शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

भाजपच्या निलंबित माजी आमदाराचा आरोप, मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळे माझ्यावर कारवाई

By योगेश पांडे | Updated: October 18, 2024 17:52 IST

गडकरींच्या कार्यकर्त्यांवर जाणुनबुजून कारवाई : राष्ट्रीय अध्यक्षांना पाठविले पत्र

योगेश पांडे - नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रामटेक विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी यांना पक्षाने सहा वर्षांसाठी निलंबित केल्यानंतर राजकारण चांगलेच तापले आहे. रेड्डी यांनी या मुद्द्यावरून भाजपच्या नेत्यांवर टीका करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दबावामुळे कारवाई झाल्याचा आरोप केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यकर्त्यांवर जाणुनबुजून कारवाई होत असल्याचादेखील त्यांनी दावा केला. नागपुरात ते शुक्रवारी पत्रपरिषदेदरम्यान बोलत होते.

रामटकेची जागा शिंदेसेनेचे आ.आशीष जयस्वाल यांना जाणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. याविरोधात रेड्डी यांनी आवाज उचलला होता. त्यामुळे दोन दिवसांअगोदर त्यांना भाजपने निलंबित केले. यानंतर रामटेकमधील पाचशेहून अधिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपचा राजिनामा दिला होता. या पार्श्वभूमीवर रेड्डी यांनी शुक्रवारी भूमिका मांडली. मी नितिन गडकरी यांच्या नेतृत्वात अनेक वर्षापासून पक्षाचे काम करत आहे. मुख्यमंत्र्यांनी आशीष जयस्वाल यांची उमेदवारी जाहीर केली, मात्र आम्हाला कुणीही कळविले नाही. २०१४ मध्ये मी जयस्वाल यांना हरवून निवडून आलो होतो. तर याच जयस्वाल यांनी बंडखोरी करत भाजपविरोधात निवडणूक लढविली होती. मी तरीदेखील भाजपचे प्रामाणिकपणे काम केले. मी तिकीटाची मागणीदेखील केली नाही. भाजपच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याला उमेदवारी द्यावी ही आमची मागणी होती. मात्र माझ्यावर कोणतेही कारण नसताना निलंबनाची कारवाई झाली. कारणे दाखवा नोटीसदेखील न देता माझ्यावर ताबडतोब करवाई करण्यात आली. नेत्यांच्या मनात येईल तशी कारवाई होत असेल तर कोणताही कार्यकर्ता आपले मत मांडणारच नाही. माझ्यावर झालेला अन्याय म्हणजे नागपूर जिल्ह्यातील सामान्य कार्यकर्त्यावरील अन्याय आहे.

गडकरींच्या प्रत्येक कार्यकर्त्यावर कारवाई केली जात आहे. आज माझ्यावर झाली उद्या दुसऱ्याविरोधात कारवाई होईल. मी याबाबत राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांना पत्र पाठविले आहे, असे रेड्डी म्हणाले. मी भाजप पक्ष सोडला नसून पक्षासाठी काम करत राहील, असेदेखील त्यांनी सांगितले.

टॅग्स :BJPभाजपाnagpurनागपूरMallikarjun Reddyमल्लिकार्जुन रेड्डी