शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

विषबाधेवर नियंत्रण मिळविण्यासाठी यंत्रणा सतर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 22:36 IST

प्रचार, प्रसिद्धी आणि जनजागृतीच्या माध्यमातून विषबाधा रोखण्यासाठी कृषी विभागाची यंत्रणा सतर्क झाली आहे.

ठळक मुद्देप्रचार प्रसिद्धीबरोबरच समित्यांचेही गठन : कृषी केंद्रावर विभागाचा जास्त फोकस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २०१७ मध्ये कीटकनाशकाच्या फवारणीतून झालेल्या विषबाधेमुळे अख्खी यंत्रणात हादरली होती. यात काही शेतकऱ्यांचा मृत्यूही झाला होता. सरकारवर ताशेरे ओढले गेले होते. प्रचार, प्रसिद्धी आणि जनजागृतीच्या माध्यमातून विषबाधा रोखण्यासाठी कृषी विभागाची यंत्रणा सतर्क झाली आहे. तालुका, गावपातळीवर समित्यांचे गठन करण्यात आले असून, कृषीकेंद्र संचालकांना जिल्हा व तालुका पातळीवर प्रशिक्षण दिले जात आहे.कृषी विभागाने २०१७ मध्ये झालेल्या विषबाधेची कारण शोधण्यासाठी तज्ज्ञांची समिती गठित केली होती. त्यातून काही निष्कर्ष पुढे आले होते. शेतकऱ्यांचे अज्ञान, जनजागृतीचा अभाव, चुकीची फवारणी, सुरक्षेकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष अनेक कारणे पुढे आली होती. यावर्षी खरीपाच्या बहुतांश पेरण्या आटोपल्या आहे. पीक शेतात उभी झाली आहे. आता शेतकऱ्यांकडून कीटकनाशकाची मागणी होणार आहे. हीच वेळ शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याची असल्याने कृषी विभागाने आता पथकच तयार केले आहे. तालुका कृषी अधिकारी, पं.स.कृषी अधिकारी, खते-बियाणे-कीटकनाशक निरीक्षकांचे पथक तयार करून गावामध्ये शेतकऱ्यांना प्रशिक्षण, कृषी केंद्र संचालकांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. कीटकनाशक वापरण्यासंदर्भात नियमावली, काळजी घेण्यासंदर्भात माहिती दिली जात आहे. बोंड अळीचे व्यवस्थापन आणि विषबाधा टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे फ्लेक्स, पत्रक कृषी केंद्र, ग्रामपंचायतीमध्ये लावण्यात येत आहे. गावस्तरावर, तालुकास्तरावर सभा घेऊन कीटकनाशक कंपन्यांच्या प्रतिनिधींकडून मार्गदर्शन करण्यात येत आहे. विषबाधेसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन कीटकनाशक आणि बियाणे कंपन्यांची नियुक्ती केली आहे. या कंपन्या सीएसआर फंडातून शेतकऱ्यांना फवारणी कीट, फोरोमन ट्रॅप उपलब्ध करून देणार आहे. पोलीस पाटील, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक यांची गावपातळीवर समिती तयार करण्यात आली आहे. १५ ऑगस्ट रोजी गावोगावी होणाऱ्या ग्रामसभेत विषबाधा निर्मूलनासाठी आवश्यक उपाययोजनांचे वाचन होणार आहे.कीटकनाशक म्हणजे एकप्रकारचे विष. शेतकरी जेथून कीटकनाशक नेतात, त्याकृ षी केंद्रावर आम्ही फोकस केले आहे. त्यांच्याकडूनच जास्तीत जास्त प्रचार प्रसार व्हावा, यासाठी त्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. नियमावली, अटी शर्तीचे पालन करण्याच्या सूचना दिल्या जात आहे. त्याचा चांगला परिणाम होईल, अशी अपेक्षा आहे.प्रवीण देशमुख, कृषी अधिकारी, जि.प.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती