शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सफाईसाेबत नागपुरातील तलावांची परिसंस्था सुधारणे अधिक गरजेचे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 08:35 IST

Nagpur News आपल्या नैसर्गिक स्त्राेतांचे संवर्धन करणे काळाची गरज आहे, ही बाब महामारीमुळे लक्षात आली आहे. आपले तलावही त्याचाच भाग आहेत. मात्र तलावांची केवळ स्वच्छता करणे हा केवळ पहिला टप्पा आहे, त्यांच्या संवर्धनासाठी पावले उचलणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देकृत्रित ऑक्सिजन पुरवठा व खाेली वाढविण्याचीही आवश्यकता

मेहा शर्मा

 लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : पाेलीस लाईनच्या तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महापालिकेला ५० लाखांची मदत केली आहे. पर्यावरणाच्या दृष्टिने ही ‘गुड न्यूज’च म्हणावी लागेल. आपल्या नैसर्गिक स्त्राेतांचे संवर्धन करणे काळाची गरज आहे, ही बाब महामारीमुळे लक्षात आली आहे. आपले तलावही त्याचाच भाग आहेत. मात्र तलावांची केवळ स्वच्छता करणे हा केवळ पहिला टप्पा आहे, त्यांच्या संवर्धनासाठी पावले उचलणे गरजेचे आहे.

तज्ज्ञांच्या मते वरवर तलाव स्वच्छ करणे हे अल्प काळाचे नियाेजन आहे. तलावांचे खाेलीकरण करणे गरजेचे असून त्यामुळे पाणी साठवणूक क्षमता वाढण्यास मदत हाेईल. ग्रीन व्हिजीलचे संस्थापक व पर्यावरणवादी काैस्तुभ चटर्जी यांच्या मते तलावातील तण मुळासकट काढणे गरजेचे आहे. त्यांना मुळापासून उपटून फेकल्यास त्यांची पुन्हा वाढ हाेणार नाही. वरवर तन काढण्याचा प्रयत्न केला तर पहिल्याच पावसात त्याची तेवढच्याच झपाट्याने वाढ हाेते. ही समस्या साेडविण्यासाठी तलावाचे पाणी पूर्ण खाली करून त्यातील तण पूर्णपणे काढणे महत्त्वाचे आहे. यामुळे तलावाचा तळभाग क्लियर हाेईल. पुनरुज्जीवनाच्या दीर्घकालीन परिणामासाठी दुसरा टप्पा म्हणजे तलावाचे खाेलीकरण करणे. साेनेगाव आणि सक्करदरा तलाव मार्च महिन्यात नैसर्गिकरित्या सुकलेले असतात. त्यावेळी त्यांचे खाेलीकरण करण्याची चांगली संधी महापालिका किंवा इतर यंत्रणेकडे असते.

पाेलीस लाईन तलावाबाबत बाेलताना, या तलावाचे काम सुरू असल्याने त्याची खाेली वाढविणे सहज साेपे हाेणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पाणी साठवण क्षमता वाढेल. सक्करदरा व साेनेगाव तलावाची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता कमी झाली असल्याने त्यांचे पूर्णपणे खाेदकाम हाेणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. तिसरा महत्त्वपूर्ण टप्पा म्हणजे तलावातील परिसंस्थेच्या संरक्षणासाठी कृत्रिम ऑक्सिजनचा पुरवठा करणे. तलावांना नेहमी कृत्रिम ऑक्सिजन पुरवठ्याची गरज असते. वातावरणातील हवा तलावाच्या वरच्या स्तरावर पाेहचते पण खाेलीपर्यंत पाेहचत नाही. तलावातील जलपर्णी वनस्पती व तन असलेले ऑक्सिजन शाेषून घेतात. त्यामुळे सहाजिकच तलावाचे ऑक्सिजन कमी हाेते. कृत्रिम ऑक्सिजन पुरविण्यासाठी तलावामध्ये फाउंटेन लावणे गरजेचे आहे. त्यामुळे तलावाचे तळाचे पाणी फव्वाऱ्यांद्वारे वर येईल व त्याचे थेंब वातावरणातील ऑक्सिजन शाेषून घेतील. तलावांसाठी ६ मिलिग्रॅम/लिटर ऑक्सिजनची गरज असते. मात्र नागपुरातील बहुतेक तलावांमध्ये हे प्रमाण ४.५ ते ५ मिलिग्रॅम/लिटर एवढे आहे. तणाच्या वाढीमुळे ते आणखी खाली येत असल्याचे चटर्जी यांनी सांगितले.

महापालिकेच्या मंगळवारी झाेनचे अभियंता केशव साेनाेने यांनी पाेलीस लाईन तलावासाठी केलेल्या याेजनेबाबत माहिती दिली. या तलावासाठी यापूर्वी काहीच झाले नाही. त्यामुळे पहिल्या टप्प्यात त्याच्या स्वच्छतेवर भर देण्यात आला आहे. त्यानंतर त्याचे खाेलीकरण आणि फाउंटेन लावण्याचाही प्रस्ताव तयार केला जाणार असल्याचे साेनाेने यांनी स्पष्ट केले. पहिल्या टप्प्यातील काम महिनाभरात पूर्ण हाेण्याची माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :Waterपाणी