शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

विषबाधेवर नियंत्रण मिळविण्यासाठी यंत्रणा सतर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 22:36 IST

प्रचार, प्रसिद्धी आणि जनजागृतीच्या माध्यमातून विषबाधा रोखण्यासाठी कृषी विभागाची यंत्रणा सतर्क झाली आहे.

ठळक मुद्देप्रचार प्रसिद्धीबरोबरच समित्यांचेही गठन : कृषी केंद्रावर विभागाचा जास्त फोकस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २०१७ मध्ये कीटकनाशकाच्या फवारणीतून झालेल्या विषबाधेमुळे अख्खी यंत्रणात हादरली होती. यात काही शेतकऱ्यांचा मृत्यूही झाला होता. सरकारवर ताशेरे ओढले गेले होते. प्रचार, प्रसिद्धी आणि जनजागृतीच्या माध्यमातून विषबाधा रोखण्यासाठी कृषी विभागाची यंत्रणा सतर्क झाली आहे. तालुका, गावपातळीवर समित्यांचे गठन करण्यात आले असून, कृषीकेंद्र संचालकांना जिल्हा व तालुका पातळीवर प्रशिक्षण दिले जात आहे.कृषी विभागाने २०१७ मध्ये झालेल्या विषबाधेची कारण शोधण्यासाठी तज्ज्ञांची समिती गठित केली होती. त्यातून काही निष्कर्ष पुढे आले होते. शेतकऱ्यांचे अज्ञान, जनजागृतीचा अभाव, चुकीची फवारणी, सुरक्षेकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष अनेक कारणे पुढे आली होती. यावर्षी खरीपाच्या बहुतांश पेरण्या आटोपल्या आहे. पीक शेतात उभी झाली आहे. आता शेतकऱ्यांकडून कीटकनाशकाची मागणी होणार आहे. हीच वेळ शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याची असल्याने कृषी विभागाने आता पथकच तयार केले आहे. तालुका कृषी अधिकारी, पं.स.कृषी अधिकारी, खते-बियाणे-कीटकनाशक निरीक्षकांचे पथक तयार करून गावामध्ये शेतकऱ्यांना प्रशिक्षण, कृषी केंद्र संचालकांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. कीटकनाशक वापरण्यासंदर्भात नियमावली, काळजी घेण्यासंदर्भात माहिती दिली जात आहे. बोंड अळीचे व्यवस्थापन आणि विषबाधा टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे फ्लेक्स, पत्रक कृषी केंद्र, ग्रामपंचायतीमध्ये लावण्यात येत आहे. गावस्तरावर, तालुकास्तरावर सभा घेऊन कीटकनाशक कंपन्यांच्या प्रतिनिधींकडून मार्गदर्शन करण्यात येत आहे. विषबाधेसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन कीटकनाशक आणि बियाणे कंपन्यांची नियुक्ती केली आहे. या कंपन्या सीएसआर फंडातून शेतकऱ्यांना फवारणी कीट, फोरोमन ट्रॅप उपलब्ध करून देणार आहे. पोलीस पाटील, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक यांची गावपातळीवर समिती तयार करण्यात आली आहे. १५ ऑगस्ट रोजी गावोगावी होणाऱ्या ग्रामसभेत विषबाधा निर्मूलनासाठी आवश्यक उपाययोजनांचे वाचन होणार आहे.कीटकनाशक म्हणजे एकप्रकारचे विष. शेतकरी जेथून कीटकनाशक नेतात, त्याकृ षी केंद्रावर आम्ही फोकस केले आहे. त्यांच्याकडूनच जास्तीत जास्त प्रचार प्रसार व्हावा, यासाठी त्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. नियमावली, अटी शर्तीचे पालन करण्याच्या सूचना दिल्या जात आहे. त्याचा चांगला परिणाम होईल, अशी अपेक्षा आहे.प्रवीण देशमुख, कृषी अधिकारी, जि.प.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती