शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

मी खलनायक आहे काय? श्रीपाद जोशी यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 22:09 IST

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी माध्यमांशी संवाद साधला. केवळ लिहिलेला मसुदा हा अध्यक्षांचा निर्णय आहे, अशी प्रतिमा निर्माण करून मला खलनायक, दहशतवादी ठरविल्या गेल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. मी खलनायक आहे का, असा भावनिक सवाल त्यांनी केला. हे कारस्थान कुणी रचले गेले, याचा शोध घेणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्यामागे ज्यांची चूक आहे ते जबाबदारी स्वीकारायला तयार नाहीत. त्यामुळे महामंडळाचा अध्यक्ष या नात्याने नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देसंमेलनावर बहिष्कार न घालण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी माध्यमांशी संवाद साधला. केवळ लिहिलेला मसुदा हा अध्यक्षांचा निर्णय आहे, अशी प्रतिमा निर्माण करून मला खलनायक, दहशतवादी ठरविल्या गेल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. मी खलनायक आहे का, असा भावनिक सवाल त्यांनी केला. हे कारस्थान कुणी रचले गेले, याचा शोध घेणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्यामागे ज्यांची चूक आहे ते जबाबदारी स्वीकारायला तयार नाहीत. त्यामुळे महामंडळाचा अध्यक्ष या नात्याने नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले.आयोजकांच्या अडचणी लक्षात घेत यवतमाळचे साहित्य संमेलन निर्विघ्नपणे पार पडावे यासाठी माझा प्रयत्न होता. मात्र मसुदा लिहून दिला आणि मीच खलनायक ठरलो. महामंडळ हे पळपुट्यांचा अड्डा आहे असे कथानक रंगवल्या गेल्याचा आरोप त्यांनी केला. मराठी भाषा, संस्कृतीची इतकी अवहेलना होत आहे हे दु:खदायक व क्लेशदायक आहे म्हणून राजीनामा दिल्याचे जोशी यावेळी बोलले. राज ठाकरेंच्या कार्यकर्त्याने धमकी दिली आणि हे नाहक नाट्य निर्माण केले. मात्र राज ठाकरे यांनी दिलगिरी व्यक्त केली ही मोठी बाब असल्याचे सांगत राजीनामा देण्यामागे त्यांचीही प्रेरणा असल्याचे ते म्हणाले. मी डाव्या किंवा उजव्या कुठलाही विचारसरणीचा नाही. नयनतारा सहगल या उच्च कोटीच्या लेखिका आहेत. त्यांच्याबद्दल गैरसमज करून वाद उभा करण्यात आल्याची टीका त्यांनी केली. त्यामुळे संमेलनावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेणाऱ्या साहित्यिक मित्रांची भूमिका योग्य आहे आणि मी पदावर नसतो तर मी सुद्धा त्यांच्या सोबत असतो. असे असले तरी संमेलनावर बहिष्कार घालू नका, असे आवाहनही त्यांनी केले. नयनतारा यांना भेटणारसंमेलनात सहभागी होणार की नाही, यावर सरळ उत्तर देणे त्यांनी टाळले. एक सामान्य प्रतिनिधी म्हणून सहभागी होईल, असे ते म्हणाले. दरम्यान या सगळ्या वादविवादामुळे प्रज्ञावंत लेखिका नयनतारा सहगल यांच्या भावना दुखावल्या असतील तसेच त्यांच्या न येण्याने जे दुखावले असतील त्यांच्याबाबत दिलगिरी व्यक्त केली. आयोजकांनी सौजन्य दाखविले नसले तरी मी डेहरादूनला जाऊन सहगल यांची माफी मागणार असल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनYavatmalयवतमाळ