शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

सफाईसाेबत नागपुरातील तलावांची परिसंस्था सुधारणे अधिक गरजेचे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 08:35 IST

Nagpur News आपल्या नैसर्गिक स्त्राेतांचे संवर्धन करणे काळाची गरज आहे, ही बाब महामारीमुळे लक्षात आली आहे. आपले तलावही त्याचाच भाग आहेत. मात्र तलावांची केवळ स्वच्छता करणे हा केवळ पहिला टप्पा आहे, त्यांच्या संवर्धनासाठी पावले उचलणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देकृत्रित ऑक्सिजन पुरवठा व खाेली वाढविण्याचीही आवश्यकता

मेहा शर्मा

 लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : पाेलीस लाईनच्या तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महापालिकेला ५० लाखांची मदत केली आहे. पर्यावरणाच्या दृष्टिने ही ‘गुड न्यूज’च म्हणावी लागेल. आपल्या नैसर्गिक स्त्राेतांचे संवर्धन करणे काळाची गरज आहे, ही बाब महामारीमुळे लक्षात आली आहे. आपले तलावही त्याचाच भाग आहेत. मात्र तलावांची केवळ स्वच्छता करणे हा केवळ पहिला टप्पा आहे, त्यांच्या संवर्धनासाठी पावले उचलणे गरजेचे आहे.

तज्ज्ञांच्या मते वरवर तलाव स्वच्छ करणे हे अल्प काळाचे नियाेजन आहे. तलावांचे खाेलीकरण करणे गरजेचे असून त्यामुळे पाणी साठवणूक क्षमता वाढण्यास मदत हाेईल. ग्रीन व्हिजीलचे संस्थापक व पर्यावरणवादी काैस्तुभ चटर्जी यांच्या मते तलावातील तण मुळासकट काढणे गरजेचे आहे. त्यांना मुळापासून उपटून फेकल्यास त्यांची पुन्हा वाढ हाेणार नाही. वरवर तन काढण्याचा प्रयत्न केला तर पहिल्याच पावसात त्याची तेवढच्याच झपाट्याने वाढ हाेते. ही समस्या साेडविण्यासाठी तलावाचे पाणी पूर्ण खाली करून त्यातील तण पूर्णपणे काढणे महत्त्वाचे आहे. यामुळे तलावाचा तळभाग क्लियर हाेईल. पुनरुज्जीवनाच्या दीर्घकालीन परिणामासाठी दुसरा टप्पा म्हणजे तलावाचे खाेलीकरण करणे. साेनेगाव आणि सक्करदरा तलाव मार्च महिन्यात नैसर्गिकरित्या सुकलेले असतात. त्यावेळी त्यांचे खाेलीकरण करण्याची चांगली संधी महापालिका किंवा इतर यंत्रणेकडे असते.

पाेलीस लाईन तलावाबाबत बाेलताना, या तलावाचे काम सुरू असल्याने त्याची खाेली वाढविणे सहज साेपे हाेणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पाणी साठवण क्षमता वाढेल. सक्करदरा व साेनेगाव तलावाची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता कमी झाली असल्याने त्यांचे पूर्णपणे खाेदकाम हाेणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. तिसरा महत्त्वपूर्ण टप्पा म्हणजे तलावातील परिसंस्थेच्या संरक्षणासाठी कृत्रिम ऑक्सिजनचा पुरवठा करणे. तलावांना नेहमी कृत्रिम ऑक्सिजन पुरवठ्याची गरज असते. वातावरणातील हवा तलावाच्या वरच्या स्तरावर पाेहचते पण खाेलीपर्यंत पाेहचत नाही. तलावातील जलपर्णी वनस्पती व तन असलेले ऑक्सिजन शाेषून घेतात. त्यामुळे सहाजिकच तलावाचे ऑक्सिजन कमी हाेते. कृत्रिम ऑक्सिजन पुरविण्यासाठी तलावामध्ये फाउंटेन लावणे गरजेचे आहे. त्यामुळे तलावाचे तळाचे पाणी फव्वाऱ्यांद्वारे वर येईल व त्याचे थेंब वातावरणातील ऑक्सिजन शाेषून घेतील. तलावांसाठी ६ मिलिग्रॅम/लिटर ऑक्सिजनची गरज असते. मात्र नागपुरातील बहुतेक तलावांमध्ये हे प्रमाण ४.५ ते ५ मिलिग्रॅम/लिटर एवढे आहे. तणाच्या वाढीमुळे ते आणखी खाली येत असल्याचे चटर्जी यांनी सांगितले.

महापालिकेच्या मंगळवारी झाेनचे अभियंता केशव साेनाेने यांनी पाेलीस लाईन तलावासाठी केलेल्या याेजनेबाबत माहिती दिली. या तलावासाठी यापूर्वी काहीच झाले नाही. त्यामुळे पहिल्या टप्प्यात त्याच्या स्वच्छतेवर भर देण्यात आला आहे. त्यानंतर त्याचे खाेलीकरण आणि फाउंटेन लावण्याचाही प्रस्ताव तयार केला जाणार असल्याचे साेनाेने यांनी स्पष्ट केले. पहिल्या टप्प्यातील काम महिनाभरात पूर्ण हाेण्याची माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :Waterपाणी