शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

सफाईसाेबत नागपुरातील तलावांची परिसंस्था सुधारणे अधिक गरजेचे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 08:35 IST

Nagpur News आपल्या नैसर्गिक स्त्राेतांचे संवर्धन करणे काळाची गरज आहे, ही बाब महामारीमुळे लक्षात आली आहे. आपले तलावही त्याचाच भाग आहेत. मात्र तलावांची केवळ स्वच्छता करणे हा केवळ पहिला टप्पा आहे, त्यांच्या संवर्धनासाठी पावले उचलणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देकृत्रित ऑक्सिजन पुरवठा व खाेली वाढविण्याचीही आवश्यकता

मेहा शर्मा

 लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : पाेलीस लाईनच्या तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महापालिकेला ५० लाखांची मदत केली आहे. पर्यावरणाच्या दृष्टिने ही ‘गुड न्यूज’च म्हणावी लागेल. आपल्या नैसर्गिक स्त्राेतांचे संवर्धन करणे काळाची गरज आहे, ही बाब महामारीमुळे लक्षात आली आहे. आपले तलावही त्याचाच भाग आहेत. मात्र तलावांची केवळ स्वच्छता करणे हा केवळ पहिला टप्पा आहे, त्यांच्या संवर्धनासाठी पावले उचलणे गरजेचे आहे.

तज्ज्ञांच्या मते वरवर तलाव स्वच्छ करणे हे अल्प काळाचे नियाेजन आहे. तलावांचे खाेलीकरण करणे गरजेचे असून त्यामुळे पाणी साठवणूक क्षमता वाढण्यास मदत हाेईल. ग्रीन व्हिजीलचे संस्थापक व पर्यावरणवादी काैस्तुभ चटर्जी यांच्या मते तलावातील तण मुळासकट काढणे गरजेचे आहे. त्यांना मुळापासून उपटून फेकल्यास त्यांची पुन्हा वाढ हाेणार नाही. वरवर तन काढण्याचा प्रयत्न केला तर पहिल्याच पावसात त्याची तेवढच्याच झपाट्याने वाढ हाेते. ही समस्या साेडविण्यासाठी तलावाचे पाणी पूर्ण खाली करून त्यातील तण पूर्णपणे काढणे महत्त्वाचे आहे. यामुळे तलावाचा तळभाग क्लियर हाेईल. पुनरुज्जीवनाच्या दीर्घकालीन परिणामासाठी दुसरा टप्पा म्हणजे तलावाचे खाेलीकरण करणे. साेनेगाव आणि सक्करदरा तलाव मार्च महिन्यात नैसर्गिकरित्या सुकलेले असतात. त्यावेळी त्यांचे खाेलीकरण करण्याची चांगली संधी महापालिका किंवा इतर यंत्रणेकडे असते.

पाेलीस लाईन तलावाबाबत बाेलताना, या तलावाचे काम सुरू असल्याने त्याची खाेली वाढविणे सहज साेपे हाेणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पाणी साठवण क्षमता वाढेल. सक्करदरा व साेनेगाव तलावाची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता कमी झाली असल्याने त्यांचे पूर्णपणे खाेदकाम हाेणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. तिसरा महत्त्वपूर्ण टप्पा म्हणजे तलावातील परिसंस्थेच्या संरक्षणासाठी कृत्रिम ऑक्सिजनचा पुरवठा करणे. तलावांना नेहमी कृत्रिम ऑक्सिजन पुरवठ्याची गरज असते. वातावरणातील हवा तलावाच्या वरच्या स्तरावर पाेहचते पण खाेलीपर्यंत पाेहचत नाही. तलावातील जलपर्णी वनस्पती व तन असलेले ऑक्सिजन शाेषून घेतात. त्यामुळे सहाजिकच तलावाचे ऑक्सिजन कमी हाेते. कृत्रिम ऑक्सिजन पुरविण्यासाठी तलावामध्ये फाउंटेन लावणे गरजेचे आहे. त्यामुळे तलावाचे तळाचे पाणी फव्वाऱ्यांद्वारे वर येईल व त्याचे थेंब वातावरणातील ऑक्सिजन शाेषून घेतील. तलावांसाठी ६ मिलिग्रॅम/लिटर ऑक्सिजनची गरज असते. मात्र नागपुरातील बहुतेक तलावांमध्ये हे प्रमाण ४.५ ते ५ मिलिग्रॅम/लिटर एवढे आहे. तणाच्या वाढीमुळे ते आणखी खाली येत असल्याचे चटर्जी यांनी सांगितले.

महापालिकेच्या मंगळवारी झाेनचे अभियंता केशव साेनाेने यांनी पाेलीस लाईन तलावासाठी केलेल्या याेजनेबाबत माहिती दिली. या तलावासाठी यापूर्वी काहीच झाले नाही. त्यामुळे पहिल्या टप्प्यात त्याच्या स्वच्छतेवर भर देण्यात आला आहे. त्यानंतर त्याचे खाेलीकरण आणि फाउंटेन लावण्याचाही प्रस्ताव तयार केला जाणार असल्याचे साेनाेने यांनी स्पष्ट केले. पहिल्या टप्प्यातील काम महिनाभरात पूर्ण हाेण्याची माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :Waterपाणी