शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

आधीच पारा ४६ पार त्यात विजेच्या लपंडावाने नागपूरकरांना फोडला घाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 10:40 IST

नवतपाच्या भीषण गरमीने त्रस्त नागपूरकर बुधवारी विजेच्या लपंडावामुळे त्रस्त झाले. सकाळी साप्ताहिक देखरेखीमुळे विजेचा पुरवठा अनेक तास बंद होता तर दुपारी तांत्रिक त्रुटींमुळे बे्रकडाऊनचा क्रम सुरू राहिला.

ठळक मुद्दे देखरेखीकरिता सकाळी पुरवठा बंददुपारी बे्रकडाऊन, नागरिक बेहाल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नवतपाच्या भीषण गरमीने त्रस्त नागपूरकर बुधवारी विजेच्या लपंडावामुळे त्रस्त झाले. सकाळी साप्ताहिक देखरेखीमुळे विजेचा पुरवठा अनेक तास बंद होता तर दुपारी तांत्रिक त्रुटींमुळे बे्रकडाऊनचा क्रम सुरू राहिला. महापारेषणचे बेसा सबस्टेशन ठप्प झाले होते. त्यामुळे शहरातील मोठ्या भागात अनेक तास वीज पुरवठा बंद होता. तर काही भागात विजेचा पुरवठा बंद आणि सुरू राहण्याचा क्रम सुरू होता. वीज नसल्यामुळे कूलर, एसी, पंखे बंद होते. त्यामुळे नागरिक त्रस्त होते.सकाळी ११ पर्यंत दक्षिण-पश्चिम, पश्चिम व दक्षिण नागपुरातील मोठ्या भागात मान्सूनपूर्व तयारी आणि देखभाल, दुरुस्तीच्या नावावर वीज पुरवठा बंद करण्यात आला होता. तर सकाळी ९.२८ वाजता सीताबर्डीहून निघणारे अजमेरा फीडर ठप्प झाले. केबल तुटल्यामुळे दोन ट्रान्सफॉमरहून होणारा पुरवठा प्रभावित झाला. दुपारी १२.५६ वाजता छत्रपती स्टेशनच्या भागातील वीज पुरवठा तांत्रिक त्रुटींमुळे बंद झाला. सीताबर्डी सबस्टेशनशी जुळलेल्या भागात सकाळी ८.५२ वाजता ब्रेकडाऊनमुळे पुरवठा खंडित झाला. हॅम्पयार्ड रोड फीडरवरून (काँग्रेसनगर, छोटी धंतोली) वीज पुरवठा बंद होता. यादरम्यान महापारेषणच्या बेसा येथील १३२/३३ क्षमतेचे सबस्टेशन दुपारी ठप्प होते.महापारेषणच्या सूत्रांनी सांगितले की, केबल जळल्यामुळे ही समस्या उद्भवली. पण काही मिनिटातच सर्व सुरळीत करण्यात झाले. सबस्टेशन ठप्प झाल्यामुळे महावितरणसह एसएनडीएलच्या भागातही वीज पुरवठा बंद होता. एकूण १४ फीडर बंद राहिल्यामुळे कळमना, कामठी रोड, नंदनवन, मेडिकल, छत्रपती चौक परिसर अंधारात होता. यादरम्यान दुपारी ३.५५ वाजता ३३ केव्ही छत्रपतीनगर सबस्टेशनला पारडी सबस्टेशनवरून वीज पुरवठा करणारी लाईन ‘ट्रिप’ झाली. त्यामुळे नंदनवन ते छत्रपती चौकापर्यंतचा भागात वीज नव्हती. भार चिंचभुवन सबस्टेशनवर शिफ्ट करण्याच्या प्रयत्नात ही लाईन ट्रिप झाली. पण हे संकट पुन्हा वाढले. विजेची मागणी जास्त असल्यामुळे हे पुन्हा ट्रिप झाले. दिवसभर विजेमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना महावितरण अथवा एसएनडीएलचे अधिकारी संतोषजनक उत्तर देऊ शकले नाहीत. वीज थोड्याच वेळात येत असल्याचे उत्तर त्यांच्याकडून वारंवार मिळाले. अनेक कार्यालयांमध्ये ग्राहकांचे फोन उचलले नाही. त्यामुळे लोकांमध्ये रोष होता. छत्रपती सब स्टेशनवर सायंकाळी नागरिक जमा झाले होते.खोदकामामुळे केबल तुटलेबुधवारी अनेक ठिकाणी बे्रकडाऊनचे मुख्य कारण विविध एजन्सींद्वारे करण्यात येणाऱ्या विकास कामांसाठी करण्यात येणारे खोदकाम ठरले. सीताबर्डी सबस्टेशनचे अजमेरा फीडर मनपाच्या स्वच्छता अभियानामुळे तुटले. या प्रकारे दुपारी छत्रपती सबस्टेशनचे केबलसुद्धा विकास कामांमुळे क्षतिग्रस्त झाले. तर नंदनवन भागातील मंगलमूर्ती लॉनचे केबल मनपा एजन्सीच्या खोदकामामुळे तुटले.३.५ लाख ग्राहक प्रभावितदिवसभर होणाऱ्या ब्रेकडाऊनमुळे शहराच्या अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे भीषण गरमीत ग्राहकांना त्रास सहन करावा लागला. एसएनडीएलच्या ३.२५ लाखांसह एकूण ३.५ लाख ग्राहकांना फटका बसला. अनेक घरातील पाण्याचे पंप बंद राहिल्यामुळे पाण्याचे संकट निर्माण झाले. अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे शांतिनगर, बिनाकी, कळमना, वर्धमाननगर, वाठोडा, महाल, रामबाग, जयदुर्गा, नरेंद्रनगर, मानेवाडा, मनीषनगर, नंदनवन, मेडिकल, भगवाननगर, छत्रपती चौक, सीताबर्डी, धरमपेठ, सोमलवाडा, राजीवनगर, तपोवन ले-आऊट, खामला, स्नेहनगर, रहाटे कॉलनी, धंतोली, वैनगंगा कॉलनी, काँग्रेसनगर, बेसा, पारडी, खरे टाऊन, अलंकार टॉकीज, दुर्गा मंदिर परिसर, अत्रे ले-आऊट भाग प्रभावित झाला. अनेक भागात एक तास तर काही भागात जास्त काळ वीज पुरवठा बंद होता.

टॅग्स :electricityवीज