शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

सफाईसाेबत नागपुरातील तलावांची परिसंस्था सुधारणे अधिक गरजेचे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 08:35 IST

Nagpur News आपल्या नैसर्गिक स्त्राेतांचे संवर्धन करणे काळाची गरज आहे, ही बाब महामारीमुळे लक्षात आली आहे. आपले तलावही त्याचाच भाग आहेत. मात्र तलावांची केवळ स्वच्छता करणे हा केवळ पहिला टप्पा आहे, त्यांच्या संवर्धनासाठी पावले उचलणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देकृत्रित ऑक्सिजन पुरवठा व खाेली वाढविण्याचीही आवश्यकता

मेहा शर्मा

 लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : पाेलीस लाईनच्या तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महापालिकेला ५० लाखांची मदत केली आहे. पर्यावरणाच्या दृष्टिने ही ‘गुड न्यूज’च म्हणावी लागेल. आपल्या नैसर्गिक स्त्राेतांचे संवर्धन करणे काळाची गरज आहे, ही बाब महामारीमुळे लक्षात आली आहे. आपले तलावही त्याचाच भाग आहेत. मात्र तलावांची केवळ स्वच्छता करणे हा केवळ पहिला टप्पा आहे, त्यांच्या संवर्धनासाठी पावले उचलणे गरजेचे आहे.

तज्ज्ञांच्या मते वरवर तलाव स्वच्छ करणे हे अल्प काळाचे नियाेजन आहे. तलावांचे खाेलीकरण करणे गरजेचे असून त्यामुळे पाणी साठवणूक क्षमता वाढण्यास मदत हाेईल. ग्रीन व्हिजीलचे संस्थापक व पर्यावरणवादी काैस्तुभ चटर्जी यांच्या मते तलावातील तण मुळासकट काढणे गरजेचे आहे. त्यांना मुळापासून उपटून फेकल्यास त्यांची पुन्हा वाढ हाेणार नाही. वरवर तन काढण्याचा प्रयत्न केला तर पहिल्याच पावसात त्याची तेवढच्याच झपाट्याने वाढ हाेते. ही समस्या साेडविण्यासाठी तलावाचे पाणी पूर्ण खाली करून त्यातील तण पूर्णपणे काढणे महत्त्वाचे आहे. यामुळे तलावाचा तळभाग क्लियर हाेईल. पुनरुज्जीवनाच्या दीर्घकालीन परिणामासाठी दुसरा टप्पा म्हणजे तलावाचे खाेलीकरण करणे. साेनेगाव आणि सक्करदरा तलाव मार्च महिन्यात नैसर्गिकरित्या सुकलेले असतात. त्यावेळी त्यांचे खाेलीकरण करण्याची चांगली संधी महापालिका किंवा इतर यंत्रणेकडे असते.

पाेलीस लाईन तलावाबाबत बाेलताना, या तलावाचे काम सुरू असल्याने त्याची खाेली वाढविणे सहज साेपे हाेणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पाणी साठवण क्षमता वाढेल. सक्करदरा व साेनेगाव तलावाची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता कमी झाली असल्याने त्यांचे पूर्णपणे खाेदकाम हाेणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. तिसरा महत्त्वपूर्ण टप्पा म्हणजे तलावातील परिसंस्थेच्या संरक्षणासाठी कृत्रिम ऑक्सिजनचा पुरवठा करणे. तलावांना नेहमी कृत्रिम ऑक्सिजन पुरवठ्याची गरज असते. वातावरणातील हवा तलावाच्या वरच्या स्तरावर पाेहचते पण खाेलीपर्यंत पाेहचत नाही. तलावातील जलपर्णी वनस्पती व तन असलेले ऑक्सिजन शाेषून घेतात. त्यामुळे सहाजिकच तलावाचे ऑक्सिजन कमी हाेते. कृत्रिम ऑक्सिजन पुरविण्यासाठी तलावामध्ये फाउंटेन लावणे गरजेचे आहे. त्यामुळे तलावाचे तळाचे पाणी फव्वाऱ्यांद्वारे वर येईल व त्याचे थेंब वातावरणातील ऑक्सिजन शाेषून घेतील. तलावांसाठी ६ मिलिग्रॅम/लिटर ऑक्सिजनची गरज असते. मात्र नागपुरातील बहुतेक तलावांमध्ये हे प्रमाण ४.५ ते ५ मिलिग्रॅम/लिटर एवढे आहे. तणाच्या वाढीमुळे ते आणखी खाली येत असल्याचे चटर्जी यांनी सांगितले.

महापालिकेच्या मंगळवारी झाेनचे अभियंता केशव साेनाेने यांनी पाेलीस लाईन तलावासाठी केलेल्या याेजनेबाबत माहिती दिली. या तलावासाठी यापूर्वी काहीच झाले नाही. त्यामुळे पहिल्या टप्प्यात त्याच्या स्वच्छतेवर भर देण्यात आला आहे. त्यानंतर त्याचे खाेलीकरण आणि फाउंटेन लावण्याचाही प्रस्ताव तयार केला जाणार असल्याचे साेनाेने यांनी स्पष्ट केले. पहिल्या टप्प्यातील काम महिनाभरात पूर्ण हाेण्याची माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :Waterपाणी