शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
3
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
4
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
5
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
6
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
7
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
8
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
9
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
10
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
11
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
12
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
13
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
14
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
15
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
16
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
17
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
18
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
19
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
20
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!

नागपूरनजीक हिंगण्यात ‘ईव्हीएम’ विरोधात सर्वपक्षीय मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 22:40 IST

वानाडोंगरी नगर परिषदेचा निवडणूक निकाल मंगळवारी घोषित करण्यात आला. त्यात २१ पैकी १९ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले. भाजपविरोधात लाट असताना एवढे उमेदवार निवडून येणे अशक्य आहे, असे सांगत सर्वपक्षीय नेत्यांनी बुधवारी सर्वपक्षीय मोर्चा काढला. ‘ईव्हीएम’ (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) ऐवजी बॅलेट पेपरने मतदान घेण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

ठळक मुद्देवानाडोंगरीत वातावरण तापले : बॅलेट पेपरने मतदान घेण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वानाडोंगरी नगर परिषदेचा निवडणूक निकाल मंगळवारी घोषित करण्यात आला. त्यात २१ पैकी १९ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले. भाजपविरोधात लाट असताना एवढे उमेदवार निवडून येणे अशक्य आहे, असे सांगत सर्वपक्षीय नेत्यांनी बुधवारी सर्वपक्षीय मोर्चा काढला. ‘ईव्हीएम’ (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) ऐवजी बॅलेट पेपरने मतदान घेण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शिष्टमंडळाने नगर परिषदेत मुख्याधिकारी प्रवीण मानकर यांच्यानंतर तहसील कार्यालयात नायब तहसीलदार प्रीती डुडुलकर यांच्याकडे निवेदन सादर केले. या मोर्चामुळे वानाडोंगरीत वातावरण चांगलेच तापले. दुसरीकडे सर्वपक्षीय नेत्यांनी गुरुवारी ‘वानाडोंगरी बंद’चे आवाहन केले आहे.वानाडोंगरी नगर परिषदेची पहिली सार्वत्रिक निवडणूक होऊन मंगळवारी निकाल जाहीर करण्यात आला. ही निवडणूक सुरुवातीपासूनच चर्चेत राहिली. आधी निवडणूक कार्यक्रमानुसार १५ जुलैला मतदान होणार होते. मात्र पाच उमेदवारांचे अर्ज बाद केल्याने न्यायालयापर्यंत धाव घेतली. मात्र तो निकाल उमेदवारांच्या विरोधात गेला. असे असले तरी निवडणूक प्रक्रियेसाठी लागणारा कालावधी पाहता सुधारित निवडणूक कार्यक्रम जारी करून चार दिवस वाढविले. यानुसार १९ जुलैला मतदान होते. परंतु तेथे ३० बूथवर मतदान झाले आणि ५ बूथवरील ईव्हीएम बदलण्यात आल्याने आक्षेप घेतला. परिणामी पुन्हा चार दिवसाने पाच बूथवर मतदान घेण्यात आले.मतदान झाल्यानंतर मंगळवारी निकाल जाहीर करण्यात आला. मात्र २१ पैकी १९ जागांवर भाजपच्या उमेदवारांचा विजय झाला. त्यामुळे ईव्हीएममध्ये फेरफार करण्यात आल्याचा आरोप करीत सर्वपक्षीय नेते एकवटले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, बहुजन समाज पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजीवनगर येथून मोर्चा सुरू केला. नगर परिषदेवर हा मोर्चा पोहोचताच जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ईव्हीएम घोळामुळेच भाजपचा विजय झाला, असा आक्षेप घेत मुख्याधिकाऱ्यांकडे शिष्टमंडळाने निवेदन सोपविले.त्यानंतर मोर्चा तहसील कार्यालयावर काढण्यात आला. तहसील कार्यालय परिसरात माजी मंत्री रमेश बंग यांनी ही निवडणूक रद्द करून नव्याने बॅलेट पेपरने निवडणूक घेण्याची मागणी केली. सोबतच भविष्यातील सर्वच निवडणुका या बॅलेट पेपरच्या साहाय्याने घेण्यात याव्यात, अशी मागणी केली. नायब तहसीलदारांकडे शिष्टमंडळाने निवेदन सोपविले. यावेळी काँग्रेसचे बाबा आष्टणकर, संजय जगताप, शिवसेनेचे नंदू कन्हेर, मनसेचे दीपक नासरे, बसपचे शेंडे, जिल्हा परिषद सदस्य उज्ज्वला बोढारे, राष्ट्रवादीचे प्रवीण खाडे, गोवर्धन प्रधान, संतोष कन्हेरकर, पुरुषोत्तम डाखळे यांच्यासह मोठ्या संख्येने सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :Morchaमोर्चाElectionनिवडणूक