शहरं
Join us  
Trending Stories
1
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
2
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
3
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
4
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
5
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
6
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
7
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
8
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
9
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
10
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
11
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
12
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
13
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
14
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
15
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
16
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
17
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
18
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
19
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
20
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले

अ.भा. मराठी साहित्य महामंडळ अध्यक्षांनी राजीनामा द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 20:31 IST

यवतमाळ येथे हाणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित उद्घाटक साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्याच्या निर्णयाचे राज्यातच नाही तर देशभरात वादळ उठले असून साहित्य जगताकडून तीव्र पडसाद उमटत आहेत. एकीकडे बहुतेक मान्यवर सारस्वतांनी संमेलनावरच बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या आडमुठ्या व एककल्ली कारभारामुळे ही लाजिरवाणी स्थिती उद्भवल्याची टीका करीत नैतिक जबाबदारी स्वीकारून डॉ. जोशी यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी महामंडळाचे माजी सदस्य, ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत तिडके यांनी केली.

ठळक मुद्देश्रीपाद जोशींवर चहुबाजूने टीकास्त्रसंमेलन आणि मराठीची विश्वासार्हता गमावल्याची टीका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यवतमाळ येथे हाणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित उद्घाटक साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्याच्या निर्णयाचे राज्यातच नाही तर देशभरात वादळ उठले असून साहित्य जगताकडून तीव्र पडसाद उमटत आहेत. एकीकडे बहुतेक मान्यवर सारस्वतांनी संमेलनावरच बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या आडमुठ्या व एककल्ली कारभारामुळे ही लाजिरवाणी स्थिती उद्भवल्याची टीका करीत नैतिक जबाबदारी स्वीकारून डॉ. जोशी यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी महामंडळाचे माजी सदस्य, ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत तिडके यांनी केली.कायम तत्त्वनिष्ठ भूमिका घेऊन जगणाऱ्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या लेखिका नयनतारा सहगल यांना उद्घाटनाचे निमंत्रण द्यावे आणि संमेलनाच्या ऐन तोंडावर अशाप्रकारे निमंत्रण रद्द करून त्यांचा अपमान करण्यात आल्याने एकूणच मराठी साहित्यिकांमध्ये नाराजी आणि संताप व्यक्त होत आहे. महत्त्वाचे म्हणजे संमेलनाच्या इतिहासात लाजिरवाणी घटना घडली असताना साहित्य महामंडळ आणि स्वागत संस्था खंत व्यक्त करण्याऐवजी या पापाची जबाबदारी एकमेकांवर ढकलत चिखलफेक करण्यात मश्गूल असल्याने साहित्य क्षेत्रही ढवळून निघाले आहे. एकीकडे साहित्यिक नाराज आहेत तर दुसरीकडे नागपूरपासून मुंबईपर्यंत पडद्यामागे शिजलेल्या या घटनाक्रमाचे पाप यवतमाळच्या मातीवर लादल्याने आतापर्यंत संमेलनासाठी उत्साही असलेल्या यवतमाळकर रसिकांचाही भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे सामान्य रसिकांच्या देणग्यांतून आयोजित झालेले हे संमेलन वाया गेले काय, ही निराशा त्यांच्यात आहे.आयोजक संस्था डॉ. वि.भि. कोलते संशोधन केंद्र व वाचनालयाचे पद्माकर मलकापुरे यांनी बॉम्बगोळा टाकत महामंडळ अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी हेच या घटनाक्रमासाठी जबाबदार असून ते हुकूमशाहसारखे वागत असल्याचा आरोपही त्यांनी केला. मलकापुरे यांच्या आरोपामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. विशेष म्हणजे संमेलनाच्या आयोजनाच्या घोषणेपासून आयोजक संस्थेमध्येच दोन गट निर्माण झाले आहेत. तसेच आयोजक व महामंडळामधले मतभेद सातत्याने समोर येत आहेत. डॉ. श्रीपाद जोशी हे हिटलरप्रमाणे वागतात, कुणाचे ऐकत नाही व कुणाला बोलू देत नसल्याचा आरोप सातत्याने आयोजक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून वारंवार केला आहे. एकीकडे आयोजक आणि महामंडळ यांच्यामध्ये वाद चालला असताना महामंडळाच्या घटकासंस्थांकडूनही महामंडळ अध्यक्षांच्या कारभारावर अनेकदा आक्षेप घेतला आहे. नयनतारा सहगल यांच्यासारख्या प्रतिभावंत लेखिकेचे निमंत्रण रद्द करणे योग्य नाही. राजकीय दबाव असला तरी ही गंभीर चूक असून यासाठी महामंडळाचे अध्यक्ष जबाबदार आहेत. त्यांची कार्यपद्धती आक्षेपार्ह आहे. त्यामुळे साहित्य संमेलनाच्या समृद्ध परंपरेला मोठा डाग लागला आहे. याची नैतिक जबाबदारी स्वीकारून डॉ. श्रीपाद जोशी यांनी राजीनामा द्यावा. श्रीकांत तिडके, ज्येष्ठ साहित्यिक. पंतप्रधान इंदिरा गांधी यांची मामेबहीण असूनही त्यांच्याविरोधात नयनतारा सहगल यांनी भूमिका घेतली होती. त्यांच्या वैचारिक पातळीच्या विरोधातील भूमिका महामंडळ व आयोजकांनी घेतली. संमेलनाच्या तोंडावर घेतलेला निर्णय लहान नाही व याविषयी घटक संस्थांशी कोणतीही चर्चा महामंडळ अध्यक्षांनी केली नाही. ही गंभीर बाब असून त्याच्या परिणामांची जाणीव महामंडळ व आयोजकांनाही नाही. यामुळे आधीच बहुतेक मान्यवर साहित्यिकांनी बहिष्कार टाकण्याचा इशारा दिल्याने हे संमेलनच धोक्यात आले आहे. कौतिकराव ठाले पाटील, मराठवाडा साहित्य संस्था.

 

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनYavatmalयवतमाळ