शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

सांबारवडी महागच; सर्वच भाज्या ५० रुपयांवर, पावसामुळे भाज्या शेतातच खराब

By मोरेश्वर मानापुरे | Updated: December 27, 2023 19:57 IST

नोव्हेंबर महिन्यात केवळ दोन ते तीन दिवस आलेल्या मुसळधार पावसामुळे ६० टक्के भाज्या शेतातच खराब झाल्या आहेत.

नागपूर : हिवाळ्यात भाजीपाला आणि पालेभाज्या स्वस्त असतात. या दिवसात वैदर्भीय सांबारवडीचा पाहुणचार सर्वच घरी असतो. पण यंदा कोथिंबीरचे भाव १२० रुपयांवर पोहोचल्याने अनेकांनी सांबारवडीचा बेत रद्द केला आहे. सर्वच भाज्यांचे भाव ५० ते ६० रुपयांवर पोहोचल्याने गृहिणींचे आर्थिक बजेट बिघडले आहे. 

नोव्हेंबर महिन्यात केवळ दोन ते तीन दिवस आलेल्या मुसळधार पावसामुळे ६० टक्के भाज्या शेतातच खराब झाल्या आहेत. त्यामुळे बाजारात आवक कमी असून भाज्यांचा दर्जाही निकृष्ट आहे. परिणामी गृहिणींना जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत भाज्या जास्त दरातच खरेदी कराव्या लागतील. सध्या स्थानिक उत्पादक शेतकरी आणि अन्य जिल्ह्यातून भाज्या विक्रीला येत आहे. हिवाळ्यात १५० हून अधिक गाड्यांची होणारी आवक ६० ते ७० गाड्यांपर्यंत कमी झाल्याची माहिती कॉटन मार्केट भाजीपाला अडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी दिली.

दरवर्षी हिवाळ्यात रस्त्यावर फेकाव्या लागतात पालेभाज्या

हिवाळ्यात भाजीपाला आणि पालेभाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक असते. दरवर्षी ५ ते १० रुपये किलो मिळणारे वांगे, पालक, मेथी आणि फूल कोबीचे दर यंदा ७० रुपये किलोवर पोहोचले आहेत. वाहतूक खर्च आणि अडतियांची दलाली परवडत नसल्यामुळे उत्पादक शेतकरी दरवर्षी रस्त्याच्या कडेला भाज्यांची विक्री करतात आणि उरलेला माल जागेवरच सोडून गावाकडे परतात. पण यंदा अशी परिस्थिती नाही. सर्वच माल बाजारपेठांमध्ये विकला जात आहे.

स्थानिकांसह नांदेड, नाशिकहून आवकस्थानिकांसह नांदेड, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा आणि अन्य जिल्ह्यातून भाज्यांची आवक आहे. टोमॅटो आणि पत्ता कोबी वगळता सर्वच भाज्यांचे भाव प्रति किलो ५० रुपयांवर गेल्यामुळे गृहिणींचे आर्थिक बजेट वाढले आहे. 

कांदे वाढले; बटाटे आटोक्यातनोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबरमध्ये कांद्याचे दर वाढले आहेत. कळमना बाजारात लाल कांद्याची आवक औरंगाबाद, नगर आणि सोलापूर येथून असून पांढरे कांदे गुजरातेतून येत आहेत. सध्या २० ते २५ ट्रकची आवक आहे. कळमन्यात दर्जानुसार २५ रुपये किलोपर्यंत भाव आहेत, तर किरकोळमध्ये ४० ते ४५ रुपये दराने विक्री होत आहे. बटाट्याचे १० ते १५ ट्रक आग्रा आणि कानपूर येथून येत आहेत. किरकोळमध्ये प्रति किलो भाव २५ ते ३० रुपये आहे. शिवाय यंदा लसणाचे भाव आकाशाला भिडले आहेत. कळमन्यात दर्जानुसार २५० ते ३०० रुपये तर किरकोळमध्ये भाव ४०० रुपयांवर पोहोचले आहेत. राजस्थान आणि मध्यप्रदेशातून दररोज दोन ट्रक विक्रीस येत आहेत.

ठोक आणि किरकोळमध्ये भाज्यांचे भाव (रुपये, प्रति किलो) :भाज्या ठोक किरकोळवांगे ५० ७०-८०हिरवी मिरची २५-३० ४०-५०टोमॅटो १२-१५ २५-३०कोथिंबीर ७०-८० ११०-१२०फूल कोबी ३०-४० ५०-६०पत्ता कोबी १२-१५ २०-२५सिमला मिरची ५० ७०-८०कारले ५० ७०-८०हिरवा मटर २५-३० ४०-५०भेंडी ६० ८०-९०चवळी शेंग ७० ९०-१००ढेमस ६० ८०-९०कोहळे २० ३०-४०लवकी १५ २५-३०फणस४० ६०-७०पालक ३० ४०-५०मेथी ५० ७०-८०

टॅग्स :nagpurनागपूर