शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

मी खलनायक आहे काय? श्रीपाद जोशी यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 22:09 IST

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी माध्यमांशी संवाद साधला. केवळ लिहिलेला मसुदा हा अध्यक्षांचा निर्णय आहे, अशी प्रतिमा निर्माण करून मला खलनायक, दहशतवादी ठरविल्या गेल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. मी खलनायक आहे का, असा भावनिक सवाल त्यांनी केला. हे कारस्थान कुणी रचले गेले, याचा शोध घेणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्यामागे ज्यांची चूक आहे ते जबाबदारी स्वीकारायला तयार नाहीत. त्यामुळे महामंडळाचा अध्यक्ष या नात्याने नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देसंमेलनावर बहिष्कार न घालण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी माध्यमांशी संवाद साधला. केवळ लिहिलेला मसुदा हा अध्यक्षांचा निर्णय आहे, अशी प्रतिमा निर्माण करून मला खलनायक, दहशतवादी ठरविल्या गेल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. मी खलनायक आहे का, असा भावनिक सवाल त्यांनी केला. हे कारस्थान कुणी रचले गेले, याचा शोध घेणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्यामागे ज्यांची चूक आहे ते जबाबदारी स्वीकारायला तयार नाहीत. त्यामुळे महामंडळाचा अध्यक्ष या नात्याने नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले.आयोजकांच्या अडचणी लक्षात घेत यवतमाळचे साहित्य संमेलन निर्विघ्नपणे पार पडावे यासाठी माझा प्रयत्न होता. मात्र मसुदा लिहून दिला आणि मीच खलनायक ठरलो. महामंडळ हे पळपुट्यांचा अड्डा आहे असे कथानक रंगवल्या गेल्याचा आरोप त्यांनी केला. मराठी भाषा, संस्कृतीची इतकी अवहेलना होत आहे हे दु:खदायक व क्लेशदायक आहे म्हणून राजीनामा दिल्याचे जोशी यावेळी बोलले. राज ठाकरेंच्या कार्यकर्त्याने धमकी दिली आणि हे नाहक नाट्य निर्माण केले. मात्र राज ठाकरे यांनी दिलगिरी व्यक्त केली ही मोठी बाब असल्याचे सांगत राजीनामा देण्यामागे त्यांचीही प्रेरणा असल्याचे ते म्हणाले. मी डाव्या किंवा उजव्या कुठलाही विचारसरणीचा नाही. नयनतारा सहगल या उच्च कोटीच्या लेखिका आहेत. त्यांच्याबद्दल गैरसमज करून वाद उभा करण्यात आल्याची टीका त्यांनी केली. त्यामुळे संमेलनावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेणाऱ्या साहित्यिक मित्रांची भूमिका योग्य आहे आणि मी पदावर नसतो तर मी सुद्धा त्यांच्या सोबत असतो. असे असले तरी संमेलनावर बहिष्कार घालू नका, असे आवाहनही त्यांनी केले. नयनतारा यांना भेटणारसंमेलनात सहभागी होणार की नाही, यावर सरळ उत्तर देणे त्यांनी टाळले. एक सामान्य प्रतिनिधी म्हणून सहभागी होईल, असे ते म्हणाले. दरम्यान या सगळ्या वादविवादामुळे प्रज्ञावंत लेखिका नयनतारा सहगल यांच्या भावना दुखावल्या असतील तसेच त्यांच्या न येण्याने जे दुखावले असतील त्यांच्याबाबत दिलगिरी व्यक्त केली. आयोजकांनी सौजन्य दाखविले नसले तरी मी डेहरादूनला जाऊन सहगल यांची माफी मागणार असल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनYavatmalयवतमाळ