शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

मुंबईतील सर्व इमारतींच्या ‘फायर’ सुरक्षेची तपासणी होणार, विधानपरिषदेत सरकारची माहिती

By योगेश पांडे | Updated: December 8, 2023 16:28 IST

विधानपरिषदेत प्रसाद लाड यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून हा मुद्दा उपस्थित केला होता.

नागपूर :मुंबईत टोलेजंग इमारतींसोबतच तेथे आगीचा धोकादेखील वाढतो आहे. इमारतींमधील अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत असल्याची माहिती इमारतीचे मालक किंवा सोसायटीकडून वर्षातून दोनदा सादर होणे अनिवार्य आहे. मात्र अनेक इमारतींमध्ये अग्निशमन सुरक्षाविषयक नियमांसंदर्भात सुविधाच नसल्याचे चित्र आहे. ही बाब लक्षात घेता मुंबईसह ‘एमएमआर’मधील सर्वच उंच इमारतींच्या ‘फायर’ सुरक्षेची तपासणी करण्यात येईल, अशी माहिती राज्य शासनातर्फे मंत्री उदय सामंत यांनी दिली. विधानपरिषदेत प्रसाद लाड यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून हा मुद्दा उपस्थित केला होता.

महाराष्ट्र अग्नी प्रतिबंधक व जीवसंरक्षण उपाययोजना अधिनियमाअंतर्गत इमारतींचे मालक-भोगवटादार, गृहनिर्माण संस्थांना फायर ऑडिट करणे अनिवार्य आहे. तसा अहवालदेखील त्यांना बीएमसीला सादर कराव लागतो. मुंबई अग्निशमन दलातर्फेदेखील इमारतींची तपासणी करण्यात येते. ऑक्टोबर २०२३ मध्ये गोरेगाव येथील जय भवानी इमारतीला लागलेल्या आगीनंतर हा मुद्दा ऐरणीवर आला होता. यानंतर बीएमसीतर्फे मुंबईतील ३४३ एसआरए इमारतींची तपासणी करण्यात आली होती. २०१५ सालापासून ते आतापर्यंत तपासणी झालेल्या इमारतींची संख्या ५ हजार ८९० इतकीच आहे. अनेक इमारतींकडून अग्निशमन यंत्रणेबाबतच्या नियमांचे पालनच करण्यात येत नाही. मुंबईत २.१५ लाख इमारती आहेत. यातील सर्व उंच इमारतीचे फायर ऑडिट होत आहे की नाही याचे सर्वेक्षण करण्यात येईल. तसेच एमएमआरमध्ये यासंदर्भात भरारी पथकदेखील गठीत करण्यात येईल, अशी माहिती सामंत यांनी दिली.

टॅग्स :nagpurनागपूरWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनMumbaiमुंबई