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी माध्यमांशी संवाद साधला. केवळ लिहिलेला मसुदा हा अध्यक्षांचा निर्णय आहे, अशी प्रतिमा निर्माण करून मला खलनायक, दहशतवादी ठरविल्या गेल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. मी खलनायक आहे का, असा भावनिक सवाल त्यांनी केला. हे कारस्थान कुणी रचले गेले, याचा शोध घेणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्यामागे ज्यांची चूक आहे ते जबाबदारी स्वीकारायला तयार नाहीत. त्यामुळे महामंडळाचा अध्यक्ष या नात्याने नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देसंमेलनावर बहिष्कार न घालण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी माध्यमांशी संवाद साधला. केवळ लिहिलेला मसुदा हा अध्यक्षांचा निर्णय आहे, अशी प्रतिमा निर्माण करून मला खलनायक, दहशतवादी ठरविल्या गेल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. मी खलनायक आहे का, असा भावनिक सवाल त्यांनी केला. हे कारस्थान कुणी रचले गेले, याचा शोध घेणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्यामागे ज्यांची चूक आहे ते जबाबदारी स्वीकारायला तयार नाहीत. त्यामुळे महामंडळाचा अध्यक्ष या नात्याने नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले.आयोजकांच्या अडचणी लक्षात घेत यवतमाळचे साहित्य संमेलन निर्विघ्नपणे पार पडावे यासाठी माझा प्रयत्न होता. मात्र मसुदा लिहून दिला आणि मीच खलनायक ठरलो. महामंडळ हे पळपुट्यांचा अड्डा आहे असे कथानक रंगवल्या गेल्याचा आरोप त्यांनी केला. मराठी भाषा, संस्कृतीची इतकी अवहेलना होत आहे हे दु:खदायक व क्लेशदायक आहे म्हणून राजीनामा दिल्याचे जोशी यावेळी बोलले. राज ठाकरेंच्या कार्यकर्त्याने धमकी दिली आणि हे नाहक नाट्य निर्माण केले. मात्र राज ठाकरे यांनी दिलगिरी व्यक्त केली ही मोठी बाब असल्याचे सांगत राजीनामा देण्यामागे त्यांचीही प्रेरणा असल्याचे ते म्हणाले. मी डाव्या किंवा उजव्या कुठलाही विचारसरणीचा नाही. नयनतारा सहगल या उच्च कोटीच्या लेखिका आहेत. त्यांच्याबद्दल गैरसमज करून वाद उभा करण्यात आल्याची टीका त्यांनी केली. त्यामुळे संमेलनावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेणाऱ्या साहित्यिक मित्रांची भूमिका योग्य आहे आणि मी पदावर नसतो तर मी सुद्धा त्यांच्या सोबत असतो. असे असले तरी संमेलनावर बहिष्कार घालू नका, असे आवाहनही त्यांनी केले. नयनतारा यांना भेटणारसंमेलनात सहभागी होणार की नाही, यावर सरळ उत्तर देणे त्यांनी टाळले. एक सामान्य प्रतिनिधी म्हणून सहभागी होईल, असे ते म्हणाले. दरम्यान या सगळ्या वादविवादामुळे प्रज्ञावंत लेखिका नयनतारा सहगल यांच्या भावना दुखावल्या असतील तसेच त्यांच्या न येण्याने जे दुखावले असतील त्यांच्याबाबत दिलगिरी व्यक्त केली. आयोजकांनी सौजन्य दाखविले नसले तरी मी डेहरादूनला जाऊन सहगल यांची माफी मागणार असल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनYavatmalयवतमाळ